शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोकणी माणसाने हातात काम घेतले कि मागे हटत नाही : डॉ. महेश केळुस्कर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 16:53 IST

ठाण्यात ८५ तास सलग चालणाऱ्या कवीसंमेलनास आजपासून सुरुवात झाली आहे. 

ठळक मुद्देकोकणी माणसाने हातात कामी घेतले कि मागे हटत नाही : डॉ. महेश केळुस्कर ठाण्यात ८५ तास सलग चालणाऱ्या कवीसंमेलनास सुरुवातकविसंमेलनात राज्यातील १००० पेक्षा जास्त  कवी सहभागी

ठाणे - कविता भावनांचा अविष्कार असतो . निकड असल्याशिवाय कागदावर उतरवू नये .  तरच कविता आतून येते , अस्सल येते . शब्दांना अर्थ नसेल तर काव्य नसेल तर पोकळ असते .  शब्दाला वजन असते , शब्द पाळण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत असते . त्यामुळे कवींनी आपल्यता शब्दाला वजन आहे का हे पाहणे गरजेचे आहे . कोकणी माणसाने हातात काम घेतले कि मागे हटत नाही . त्याप्रमाणे ८५ तास सलग चालणार्या कवी संमेलनाचे आयोजन कौतुकास्पद आहे  अशा भावना कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष, ज्येष्ठ कवी डॉ. महेश केळुस्कर यांनी व्यक्त केल्या. 

          अखिल भारतीय कला, क्रीडा व सांस्कृतिक अकादमीच्या वतीने सलग ८५ तास चालणारे कविसंमेलन ठाणे येथील संकल्प इंग्लिश स्कूल मध्ये आयोजित करण्यात आले आहे. या कविसंमेलनात राज्यातील १००० पेक्षा जास्त  कवी सहभागी होणार  आहे. या कविसंमेलनाचे उदघाटन  डॉ . केळुस्कर यांच्या काव्यवाचनाने  झाले . कवी जेव्हा माझया मनातलं बोलत आहे असे वाटते तेव्हा आपण त्या कवितेशी समरस होतो . कविता न लिहणारे कवी असतात , परंतु कवी हे बोलके रसिक असतात असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी  पुढे म्हणाले कि, कवी संमेलनासारखे उपक्रम साहित्य विश्वात चैतन्य निर्माण करतात. त्यामुळे असे उपक्रम आयोजित करणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखं असल्याचे त्यांनी सांगितले . यावेळी त्यांनी ' झिनझिनाट ' ही मालवणी बोलीभाषेतील कविता सादर केली .          ज्येष्ठ साहित्यिका डॉ . विजया वाड '' सु सु सुट्टी , शाळेला बुट्टी '' ही कविता सादर करत ८५ तास काव्य संमेलनासाठी शुभेच्छा आयोजकांना दिल्या . ज्येष्ठ कवी शशिकांत तिरोडकर यांनी सादर केलेलया  ' मिठी ' या कवितेला रसिकांची विशेष दाद मिळाली . या प्रसंगी डॉ . ज्योती परब यांच्या ' शब्दसुमने ' या पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन डॉ . विजया वाड आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी प्रा . दिनेश गुप्ता , ख . र . माळवे , डॉ , ज्योती परब , अखिल भारतीय कला , क्रीडा , सांस्कृतिक अकादमी प्रमुख साक्षी परब , वृषाली शिंदे, आरती कुलकर्णी यांच्यासह अन्य उपस्थितीत होते. या संमेलनाचा समारोप 21 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वाजता होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे कवी अशोक नायगावकर व अँड राजेंद्र पै  उपस्थितीत राहणार आहेत. माजी खासदार व पत्रकार भारतकुमार राऊत अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत . या संमेलनात दोन तासांचे  कवितांचे सत्र आयोजित करण्यात आली आहेत.  लहान मुले, विद्यार्थी, अंध, दिव्यांग, पोलीस, स्त्रिया अशा विविध घटकांसाठी स्वतंत्र सत्र होणार  आहे.या संमेलनात कवी गोविंदाग्रज, विष्णू सूर्या वाघ आणि ग. दि. माडगूळकर यांच्या नावाने उभारण्यात येणार्या काव्यमंचावर कवितांचे वाचन होणार आहे. कवी केशवसूत कट्ट्यांतर्गत विविध कवितां संग्रहाचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. तसेच जुन्या - नव्या कवींच्या छायाचित्रांचे प्रदर्शनही या संमेलनात भरवण्यात आले आहे .

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई