शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

कोपर उड्डाणपूल आजपासून होणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 00:54 IST

कोपर उड्डाणपूल कमकुवत झाल्याने तो रविवारी सायंकाळपासून वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली.

डोंबिवली : पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर उड्डाणपूल कमकुवत झाल्याने तो रविवारी सायंकाळपासून वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली. त्यामुळे शहरातील सर्व वाहतूक अरुंद असलेल्या ठाकुर्ली पुलावरूनच वळवण्यात येणार आहे. दरम्यान, कोपरपूल डागडुजीसाठी किती काळ बंद राहील, याबाबत मात्र नेमकी माहिती महापालिका, रेल्वे प्रशासन देऊ शकलेले नाही. पुलाची डागडुजी करावी की, तो पाडून नवीन बांधावा, हे देखील आताच सांगता येणार नसल्याने किमान वर्षभर डोंबिवलीकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार आहे.कोपरपुलावरून वाहतूक बंद करावी, असे पत्र केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांनी शुक्रवारी काळे यांना दिले होते. त्यानुसार, त्यांनी हा निर्णय घेतला आहे.पूल बंद झाल्यानंतर महापालिकेने नेमलेल्या रॅनकॉन कन्सल्टंटकडून पुलाची पाहणी करण्यात येणार आहे. जमिनीच्या चाचणीचे काम शनिवारपासून सुरू झाले आहे. मात्र, रेल्वेची वाहतूक दिवसा दोन तास बंद असेल, तरच पुलाच्या खालच्या भागातील स्लॅबची क्षमता तपासणे शक्य होणार आहे, असे महापालिकेचे म्हणणे आहे. रेल्वेकडून त्यासाठी ट्रॅफिक ब्लॉक मिळणे आवश्यक आहे. पुलाची तपासणी झाल्यानंतर डागडुजीचा अहवाल मिळण्यासाठी आठवडा लागणार आहे. परंतु, रेल्वेने त्यांच्या अखत्यारित येणारे लोखंडी खांब व त्यांचे आयुष्यमान यासंदर्भात आयआयटीकडून तपासणी केली होती. मात्र, त्याचा अहवाल रेल्वेकडून मिळू शकलेला नाही. यासंदर्भात मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.