शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

कोकण मराठी साहित्य परिषद आणि अनघा प्रकाशन आयोजित ठाण्यात रंगणार अनघोत्सव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 4:42 PM

कोकण मराठी साहित्य परिषद आणि अनघा प्रकाशनतर्फे ठाण्यात अनघोत्सव रंगणार आहे. 

ठळक मुद्देठाण्यात रंगणार अनघोत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष पदमश्री वामन केंद्रे विशेष अतिथी म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुहास पेडणेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ भारतकुमार राऊत

ठाणे :  ४० व्या वर्धापन दिना निमित्त कोकण मराठी साहित्य परिषद आणि अनघा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार १४ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी ५.३० वाजता सहयोग मंदिर,ठाणे (प) येथे अनघोत्सव आयोजित करीत आहोत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पदमश्री वामन केंद्रे असून विशेष अतिथी म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुहास पेडणेकर आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ भारतकुमार राऊत उपस्थित राहणार आहेत अशी माहिती प्रकाशक अमोल नाले यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 

     डॉ विलास खोले आणि प्रा.अनंत देशमुख प्रमुख व्यक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी मधु मंगेश कर्णिक यांची तीन तर डॉ महेश केळुसकर यांची चार पुस्तके प्रकाशित होणार आहेत. यानिमित्ताने मधु मंगेश कर्णिक यांच्या समग्र साहित्याचे संक्षिप्त रूपच महाराष्ट्राच्या जनतेला मिळणार आहेच तर डॉ महेश केळुसकर यांच्या दशावतार, लळीत, चित्रकथी या पुस्तकांमुळे कोकणातल्या लोककलेचा आस्वाद तमाम मराठी माणसाला मिळेल यात शंका नाही तर माझा आवाज या केळुस्करांच्या पुस्तकाने नवोदित वृत्तनिवेदक, शिक्षक आणि प्राध्यापकांना एक उत्तम असे मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच अनघा प्रकाशनाच्या पुसकांच्या परिक्षणाबरोबरच अनघाच्या लेखकांचा परिचय लोकांना व्हावा या उद्देशाने 'अनघावार्ता' या अनियतकालिकाचे प्रकाशन देखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. अनघा प्रकाशनाला यावर्षी ४० वर्षे होत आहेत. कै माधव गडकरी, कै अरुण साधू, कै. अशोक जैन, कै पं यशवंत देव, कै.वसंत भालेकर, कै.इसाक मुजावर,कै. गो.आ. भट, कै. परेन जांभळे, कै.रमेश उदारे यांसारख्या नामवंत लेखकांची तर पुस्तके अनघा प्रकाशनाने प्रकाशित केलीच पण पदमश्री मधु मंगेश कर्णिक, सुलोचनादीदी, डॉ महेश केळुसकर, डॉ भारतकुमार राऊत, डॉ विलास खोले, डॉ मोहिनी वर्दे, माधवी घारपुरे, जोसेफ तुस्कानो, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, चंद्रकांत भोंजाळ, डॉ.प्रदीप कर्णिक, डॉ.विजय पांढरीपांडे, डॉ.नीता पांढरीपांडे, डॉ.सिसिलिया आणि अनेक जुने नविन लेखक आजही हक्काने अनघा कडे लिहीत आहेत.आणि म्हणूनच असं वाटत की अनघाच्या आणि तिच्या संलग्न संस्था म्हणजेच मोनिका प्रकाशन(नाशिक),वेदांत पब्लिशिंग हाऊस(पुणे) आणि अमोल वितरण यांच्या माध्यमातून ही साहित्यरूपी पालखी साहित्याची सेवा करत आहे. अनेक अडचणी आणि अडथळ्यांना पार करत आजवरचा ४0 वर्षाचा प्रवास रात्री झोपतांना शांत झोप देऊन जातो, कारण सर्व नामांकित लेखकांच्या प्रेमाने आणि त्यांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासावरच हे शक्य झाले आणि म्हणूनच मधु मंगेश कर्णिक यांच्या आशीर्वादाने आम्ही उत्तर महाराष्ट्र मराठी साहित्य परिषद स्थापन करू शकलो आणि त्या माध्यमातून तीन साहित्य संमेलने घेऊ शकलो अशी माहिती अमोल नाले यांनी दिली. 

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक