शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

कोंडीवर मेट्रो हा आहे पर्याय - अश्विनी भिडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 03:34 IST

नरेंद्र बल्लाळ व्याख्यानमाला, ठाणे, मीरा-भार्इंदर, वसई ही शहरे वेगाने वाढणार

ठाणे : पुढच्या पिढीसाठी भविष्याचा वेध घ्यावा लागेल. प्रदूषणाची समस्या आणि रस्त्यावरची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मेट्रोचे जाळे उभे करणे आवश्यक आहे. यामुळे रस्त्यावरची वाहतूक कोंडी १०० टक्के सुटेलच असे नाही, वाहनेदेखील कमी होणार नाहीत, पण वाहतुकीसाठी पर्याय म्हणून मेट्रोकडे पाहावे लागेल, असे मत मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी व्यक्त केले.

अर्थ फाउंडेशनतर्फे आयोजित श्रीरंग विद्यालयाच्या पटांगणात सुरू असलेल्या नरेंद्र बल्लाळ स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प शनिवारी भिडे यांनी गुंफले. यावेळी आमदार संजय केळकर, अर्थ फाउंडेशनच्या अ‍ॅड. माधवी नाईक, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ उपस्थित होते. त्या म्हणाल्या की, महानगरातील अक्राळविक्राळ समस्या सोडविण्यासाठी खूप मोठे प्रकल्प हाती घ्यावे लागतात. त्यासाठी सरकारचा व्यापक दृष्टिकोन असतो. भविष्यातील मोठ्या समस्या सोडविताना उद्भवणाऱ्या छोट्या समस्या नागरिकांना सहन कराव्या लागतात आणि तिथून नागरिकांचा विरोध होतो. मुंबईनंतर मेट्रो प्रकल्प ठाण्यात होणार आहे. २०३१मध्ये मुंबईची लोकसंख्या कमी होईल आणि दुसरीकडे उर्वरित शहरांची लोकसंख्या ही अधिकाधिक वाढत जाईल.ठाणे, मीरा-भार्इंदर, वसई, विरार ही शहरे वेगाने वाढणार आहेत. वाढलेल्या शहरांवर सोयीसुविधांचे रोपण करणे कठीण असते. मग सरकारला विविध प्रकल्प हाती घ्यावे लागतात, पण त्याचबरोबर नागरी समस्यांनाही तोंड द्यावे लागते. परंतु यात राज्य सरकार आणि नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असतो. वाढत्या वाहतूक कोंडीवर मेट्रो हा पर्याय आहे. वाढती वाहनांची संख्या हे प्रदूषणाचे मोठे कारण आहे.‘सर्वांचे सहकार्य आवश्यक’भविष्यात मुंबईची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढणार आहे. मेट्रोमुळे प्रवासाची गुणवत्ता चांगली होणार आहे. मेट्रो प्रकल्पामुळे मुंबईचा चेहरा बदलेल. भूमिगत असलेला हा एकमेव प्रकल्प असून भुयारी मार्गातून मेट्रो चालवणे हे मोठे आव्हान आहे. ठाण्यातही हा प्रकल्प हळुहळू राबविला जाईल. मेट्रो प्रकल्प ३ हा २०२१ पर्यंत पूर्ण होईल. मेट्रोतून दररोज १२ लाख प्रवासी प्रवास करतील. एकूण क्षमता १७ लाखांची आहे. इतका मोठा प्रकल्प वेळेत पूर्ण करायचा तर सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :thaneठाणे