शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

कोकण पदवीधर : डावखरे-आव्हाड संघर्ष रंगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 23:30 IST

कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नजीब मुल्ला यांना उमेदवारी देण्याकरिता आ. जितेंद्र आव्हाड आग्रही असून, भाजपामध्ये प्रवेश केलेल्या निरंजन डावखरे यांना चितपट करण्याकरिता आव्हाड यांनी बाह्या सरसावल्या आहेत.

ठाणे : कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नजीब मुल्ला यांना उमेदवारी देण्याकरिता आ. जितेंद्र आव्हाड आग्रही असून, भाजपामध्ये प्रवेश केलेल्या निरंजन डावखरे यांना चितपट करण्याकरिता आव्हाड यांनी बाह्या सरसावल्या आहेत. त्यामुळे यापूर्वी एकाच पक्षात राहून आडूनआडून राजकीय वैर जपलेल्या आव्हाड-डावखरे यांच्यातील थेट सामना पाहायला मिळणार आहे.डावखरे यांच्याशी असलेल्या स्पर्धेमुळे राष्ट्रवादीच्या वतीने आव्हाड हे डावखरे यांना घेरण्याकरिता मैदानात उतरत आहेत, तर भाजपाचे नाक कापण्याकरिता शिवसेनेने संजय मोरे यांना रिंगणात उतरवल्याने सेनाही डावखरे यांनाच आपला प्रथम क्रमांकाचा शत्रू मानणार आहे. त्यामुळे डावखरे यांना एकाच वेळी आव्हाड व शिवसेना यांच्याशी दोन हात करावे लागणार आहेत. परिणामी, इतिहासात पहिल्यांदाच ही निवडणूक रंगतदार होणार, हे स्पष्ट झाले आहे. तीनही उमेदवार ठाण्यातील असल्याने या निवडणुकीकडे समस्त ठाणेकरांचे लक्ष लागणार आहे. वसंत डावखरे व जितेंद्र आव्हाड हे दोघेही शरद पवार यांचे समर्थक. डावखरे यांची ठाणे जिल्ह्याच्या राजकारणावर फार पूर्वीपासून पकड. आव्हाड हे डावखरे यांच्या तुलनेत तरुण पिढीचे प्रतिनिधी. आव्हाड हे जर ठाण्याच्या राजकारणात मोठे झाले, तर आपली डोकेदुखी वाढेल. त्याचबरोबर, पुत्र निरंजन यांच्या राजकीय वाटचालीत अडचण निर्माण होईल, यामुळे डावखरे हे वेगवेगळ्या मार्गांनी आव्हाड यांना घेरण्याचा प्रयत्न करत होते. नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांचे आणि वसंत डावखरे यांचे संबंध फारसे चांगले नव्हते. मात्र, आव्हाड यांना वाढू न देण्याकरिता डावखरे-नाईक यांची युती होती. नाईक यांचे पुत्र संजीव यांनाही आव्हाड डोकेदुखी ठरतील, अशी भीती असल्याने नाईक हेही आव्हाडांच्या विरोधात भूमिका घेत आले. आव्हाड हे दीर्घकाळ विधान परिषदेचे सदस्य होते. थेट लोकांमधून निवडून येत नसल्याने पवार यांनीही आव्हाड यांचा वापर आंदोलने करणे, घोषणाबाजी करणे, असा मर्यादित केला. मतदार संघ पुनर्रचनेत कळवा-मुंब्रा हा मतदार संघ तयार झाला व आव्हाड यांनी आपले लक्ष केंद्रित करून या मतदार संघावर कब्जा केला.तेव्हापासून ठाण्याच्या राजकारणात डावखरे यांचे महत्त्व कमी होत गेले व आव्हाड आक्रमक झाले. आता तर वसंत डावखरे यांची छत्रछाया निरंजन यांच्यावर नसल्याने आव्हाड राजकीय उट्टं काढण्याकरिता सरसावले आहेत. नजीब हे त्यांचे विश्वासू असल्याने आणि त्यांच्याही राजकीय महत्त्वाकांक्षांना धुमारे फुटू लागल्याची चर्चा आहे. नाईक आव्हाड यांच्या उमेदवाराला किती सहकार्य करणार, याबाबत कुतूहल आहे. साहजिकच, नजीब यांना निवडून आणण्याकरिता आव्हाड यांचीच प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

टॅग्स :thaneठाणे