शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
5
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
6
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
7
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
8
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
9
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
10
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
11
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
12
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
13
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
14
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
15
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
16
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
18
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
19
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
20
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!

‘खेलो इंडिया’मुळे मैदानी खेळांचे महत्त्व वाढले - देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 00:36 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ‘खेलो इंडिया’ या संकल्पनेमुळे मैदानी खेळांचे महत्त्व वाढले असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ‘खेलो इंडिया’ या संकल्पनेमुळे मैदानी खेळांचे महत्त्व वाढले असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.शहराच्या पूर्व भागातील दादासाहेब गायकवाड मैदानात महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने कै. अनिल कर्पे स्मृतिप्रीत्यर्थ भव्य कबड्डी स्पर्धांचे आयोजन केले आहे. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पुढाकाराने हे आयोजन करण्यात आले आहे. नव तरुण मंडळ या स्पर्धेचे आयोजक आहे. या मंडळाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून कबड्डी स्पर्धेला विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी भेट दिली. याप्रसंगी फडणवीस यांनी उपरोक्त प्रतिपादन केले. याप्रसंगी आमदार रवींद्र चव्हाण, माजी आमदार नरेंद्र पवार, आयुक्त गोविंद बोडके, नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, माजी नगरसेवक सचिन पोटे आदी मान्यवर उपस्थित होते. फडणवीस यांनी कबड्डीपटंूशी हस्तांदोलन केले. तसेच एका सामन्यासाठी त्यांनी नाणेफेक करून सामन्याची सुरुवात केली. काही वेळ त्यांनी सामना पाहिला. कबड्डी हा आपल्या मातीतील खेळ असून त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. काही संघ हरले असले तरी त्यांनी पुन्हा नव्या दमाने तयारी करावी. पुढच्या काळात त्यांना यश नक्कीच मिळणार, असे आवाहन फडणवीस यांनी सर्व क्रीडापटूंना केले. या स्पर्धेत ३३ संघ उतरले असून आयोजक आमदार गायकवाड यांच्या उत्कृष्ट आयोजनाविषयी फडणवीस यांनी गौरवोद्गार काढले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसKhelo India 2019खेलो इंडिया 2019