शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

कोयत्याने वार करुन खूनी हल्ला करणाऱ्यास दिड वर्षांनी अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 01:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : टोळी युद्धातून सुमित सकपाळ (२४, रा. घोडबंदर रोड, ठाणे ) या तरुणांवर आपल्या चार ...

ठळक मुद्देठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाईचौघांना झाली होती यापूर्वीच अटक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: टोळी युद्धातून सुमित सकपाळ (२४, रा. घोडबंदर रोड, ठाणे) या तरुणांवर आपल्या चार साथीदारांच्या मदतीने कोयत्याने खूनी हल्ला करुन गेल्या दिड वर्षांपासून पसार झालेल्या अरबाज उर्फ बाबू खवºया मकबूल खान याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने मंगळवारी अटक केली. त्याला आता कासारवडवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.घोडबंदर रोड येथे राहणारा सुमित हा आपल्या मित्राच्या वाढदिवसाची पार्टी साजरी करुन ६ एप्रिल २०१९ रोजी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास घराकडे येत होता. त्यावेळी तो हिरानंदानी इस्टेट येथील ‘द वॉक’ या इमारतीच्या शेजारी उभा असताना मोटारसायकलवरु न आलेल्या एका टोळक्याने त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. त्यानंतर पाच जणांच्या टोळक्यापैकी तिघांनी सकपाळ यांना पकडले. तर चौथ्याने त्याच्या डाव्या पायाजवळ कोयत्याने हल्ला केला होता. यात सकपाळ याच्या उजव्या कानाजवळ, डाव्या डोळयाच्या वर आणि कपाळावरही गंभीर जखमी केले. या झटापटीत त्याची सोनसाखळीही गहाळ झाली होती. हल्ल्यानंतर हे टोळके तिथून पसार झाले होते. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. यात चौघांना अटक करण्यात आली होती. मात्र, त्याचा पाचवा साथीदार अरबाज हा पसार झाला होता. कासारवडवली पोलीस आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे युनिट एकचे पथक गेल्या दिड वर्षांपासून त्याच्या मागावर होते. दरम्यान, अरबाज ठाण्यातील धर्मवीर नगर येथे येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार आनंदा भिलारे यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे ६ आॅक्टोबर रोजी अरबाजला वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने अटक केली. त्याने आपला गुन्हा कबूल केला असून त्याला कासारवडवली पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाने सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMurderखून