शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

कोंडीवर मेट्रो हा आहे पर्याय - अश्विनी भिडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 03:34 IST

नरेंद्र बल्लाळ व्याख्यानमाला, ठाणे, मीरा-भार्इंदर, वसई ही शहरे वेगाने वाढणार

ठाणे : पुढच्या पिढीसाठी भविष्याचा वेध घ्यावा लागेल. प्रदूषणाची समस्या आणि रस्त्यावरची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मेट्रोचे जाळे उभे करणे आवश्यक आहे. यामुळे रस्त्यावरची वाहतूक कोंडी १०० टक्के सुटेलच असे नाही, वाहनेदेखील कमी होणार नाहीत, पण वाहतुकीसाठी पर्याय म्हणून मेट्रोकडे पाहावे लागेल, असे मत मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी व्यक्त केले.

अर्थ फाउंडेशनतर्फे आयोजित श्रीरंग विद्यालयाच्या पटांगणात सुरू असलेल्या नरेंद्र बल्लाळ स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प शनिवारी भिडे यांनी गुंफले. यावेळी आमदार संजय केळकर, अर्थ फाउंडेशनच्या अ‍ॅड. माधवी नाईक, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ उपस्थित होते. त्या म्हणाल्या की, महानगरातील अक्राळविक्राळ समस्या सोडविण्यासाठी खूप मोठे प्रकल्प हाती घ्यावे लागतात. त्यासाठी सरकारचा व्यापक दृष्टिकोन असतो. भविष्यातील मोठ्या समस्या सोडविताना उद्भवणाऱ्या छोट्या समस्या नागरिकांना सहन कराव्या लागतात आणि तिथून नागरिकांचा विरोध होतो. मुंबईनंतर मेट्रो प्रकल्प ठाण्यात होणार आहे. २०३१मध्ये मुंबईची लोकसंख्या कमी होईल आणि दुसरीकडे उर्वरित शहरांची लोकसंख्या ही अधिकाधिक वाढत जाईल.ठाणे, मीरा-भार्इंदर, वसई, विरार ही शहरे वेगाने वाढणार आहेत. वाढलेल्या शहरांवर सोयीसुविधांचे रोपण करणे कठीण असते. मग सरकारला विविध प्रकल्प हाती घ्यावे लागतात, पण त्याचबरोबर नागरी समस्यांनाही तोंड द्यावे लागते. परंतु यात राज्य सरकार आणि नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असतो. वाढत्या वाहतूक कोंडीवर मेट्रो हा पर्याय आहे. वाढती वाहनांची संख्या हे प्रदूषणाचे मोठे कारण आहे.‘सर्वांचे सहकार्य आवश्यक’भविष्यात मुंबईची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढणार आहे. मेट्रोमुळे प्रवासाची गुणवत्ता चांगली होणार आहे. मेट्रो प्रकल्पामुळे मुंबईचा चेहरा बदलेल. भूमिगत असलेला हा एकमेव प्रकल्प असून भुयारी मार्गातून मेट्रो चालवणे हे मोठे आव्हान आहे. ठाण्यातही हा प्रकल्प हळुहळू राबविला जाईल. मेट्रो प्रकल्प ३ हा २०२१ पर्यंत पूर्ण होईल. मेट्रोतून दररोज १२ लाख प्रवासी प्रवास करतील. एकूण क्षमता १७ लाखांची आहे. इतका मोठा प्रकल्प वेळेत पूर्ण करायचा तर सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :thaneठाणे