शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर खड्डे व सांडपाणी; म्हारळ ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 18:30 IST

कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महार्गावर म्हारळ पाडा व म्हारळ गावानजीक खड्डे पडले असून त्याठिकाणी महामार्गाच्या रस्त्याची अक्षरक्ष: चाळण झाली आहे. तसेच रस्त्याच्या कडेला वाहणारी गटारे तुडुंब भरल्याने सांडपाणी महामार्गावरुन वाहत आहे.

कल्याण- कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महार्गावर म्हारळ पाडा व म्हारळ गावानजीक खड्डे पडले असून त्याठिकाणी महामार्गाच्या रस्त्याची अक्षरक्ष: चाळण झाली आहे. तसेच रस्त्याच्या कडेला वाहणारी गटारे तुडुंब भरल्याने सांडपाणी महामार्गावरुन वाहत आहे. त्यातून वाहन चालकांना मार्गक्रमण करीत वाट काढावी लागते. या सांडपाण्याकडे म्हारळ ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष आहे. तसेच सार्वजनीक बांधकाम खात्याकडे खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. कल्याण अहमदनगर हा राष्ट्रीय महामार्ग 222 आहे. हा रस्ता शहरी भागात अरुंद स्वरुपाचा आहे. सेंच्युरी रेयॉनचे गेट सोडले की पुढे तो प्रशस्त आहे. या रस्त्यावर म्हारळ हे गाव आहे. म्हारळ गावात जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समितीचे तीन गण आहेत. नुकतीच पंचातय समितीची व जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडली. यात सोयी सुविधा पुरविण्याची आश्वासने देण्यात आली. मात्र निवडणूक संपून निकाल लागला तरी सोयी सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. म्हारळ ग्रामपंचायतीला लागूनच उल्हासनगर व कल्याण शहर असल्याने या ठिकाणी म्हारळ ग्रामपंयात हद्दीत नागरीकरण होत आहे. या नागरीकरणामुळे म्हारळ ग्रामपंचायत आर्थिक दृष्टय़ा सक्षम आहे. वर्षाला एक कोटी रुपये ग्रामपंचातीला उत्पन्न मिळते. चांगला महसूल जमा होतो. महसूल जमा होऊन देखील महामार्गानजीक असलेली गटारे स्वच्छ केली जात नाही. सगळे सांडपाणी महामार्गावरून वाहत आहे. पावसाळ्य़ाती जलसदृश्य परिस्थिती व्हावी अशी स्थिती त्याठिकाणी पाहावयास मिलते. दुसरीकडे याच रस्त्यावर म्हारळपाडा येथे रस्ता इतका खराब झाला आहे की त्यावर खड्डे पडले आहेत. हा महामार्ग आहे की, ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एखाद्या पाडय़ावर जाणारा मार्ग आहे अशी स्थिती आहे. सार्वजनीक बांधकाम खात्याकडून या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकडे अक्षम्य डोळे झाक केली जात आहे. महामार्गावरुन जाणारी चार चाकी व दुकाकी वाहने खड्डय़ातूनच वाट काढीत वाहने हाकत आहेत. रात्रीच्या वेळी तर नगरहून माल घेऊन येणा-या मालवाहू वाहनांना खडडय़ामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या महामार्गाचे चौपदीरकरण होणार आहे. हे चौपदरीकरण प्रस्तावित आहे. त्याच्या कामसाठी हा मार्ग दहा दिवस बंद ठेवण्यात येणार होता. मात्र निवडणूकीत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी चौपदरी करणाच्या कामाचे प्राथमिक काम पुढे ढकलण्यात आले. 

टॅग्स :kalyanकल्याण