शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

कोकण पदवीधर : डावखरे-आव्हाड संघर्ष रंगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 23:30 IST

कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नजीब मुल्ला यांना उमेदवारी देण्याकरिता आ. जितेंद्र आव्हाड आग्रही असून, भाजपामध्ये प्रवेश केलेल्या निरंजन डावखरे यांना चितपट करण्याकरिता आव्हाड यांनी बाह्या सरसावल्या आहेत.

ठाणे : कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नजीब मुल्ला यांना उमेदवारी देण्याकरिता आ. जितेंद्र आव्हाड आग्रही असून, भाजपामध्ये प्रवेश केलेल्या निरंजन डावखरे यांना चितपट करण्याकरिता आव्हाड यांनी बाह्या सरसावल्या आहेत. त्यामुळे यापूर्वी एकाच पक्षात राहून आडूनआडून राजकीय वैर जपलेल्या आव्हाड-डावखरे यांच्यातील थेट सामना पाहायला मिळणार आहे.डावखरे यांच्याशी असलेल्या स्पर्धेमुळे राष्ट्रवादीच्या वतीने आव्हाड हे डावखरे यांना घेरण्याकरिता मैदानात उतरत आहेत, तर भाजपाचे नाक कापण्याकरिता शिवसेनेने संजय मोरे यांना रिंगणात उतरवल्याने सेनाही डावखरे यांनाच आपला प्रथम क्रमांकाचा शत्रू मानणार आहे. त्यामुळे डावखरे यांना एकाच वेळी आव्हाड व शिवसेना यांच्याशी दोन हात करावे लागणार आहेत. परिणामी, इतिहासात पहिल्यांदाच ही निवडणूक रंगतदार होणार, हे स्पष्ट झाले आहे. तीनही उमेदवार ठाण्यातील असल्याने या निवडणुकीकडे समस्त ठाणेकरांचे लक्ष लागणार आहे. वसंत डावखरे व जितेंद्र आव्हाड हे दोघेही शरद पवार यांचे समर्थक. डावखरे यांची ठाणे जिल्ह्याच्या राजकारणावर फार पूर्वीपासून पकड. आव्हाड हे डावखरे यांच्या तुलनेत तरुण पिढीचे प्रतिनिधी. आव्हाड हे जर ठाण्याच्या राजकारणात मोठे झाले, तर आपली डोकेदुखी वाढेल. त्याचबरोबर, पुत्र निरंजन यांच्या राजकीय वाटचालीत अडचण निर्माण होईल, यामुळे डावखरे हे वेगवेगळ्या मार्गांनी आव्हाड यांना घेरण्याचा प्रयत्न करत होते. नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांचे आणि वसंत डावखरे यांचे संबंध फारसे चांगले नव्हते. मात्र, आव्हाड यांना वाढू न देण्याकरिता डावखरे-नाईक यांची युती होती. नाईक यांचे पुत्र संजीव यांनाही आव्हाड डोकेदुखी ठरतील, अशी भीती असल्याने नाईक हेही आव्हाडांच्या विरोधात भूमिका घेत आले. आव्हाड हे दीर्घकाळ विधान परिषदेचे सदस्य होते. थेट लोकांमधून निवडून येत नसल्याने पवार यांनीही आव्हाड यांचा वापर आंदोलने करणे, घोषणाबाजी करणे, असा मर्यादित केला. मतदार संघ पुनर्रचनेत कळवा-मुंब्रा हा मतदार संघ तयार झाला व आव्हाड यांनी आपले लक्ष केंद्रित करून या मतदार संघावर कब्जा केला.तेव्हापासून ठाण्याच्या राजकारणात डावखरे यांचे महत्त्व कमी होत गेले व आव्हाड आक्रमक झाले. आता तर वसंत डावखरे यांची छत्रछाया निरंजन यांच्यावर नसल्याने आव्हाड राजकीय उट्टं काढण्याकरिता सरसावले आहेत. नजीब हे त्यांचे विश्वासू असल्याने आणि त्यांच्याही राजकीय महत्त्वाकांक्षांना धुमारे फुटू लागल्याची चर्चा आहे. नाईक आव्हाड यांच्या उमेदवाराला किती सहकार्य करणार, याबाबत कुतूहल आहे. साहजिकच, नजीब यांना निवडून आणण्याकरिता आव्हाड यांचीच प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

टॅग्स :thaneठाणे