शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

खंडणीसाठी अपहरण केलेल्या मुलाची हत्या, भार्इंदरमधील घटना : पवई पोलिसांकडून दोघांना अटक, सीसीटीव्ही फूटेजमुळे उलगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 03:33 IST

मुंबईतील पवई येथून खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या १० वर्षांच्या मुलाची भार्इंदरच्या आझाद नगरमधील महापालिका मैदानात गळा आवळून हत्या करण्यात आली.

मीरा रोड : मुंबईतील पवई येथून खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या १० वर्षांच्या मुलाची भार्इंदरच्या आझाद नगरमधील महापालिका मैदानात गळा आवळून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पवई पोलिसांनी दोघांना मंगळवारी अटक केली आहे.पवईतील बबलू सिंग यांचा १० वर्षांचा मुलगा रितेश रविवारी दुपारपासून बेपत्ता होता. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. बबलू यांचा चुलत भाऊ संतोष सिंगसोबत काम करणारा अमर सिंग (२०) याने त्याला खेळण्यासाठी म्हणून नेले. त्यानंतर तो बेपत्ता झाला होता. अमरने मात्र मुलाला घराजवळच सोडले, असा कांगावा केला होता.दरम्यान, पोलिसांना अंधेरी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फूटेजमध्ये रितेशला घेऊन जाताना अमर व त्याचा साथीदार लालू ननकू सिंग (२१) दिसले. त्यानंतर अमरला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने लालूला सामील होऊन रितेशची हत्या केल्याचे कबूल केले. त्यानंतर या दोघांना अटक करीत मंंगळवारी पहाटे पवई पोलिसांच्या पथकाने मैदानात टाकलेला रितेशचा मृतदेह ताब्यात घेतला.फोनमुळे घाबरल्याने रितेशला संपवले-बबलू सिंग यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे, मात्र त्यांच्या घरी रोज जाणे-येणे असलेल्या अमर सिंग याने बबलू यांना एकदा पैसे मोजताना पाहिले होते. त्यामुळे बबलू यांच्याकडे भरपूर पैसे आहेत या समजातून त्यांच्या मुलाचे अपहरण त्याने केले. मात्र मुलगा हरवल्यानंतर माझा मुलगा कुठे आहे, हे विचारण्यासाठी बबलू यांनी अमर याला फोन केल्याने घाबरलेल्या अमरने रितेश याची हत्या केली.ज्या मैदानात हत्या केली ते पालिकेच्या मालकीचे असून येथे भंगाराची गोदामे, झोपड्यांचे अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे मद्यपी, गर्दुल्ल्यांचा राबता असतो. एक वर्षापूर्वी ६ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून येथे तिची हत्या केली होती.

टॅग्स :MurderखूनKidnappingअपहरणMumbaiमुंबई