शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

कोकण पदवीधर : डावखरे-आव्हाड संघर्ष रंगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 23:30 IST

कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नजीब मुल्ला यांना उमेदवारी देण्याकरिता आ. जितेंद्र आव्हाड आग्रही असून, भाजपामध्ये प्रवेश केलेल्या निरंजन डावखरे यांना चितपट करण्याकरिता आव्हाड यांनी बाह्या सरसावल्या आहेत.

ठाणे : कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नजीब मुल्ला यांना उमेदवारी देण्याकरिता आ. जितेंद्र आव्हाड आग्रही असून, भाजपामध्ये प्रवेश केलेल्या निरंजन डावखरे यांना चितपट करण्याकरिता आव्हाड यांनी बाह्या सरसावल्या आहेत. त्यामुळे यापूर्वी एकाच पक्षात राहून आडूनआडून राजकीय वैर जपलेल्या आव्हाड-डावखरे यांच्यातील थेट सामना पाहायला मिळणार आहे.डावखरे यांच्याशी असलेल्या स्पर्धेमुळे राष्ट्रवादीच्या वतीने आव्हाड हे डावखरे यांना घेरण्याकरिता मैदानात उतरत आहेत, तर भाजपाचे नाक कापण्याकरिता शिवसेनेने संजय मोरे यांना रिंगणात उतरवल्याने सेनाही डावखरे यांनाच आपला प्रथम क्रमांकाचा शत्रू मानणार आहे. त्यामुळे डावखरे यांना एकाच वेळी आव्हाड व शिवसेना यांच्याशी दोन हात करावे लागणार आहेत. परिणामी, इतिहासात पहिल्यांदाच ही निवडणूक रंगतदार होणार, हे स्पष्ट झाले आहे. तीनही उमेदवार ठाण्यातील असल्याने या निवडणुकीकडे समस्त ठाणेकरांचे लक्ष लागणार आहे. वसंत डावखरे व जितेंद्र आव्हाड हे दोघेही शरद पवार यांचे समर्थक. डावखरे यांची ठाणे जिल्ह्याच्या राजकारणावर फार पूर्वीपासून पकड. आव्हाड हे डावखरे यांच्या तुलनेत तरुण पिढीचे प्रतिनिधी. आव्हाड हे जर ठाण्याच्या राजकारणात मोठे झाले, तर आपली डोकेदुखी वाढेल. त्याचबरोबर, पुत्र निरंजन यांच्या राजकीय वाटचालीत अडचण निर्माण होईल, यामुळे डावखरे हे वेगवेगळ्या मार्गांनी आव्हाड यांना घेरण्याचा प्रयत्न करत होते. नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांचे आणि वसंत डावखरे यांचे संबंध फारसे चांगले नव्हते. मात्र, आव्हाड यांना वाढू न देण्याकरिता डावखरे-नाईक यांची युती होती. नाईक यांचे पुत्र संजीव यांनाही आव्हाड डोकेदुखी ठरतील, अशी भीती असल्याने नाईक हेही आव्हाडांच्या विरोधात भूमिका घेत आले. आव्हाड हे दीर्घकाळ विधान परिषदेचे सदस्य होते. थेट लोकांमधून निवडून येत नसल्याने पवार यांनीही आव्हाड यांचा वापर आंदोलने करणे, घोषणाबाजी करणे, असा मर्यादित केला. मतदार संघ पुनर्रचनेत कळवा-मुंब्रा हा मतदार संघ तयार झाला व आव्हाड यांनी आपले लक्ष केंद्रित करून या मतदार संघावर कब्जा केला.तेव्हापासून ठाण्याच्या राजकारणात डावखरे यांचे महत्त्व कमी होत गेले व आव्हाड आक्रमक झाले. आता तर वसंत डावखरे यांची छत्रछाया निरंजन यांच्यावर नसल्याने आव्हाड राजकीय उट्टं काढण्याकरिता सरसावले आहेत. नजीब हे त्यांचे विश्वासू असल्याने आणि त्यांच्याही राजकीय महत्त्वाकांक्षांना धुमारे फुटू लागल्याची चर्चा आहे. नाईक आव्हाड यांच्या उमेदवाराला किती सहकार्य करणार, याबाबत कुतूहल आहे. साहजिकच, नजीब यांना निवडून आणण्याकरिता आव्हाड यांचीच प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

टॅग्स :thaneठाणे