शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर खड्डे व सांडपाणी; म्हारळ ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 18:30 IST

कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महार्गावर म्हारळ पाडा व म्हारळ गावानजीक खड्डे पडले असून त्याठिकाणी महामार्गाच्या रस्त्याची अक्षरक्ष: चाळण झाली आहे. तसेच रस्त्याच्या कडेला वाहणारी गटारे तुडुंब भरल्याने सांडपाणी महामार्गावरुन वाहत आहे.

कल्याण- कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महार्गावर म्हारळ पाडा व म्हारळ गावानजीक खड्डे पडले असून त्याठिकाणी महामार्गाच्या रस्त्याची अक्षरक्ष: चाळण झाली आहे. तसेच रस्त्याच्या कडेला वाहणारी गटारे तुडुंब भरल्याने सांडपाणी महामार्गावरुन वाहत आहे. त्यातून वाहन चालकांना मार्गक्रमण करीत वाट काढावी लागते. या सांडपाण्याकडे म्हारळ ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष आहे. तसेच सार्वजनीक बांधकाम खात्याकडे खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. कल्याण अहमदनगर हा राष्ट्रीय महामार्ग 222 आहे. हा रस्ता शहरी भागात अरुंद स्वरुपाचा आहे. सेंच्युरी रेयॉनचे गेट सोडले की पुढे तो प्रशस्त आहे. या रस्त्यावर म्हारळ हे गाव आहे. म्हारळ गावात जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समितीचे तीन गण आहेत. नुकतीच पंचातय समितीची व जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडली. यात सोयी सुविधा पुरविण्याची आश्वासने देण्यात आली. मात्र निवडणूक संपून निकाल लागला तरी सोयी सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. म्हारळ ग्रामपंचायतीला लागूनच उल्हासनगर व कल्याण शहर असल्याने या ठिकाणी म्हारळ ग्रामपंयात हद्दीत नागरीकरण होत आहे. या नागरीकरणामुळे म्हारळ ग्रामपंचायत आर्थिक दृष्टय़ा सक्षम आहे. वर्षाला एक कोटी रुपये ग्रामपंचातीला उत्पन्न मिळते. चांगला महसूल जमा होतो. महसूल जमा होऊन देखील महामार्गानजीक असलेली गटारे स्वच्छ केली जात नाही. सगळे सांडपाणी महामार्गावरून वाहत आहे. पावसाळ्य़ाती जलसदृश्य परिस्थिती व्हावी अशी स्थिती त्याठिकाणी पाहावयास मिलते. दुसरीकडे याच रस्त्यावर म्हारळपाडा येथे रस्ता इतका खराब झाला आहे की त्यावर खड्डे पडले आहेत. हा महामार्ग आहे की, ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एखाद्या पाडय़ावर जाणारा मार्ग आहे अशी स्थिती आहे. सार्वजनीक बांधकाम खात्याकडून या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकडे अक्षम्य डोळे झाक केली जात आहे. महामार्गावरुन जाणारी चार चाकी व दुकाकी वाहने खड्डय़ातूनच वाट काढीत वाहने हाकत आहेत. रात्रीच्या वेळी तर नगरहून माल घेऊन येणा-या मालवाहू वाहनांना खडडय़ामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या महामार्गाचे चौपदीरकरण होणार आहे. हे चौपदरीकरण प्रस्तावित आहे. त्याच्या कामसाठी हा मार्ग दहा दिवस बंद ठेवण्यात येणार होता. मात्र निवडणूकीत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी चौपदरी करणाच्या कामाचे प्राथमिक काम पुढे ढकलण्यात आले. 

टॅग्स :kalyanकल्याण