शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘खुजे हिंदुत्व असलेल्यांनी ठाकरे यांना डावलले’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 02:45 IST

कल्याणमधील राजेंद्र देवळेकर हे १९८७ साली भारतीय विद्यार्थी सेनेचे शहर सरचिटणीस होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आदेशानुसार राज्यातील वेगवेगळ्या शहरांत रामशिलापूजन करण्यास सांगण्यात आले होते

कल्याण : रामशिलापूजन ते कारसेवा हे सगळे वातावरण हिंदुत्वाच्या विचारांनी भारावलेले होते. राममंदिर उभारणीच्या त्या आंदोलनात शिवसेनेचा मोठा पुढाकार होता. आम्ही दोघे त्या सर्व घडामोडींचे साक्षीदार आहोत. ही पार्श्वभूमी असतानाही राममंदिर भूमिपूजन कार्यक्रमास शिवसेनापक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रित न करण्याबद्दल कल्याणमधील शिवसैनिकांच्या मनात प्रचंड खदखद आणि संताप आहे, असे या दोघांनी सांगितले.

कल्याणमधील राजेंद्र देवळेकर हे १९८७ साली भारतीय विद्यार्थी सेनेचे शहर सरचिटणीस होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आदेशानुसार राज्यातील वेगवेगळ्या शहरांत रामशिलापूजन करण्यास सांगण्यात आले होते. त्यावेळी देवळेकर यांनी त्यांच्या प्रभागात रामशिलापूजन केले होते. प्रत्येक प्रभागात ती रामशिला रथातून फिरवली जात होती. एकप्रकारे ते राममंदिर उभारणीचे जनजागरण सुरू होते. ‘सौगंध राम की खाते है, मंदिर वही बनायेंगे’, ‘बच्चा बच्चा राम का, जन्मभूमी के काम का’, ‘जिस हिंदू का खून न खौले, वो खून नही पानी है’,‘राम भक्ती के काम न आये वो बेकार जवानी है’, या घोषणा त्यावेळी दिल्या जात होत्या. त्याचवेळी ठाण्यातील चंदनवाडी शिवसेना शाखेने गणेशोत्सवात दिघे यांच्या देखरेखीखाली राम मंदिराचा भव्य देखावा तयार केला होता. आधी मंदिर आणि मग धनुर्धारी रामाची ५२ फुटी प्रतिमा जमिनीतून वर येत होती. हा देखावा सगळ्यांचे लक्ष वेधत होता. या आंदोलनात शिवसेनेचा पुढाकार होता.कॉलेजजीवनापासून शिवसैनिक असलेले कल्याणचे सचिन बासरे यांनी १९८७ साली ‘श्रीराम’नाम कोरलेली वीट घेऊन घरोघरी फिरविली. महिला त्या विटेची मनोभावे पूजा करीत. एका विटेची किंमत पाच रुपये याप्रमाणे लोक राममंदिराच्या उभारणीसाठी वर्गणी देत होते. त्यावेळी ‘सभी करो करसेवा, वक्त की आवाज है, रामजी का काज है’, ‘जो राम मंदिर मे टांग अडायेंगा, माँ कसम जिंदा न छोडेंगे’, यासारख्या घोषणा दिल्या जात होत्या. रामशिलापूजन, कारसेवा, त्यानंतर बाबरी मशिदीच्या घुमटावर जे कोठारी बंधू चढले होते, भगवा झेंडा लावला होता, त्या कोठारी बंधूंची हत्या करण्यात आली. त्यांचे वडील नंतर कल्याणला आले होते. आनंद दिघे यांनी त्यांच्या वडिलांना कल्याणला आणले होते, तेव्हा त्यांची भेट झाली होती. ‘शरयू नदी लाल झाली’, असा अग्रलेख सामनामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी लिहिला होता. लखनऊ येथे दिघेसाहेब व संगीतकार सुधीर फडके यांना अटक झाली होती. त्याच्या बातम्या छापून आल्या होत्या. हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजप शिवसेनेची युती झाली. तेव्हा ठाणे व डहाणू मतदारसंघांतून शिवसेनेचा उमेदवार नव्हता. ठाण्यातून भाजपचे रामभाऊ कापसे, डहाणूतून चिंतामण वनगा हे दोन उमेदवार होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी कल्याणला जाहीर सभा घेतली. हिंदुत्वाच्या लाटेवर हे दोन्ही उमेदवार निवडून आले होते. ‘गर्व से कहो, हम हिंदू है’ ही घोषणा शिवसेनेने विलेपार्लेच्या पोटनिवडणुकीत दिली होती. त्यावेळी रमेश प्रभू यांची आमदारकी हिंदुत्वाच्या मुद्यावरून रद्द झाली होती. प्रभू व बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा हक्क काढून घेतला होता. शिवसेनेने वेळप्रसंगी मराठीचा मुद्दा बाजूला ठेवून हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला. उद्धव ठाकरे यांनी राममंदिराचा मुद्दा पुन्हा हाती घेतल्यानेच केंद्र सरकारला मंदिर उभारणीची जाणीव झाली. या कार्यक्रमावर पहिला अधिकार शिवसेनेचा आहे. भाजपने देशातील सगळ्या मुख्यमंत्र्यांना बोलवायला हवे होते. हिंदुत्व खुजे असलेल्यांनी ठाकरे यांना डावलले, ही अत्यंत खेदाची बाब आहे.- शब्दांकन : मुरलीधर भवार

‘राममंदिराच्या मुद्यावर भाजप मते मागत राहिली. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी राममंदिराच्या आश्वासनाची पूर्तता केली नाही, तेव्हा हा विषय उद्धव ठाकरे यांनी अजेंड्यावर आणला. ते स्वत: राममंदिराच्या ठिकाणी गेले. एकीकडे हिंदुत्व संघटनांनी एकत्रित आले पाहिजे, असे भाजपचे नेते बोलतात, तर दुसरीकडे शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी संघटनेला डावलून त्यांचे खच्चीकरण करते. सगळे माझ्याच बापाचे आहे, ही वृत्ती भाजपची आहे.’ 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरShiv Senaशिवसेनाthaneठाणे