शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

खारीगाव आरओबी जानेवारीपर्यंत खुला होणार,  खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली कामाची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 18:21 IST

खारीगाव येथील रेल्वे फाटकामुळे येथे अनेकदा लोकल थांबवाव्या लागतात. तसेच, कमी वेगात लोकल चालवाव्या लागतात. याचा परिणाम रेल्वेच्या वेळापत्रकावर होत असून गाड्या विलंबाने धावणे, तसेच लोकलच्या फेऱ्या वाढवता न येणे आदी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

ठाणे - कळवा आणि मुंब्रा दरम्यान ठाणे महापालिका आणि रेल्वे संयुक्तरित्या करत असलेल्या खारीगाव आरओबीचे काम जानेवारी २०२१ पर्यंत पूर्ण होऊन तो सेवेत दाखल होईल. त्यामुळे खारीगाव येथील रेल्वे फाटक बंद होऊन उपनगरी सेवेच्या किमान ५० फेऱ्या वाढवून प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर दिलासा देणे शक्य होईल, असा विश्वास कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी येथे व्यक्त केला.खारीगाव येथील रेल्वे फाटकामुळे येथे अनेकदा लोकल थांबवाव्या लागतात. तसेच, कमी वेगात लोकल चालवाव्या लागतात. याचा परिणाम रेल्वेच्या वेळापत्रकावर होत असून गाड्या विलंबाने धावणे, तसेच लोकलच्या फेऱ्या वाढवता न येणे आदी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे खारीगाव येथील हे फाटक बंद करून या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, प्रत्यक्ष कामाला वेग येत नव्हता. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी २०१४ मध्ये खासदार झाल्यानंतर या प्रकल्पासमोरील अडचणी दूर करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. उड्डाणपुलाच्या खारीगाव येथील बाजूस असलेल्या मैदानाचे या उड्डाणपुलामुळे दोन भागात विभाजन होत असल्यामुळे तेथील नागरिकांचा या प्रकल्पाला विरोध होता. तसेच, पलिकडील बाजूस मफतलाल कंपनीची जमीन असल्यामुळे तेथेही उड्डाणपुल उतरवण्यासंदर्भात अडचणी होत्या. त्यामुळे रेल्वेने त्यांच्या हद्दीतील कामाला सुरुवात केली तरी, ठाणे महापालिकेच्या वाट्याच्या कामाला म्हणावी तशी गती येत नव्हती.त्यामुळे खा. डॉ. शिंदे यांनी रेल्वे प्रशासन, ठाणे महापालिका आणि स्थानिकांच्या वारंवार बैठका घेतल्या. उड्डाणपुलाच्या खारीगाव बाजूकडील आरेखनात बदल करून मैदान वाचवले. त्यामुळे स्थानिकांचा विरोध मावळला. तसेच, पलिकडील बाजूस लागणाऱ्या जमिनीसाठी ठाणे महापालिकेने ४० कोटी रुपयांचा मोबदला दिल्यामुळे तेथील प्रश्नही निकाली निघाला. सर्व अडचणी दूर झाल्यामुळे कामाला वेगाने सुरुवात झाली होती. परंतु, अचानक उद्भवलेल्या कोव्हिडच्या संकटामुळे पुन्हा कामाला खीळ बसली. कोव्हिडचे संकट आले नसते तर आतापर्यंत काम पूर्ण होऊन हा पूल सेवेत दाखल झाला असता.मात्र, आता पुन्हा एकदा कामाला सुरुवात झाली असून खा. डॉ. शिंदे यांनी सोमवारी या कामाची पाहणी केली. पुलाचे ७३ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम वेगाने पूर्ण होऊन जानेवारीपर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे निर्देश खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी दिले. याप्रसंगी ठाणे महापालिकेचे कार्यकारी अभियंता पाफळकर, अन्य अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणे