शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींना रोजगार देणारा रानमेवा वणव्यात खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 15:29 IST

औषधी वनस्पती जळून खाक झाल्याने रोजगाराच्या गंभीर समस्येने ग्रासलेला आदिवासी चिंता व्यक्त करतात.

शहापूर तालुक्यातील जंगल भागातील वणवा सत्रात शेकडो हेक्टर क्षेत्रातील वनसंपदेत आदिवासींना रोजगार देणाऱ्या रानमेव्यासह औषधी वनस्पती जळून खाक झाल्याने रोजगाराच्या गंभीर समस्येने ग्रासलेला आदिवासी चिंता व्यक्त करतात.

 तालुक्यातील टाकीपठार ,साकडंबाव, वाशाळा, डोळखांब, खरपत, नामपाडा,चोंढा,आजोबा पर्वत, शिदपाडा , विहिगाव या पठारावरील व डोंगर - दऱ्याखोऱ्यात वास्तव्यास असणारे ठाकूर,कातकरी,मल्हार कोळी,महादेव कोळी व इतर मागास वर्गीय आदिवासी लोक मार्च,एप्रिल,मे या तीन महिन्यात जंगलात मिळणाऱ्या करमाळा, दुर्मिळ चविची फळे,काटेरी बिनकाटेरी झुडपावर मिळणारी फळे, बोरे,हिरवी काळी करवंदे,चिकन चोपडा,आठुरणे, बेलफळे, कवटा, आसाने,तोरणे,तेंबुरणे, आवळे,भोकरे,उंबर,चिंच,बिंदुकली, कैऱ्या,काजू,आलिव,फणस, गुंजपाला, हुमणा व इतर विविध प्रकारच्या  रानमेव्यासह औषधी वनस्पती रोजगाराच्या उद्देशाने तप्त उन्हात फिरून गोळा करतात व पळसाच्या हिरव्यागार पानाच्या डोम्यात (द्रोण) हा रानमेवा भरून व औषधी वनस्पती शहापूर, शेणवा , किन्हवली,कसारा, आटगाव मुरबाड,आसनगाव येथील बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊन बसतात व प्रती द्रोण किंवा वाटा दहा ते पंधरा रुपये दराने विक्री करून प्रतिदिन शे - दोनशे रुपये कमवतात यातूनच मिळणाऱ्या  रोजगारातून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात परंतु यावर्षी तालुक्यातील 80 टक्के जंगल भागात वणवा लागल्याने वणव्यात वेली, झाडा झुडपावरील दुर्मिळ  रानमेवा व औषधी वनस्पती जळून खाक  झाल्याने बेरोजगारीच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत असल्याने आदिवासी चिंता व्यक्त करतात .

टॅग्स :thaneठाणेfireआग