शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल चालत नसल्यामुळे ठाण्यात मालकिणीने केले आचाऱ्याचे अपहरण: दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 21:04 IST

हॉटेल तोटयात जात असल्यामुळे कासारवडवलीतील ‘सखी किचन’च्या हॉटेल मालकिणीने चक्क पूर्वाश्रमीच्या आचा-याचेच अपहरण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली.

ठळक मुद्देसोडून गेलेल्या आचा-याला मालकीणीची दमबाजीपुन्हा कामावर येण्यासाठी केले अपहरणपत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी केली सुटका

ठाणे : आचारी सोडून गेल्यानंतर हॉटेल चालत नसल्यामुळे संजू राणा (२२, रा. किंगकाँगनगर, ठाणे) या आचा-याचे अपहरण करणा-या अश्विनी हाडके या हॉटेलमालकिणीविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कृष्णकुमार पटेल (१९) आणि दीपू आदिवासी (२२, रा. दोघेही किंगकाँगनगर, ठाणे) या तिच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून अपहृत आचा-याची अवघ्या २४ तासांत सुटका केली आहे.ठाण्याच्या हिरानंदानी इस्टेट येथे असलेल्या ‘सखी किचन’ या अश्विनी यांच्या हॉटेलमध्ये संजू हा गेल्या दीड वर्षापासून आचारी म्हणून नोकरीला होता. त्यापोटी त्याला १५ हजार रुपये पगार दिला जायचा. त्याच्यासह त्याची पत्नी लक्ष्मी आणि मेहुणी पार्वती या दोघीही तिथे नोकरीला होत्या. काही कारणास्तव जेवणाची आॅर्डर रद्द झाली किंवा ते उशिरा कामावर आले की, संजूसह या तिघांचाही हॉटेलमालकीण अश्विनी पगारकपात करून दरमहिन्याला अवघा दोन ते तीन हजार रुपये पगार द्यायची. या सर्वच प्रकाराला कंटाळून संजूसह तिघांनीही १५ दिवसांपूर्वी तिच्याकडील काम सोडले. त्यानंतर, भूमी एकर येथील आर.बी. किचन यांच्या हॉटेलमध्ये तो आचारी म्हणून गेल्या १४ दिवसांपासून नोकरीला लागला. संजू यांनी काम सोडल्यानंतर हॉटेलवर परिणाम झाल्यामुळे अश्विनी यांचा मोठ्या प्रमाणात तोटा झाला. याच रागातून ४ मे २०१८ रोजी रात्री ९ वाजता आर.बी. किचनमध्ये असलेल्या संजूला अश्विनी हिने दमदाटी केली. कृष्णकुमार आणि दीपू या दोन मुलांच्या मदतीने तिने संजूला एका रिक्षामध्ये कोंबून त्याचे अपहरण केले. ‘तू हॉटेल सोडून गेल्यापासून माझे हॉटेल बंद झाले. तू माझ्या हॉटेलमध्ये काम केले नाही, तर मी तुला एखाद्या केसमध्ये फसवून टाकेल’, अशी धमकीही देऊन त्याला ब्रह्मांड भागात सोडले. त्यानंतर, पुन्हा आर.बी. किचनमधून त्याचे अश्विनीसह तिघांनी अपहरण करून रिक्षातून नेले. याप्रकरणी संजूची पत्नी लक्ष्मी हिने कासारवडवली पोलीस ठाण्यात पतीचे अश्विनीसह तिघांनी अपहरण केल्याची तक्रार दाखल केली.ही तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता ढोले, निरीक्षक नासीर कुलकर्णी आणि उपनिरीक्षक एम.के. पोटे यांच्या पथकाने ५ मे रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास संजूची सुटका केली. लक्ष्मीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अश्विनीकडे संजूची चौकशी केल्यानंतर तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. संजू त्याचा गाववाला शंकर याच्याकडे गेल्याची माहिती देऊन पोलिसांची तिने दिशाभूल केली. नंतर, डोंगरीपाडा भागातून कृष्णकुमार आणि दीपू यांच्या ताब्यातून पोलिसांनी संजूची सुखरूप सुटका केली. यातील मुख्य सूत्रधार अश्विनीलाही लवकरच अटक केली जाईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढोले यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाKidnappingअपहरण