शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

खंडणीसाठी अपहरण केलेल्या मुलाची हत्या, भार्इंदरमधील घटना : पवई पोलिसांकडून दोघांना अटक, सीसीटीव्ही फूटेजमुळे उलगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 03:33 IST

मुंबईतील पवई येथून खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या १० वर्षांच्या मुलाची भार्इंदरच्या आझाद नगरमधील महापालिका मैदानात गळा आवळून हत्या करण्यात आली.

मीरा रोड : मुंबईतील पवई येथून खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या १० वर्षांच्या मुलाची भार्इंदरच्या आझाद नगरमधील महापालिका मैदानात गळा आवळून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पवई पोलिसांनी दोघांना मंगळवारी अटक केली आहे.पवईतील बबलू सिंग यांचा १० वर्षांचा मुलगा रितेश रविवारी दुपारपासून बेपत्ता होता. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. बबलू यांचा चुलत भाऊ संतोष सिंगसोबत काम करणारा अमर सिंग (२०) याने त्याला खेळण्यासाठी म्हणून नेले. त्यानंतर तो बेपत्ता झाला होता. अमरने मात्र मुलाला घराजवळच सोडले, असा कांगावा केला होता.दरम्यान, पोलिसांना अंधेरी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फूटेजमध्ये रितेशला घेऊन जाताना अमर व त्याचा साथीदार लालू ननकू सिंग (२१) दिसले. त्यानंतर अमरला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने लालूला सामील होऊन रितेशची हत्या केल्याचे कबूल केले. त्यानंतर या दोघांना अटक करीत मंंगळवारी पहाटे पवई पोलिसांच्या पथकाने मैदानात टाकलेला रितेशचा मृतदेह ताब्यात घेतला.फोनमुळे घाबरल्याने रितेशला संपवले-बबलू सिंग यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे, मात्र त्यांच्या घरी रोज जाणे-येणे असलेल्या अमर सिंग याने बबलू यांना एकदा पैसे मोजताना पाहिले होते. त्यामुळे बबलू यांच्याकडे भरपूर पैसे आहेत या समजातून त्यांच्या मुलाचे अपहरण त्याने केले. मात्र मुलगा हरवल्यानंतर माझा मुलगा कुठे आहे, हे विचारण्यासाठी बबलू यांनी अमर याला फोन केल्याने घाबरलेल्या अमरने रितेश याची हत्या केली.ज्या मैदानात हत्या केली ते पालिकेच्या मालकीचे असून येथे भंगाराची गोदामे, झोपड्यांचे अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे मद्यपी, गर्दुल्ल्यांचा राबता असतो. एक वर्षापूर्वी ६ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून येथे तिची हत्या केली होती.

टॅग्स :MurderखूनKidnappingअपहरणMumbaiमुंबई