शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कृष्ण निवास दोन वर्षांनंतरही पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:07 IST

बघताबघता कृष्ण निवास कोसळण्याच्या दुर्घटनेला दोन वर्षे होत आली. तीन ते चार कुटुंबांतील डझनभर जीव घेणाºया या घटनेने संपूर्ण नौपाडा हादरले.

ठाणे : बघताबघता कृष्ण निवास कोसळण्याच्या दुर्घटनेला दोन वर्षे होत आली. तीन ते चार कुटुंबांतील डझनभर जीव घेणाºया या घटनेने संपूर्ण नौपाडा हादरले. परंतु, पालिका प्रशासन तसूभरसुद्धा हलले नाही. या दुर्घटनेची कारणे शोधण्यासाठी गठीत केलेल्या समितीस आपला अहवाल देण्यास तब्बल एक वर्ष लागले. आजही निळ्या पत्र्यांच्या मागे कृष्ण निवासाचे अवशेष विखुरलेले असून पुनर्विकास दृष्टिक्षेपातही नाही.काळ झपाट्याने बदलतोय आणि पालिकेच्या अनास्थेने इमारती पडून जीव जाणे चालूच आहे, अशी व्यथा येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीही याबाबत मौन बाळगून आहेत.दोन वर्षांपूर्वी ४ आॅगस्टच्या दिवशी नौपाड्यातील ही इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून १२ जण दगावले, तर ७ जण जखमी झाले होते. आज या घटनेला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु, आजही ही इमारत पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे. याला सर्वस्वी पालिका जबाबदार असून कोणत्याही प्रकारचे स्ट्रक्चरल आॅडिट न करता प्रशासन केवळ नजरेने धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध करत असते.प्रभाग समितीनिहाय त्यांची वर्गवारी केली जाते. उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सी १, सी २, अ सी २, ब सी ३ अशा प्रकारे याद्या प्रसिद्ध केल्या जातात.दरम्यान, दोन वर्षे झाली, तरी आजही या इमारतीचे अवशेष पडून आहेत.जवळपास तीन पिढ्यांचा रहिवास पाहिलेल्या पसिरातील काही इमारती जुन्या ठाण्याची आठवण म्हणून आपल्या नशिबाला कोसत उभ्या आहेत. शासन / प्रशासन मात्र अशा भाडेकरूयुक्त खासकरून नौपाड्यातील मूळ ठाणेकरांचा रहिवास असलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत अनुकूल नाही. त्यामुळे आता पुनर्वसन केव्हा होणार, याच प्रतीक्षेत आता या जुन्या इमारती उभ्या असल्याची प्रतिक्रिया येथील रहिवासी महेंद्र मोने यांनी दिली.