शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

खंबाळपाडा मार्गाची खड्ड्यांनी झाली चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : एकीकडे केडीएमसीच्या हद्दीतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ संबंधित यंत्रणेविरोधात राजकीय पक्षांकडून आंदोलने छेडली जात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : एकीकडे केडीएमसीच्या हद्दीतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ संबंधित यंत्रणेविरोधात राजकीय पक्षांकडून आंदोलने छेडली जात आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या खंबाळपाडा मार्गावरही हेच चित्र असून, या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. २०१७ च्या पावसाळ्यात या मार्गावर सुरू असलेल्या गटारासाठी खोदलेल्या खड्ड्यांत पडून एका व्यापाराचा मृत्यू झाला होता. सध्याचे खड्डे पाहता आणखी बळी गेल्यानंतर संबंधित यंत्रणेला जाग येणार का? असा सवाल यानिमित्ताने केला जात आहे.

टाटानाका ते घरडा सर्कल हा खंबाळपाडा मार्ग केडीएमसीच्या हद्दीत येत असला तरी या रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. या रस्त्याच्या आजूबाजूला केमिकल कंपन्या व बेकायदा थाटलेली मार्बलची दुकाने आहेत. या रस्त्यावर प्रदूषित पाण्याच्या प्रवाहाबरोबरच भोवताली पडलेल्या डेब्रिजच्या कचऱ्याने या मार्गाला अवकळा आली आहे. जलवाहिनीवर झालेली बेकायदा बांधकामे, याेग्य प्रकारे नालेसफाई न झाल्याने पावसाचे पाणी या मार्गावरील विकासनाका येथे तीन ते चार फुटांपर्यंत साचत होते. तेथे रस्त्याचे काँक्रिटीकरण केले आहे. त्याला लागून असलेल्या डांबरी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मध्यंतरी या रस्त्याची दुरुस्ती केली होती. मात्र, पावसाळा सुरू हाेताच पडलेल्या खड्ड्यांनी या कामाचा दर्जा दाखवून दिला आहे.

विकासनाका, भोईरवाडी, सावित्रीबाई फुले कला मंदिरनजीकचा चौक या महत्त्वाच्या ठिकाणांसह या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. माेठमाेठे खड्डे असल्याने या मार्गावरून वाहन चालविणे चालकांसाठी डाेकेदुखी ठरत आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कल्याण कार्यालयातील दूरध्वनीवर संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

खड्ड्यातील पाण्याने आंघोळ करू

सार्वजनिक बांधकाम विभागाचे सातत्याने या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. काही महिन्यांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. ते काम निकृष्ट झाल्याचे आता पडलेल्या खड्ड्यांनी उघड केले आहे. खड्ड्यांतून वाहन चालविताना जीव मुठीत घेऊनच तेथून मार्गस्थ व्हावे लागते. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. वेळीच हे खड्डे न बुजवल्यास यंत्रणेच्या निषेधार्थ खड्ड्यांत साठलेल्या पाण्याने आंघोळ करू, असे मत रिक्षाचालक मनोज वाघमारे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.

---------------