शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
5
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
6
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
7
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
8
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
9
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
10
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
11
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
12
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
13
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
14
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
15
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
16
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
17
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
18
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
19
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
20
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?

कोंडीवर मेट्रो हा आहे पर्याय - अश्विनी भिडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 03:34 IST

नरेंद्र बल्लाळ व्याख्यानमाला, ठाणे, मीरा-भार्इंदर, वसई ही शहरे वेगाने वाढणार

ठाणे : पुढच्या पिढीसाठी भविष्याचा वेध घ्यावा लागेल. प्रदूषणाची समस्या आणि रस्त्यावरची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मेट्रोचे जाळे उभे करणे आवश्यक आहे. यामुळे रस्त्यावरची वाहतूक कोंडी १०० टक्के सुटेलच असे नाही, वाहनेदेखील कमी होणार नाहीत, पण वाहतुकीसाठी पर्याय म्हणून मेट्रोकडे पाहावे लागेल, असे मत मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी व्यक्त केले.

अर्थ फाउंडेशनतर्फे आयोजित श्रीरंग विद्यालयाच्या पटांगणात सुरू असलेल्या नरेंद्र बल्लाळ स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प शनिवारी भिडे यांनी गुंफले. यावेळी आमदार संजय केळकर, अर्थ फाउंडेशनच्या अ‍ॅड. माधवी नाईक, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ उपस्थित होते. त्या म्हणाल्या की, महानगरातील अक्राळविक्राळ समस्या सोडविण्यासाठी खूप मोठे प्रकल्प हाती घ्यावे लागतात. त्यासाठी सरकारचा व्यापक दृष्टिकोन असतो. भविष्यातील मोठ्या समस्या सोडविताना उद्भवणाऱ्या छोट्या समस्या नागरिकांना सहन कराव्या लागतात आणि तिथून नागरिकांचा विरोध होतो. मुंबईनंतर मेट्रो प्रकल्प ठाण्यात होणार आहे. २०३१मध्ये मुंबईची लोकसंख्या कमी होईल आणि दुसरीकडे उर्वरित शहरांची लोकसंख्या ही अधिकाधिक वाढत जाईल.ठाणे, मीरा-भार्इंदर, वसई, विरार ही शहरे वेगाने वाढणार आहेत. वाढलेल्या शहरांवर सोयीसुविधांचे रोपण करणे कठीण असते. मग सरकारला विविध प्रकल्प हाती घ्यावे लागतात, पण त्याचबरोबर नागरी समस्यांनाही तोंड द्यावे लागते. परंतु यात राज्य सरकार आणि नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असतो. वाढत्या वाहतूक कोंडीवर मेट्रो हा पर्याय आहे. वाढती वाहनांची संख्या हे प्रदूषणाचे मोठे कारण आहे.‘सर्वांचे सहकार्य आवश्यक’भविष्यात मुंबईची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढणार आहे. मेट्रोमुळे प्रवासाची गुणवत्ता चांगली होणार आहे. मेट्रो प्रकल्पामुळे मुंबईचा चेहरा बदलेल. भूमिगत असलेला हा एकमेव प्रकल्प असून भुयारी मार्गातून मेट्रो चालवणे हे मोठे आव्हान आहे. ठाण्यातही हा प्रकल्प हळुहळू राबविला जाईल. मेट्रो प्रकल्प ३ हा २०२१ पर्यंत पूर्ण होईल. मेट्रोतून दररोज १२ लाख प्रवासी प्रवास करतील. एकूण क्षमता १७ लाखांची आहे. इतका मोठा प्रकल्प वेळेत पूर्ण करायचा तर सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :thaneठाणे