शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

वरिष्ठांच्या कृपाशीर्वादामुळे केडीएमसीत खाबूगिरीची ‘लत’थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:42 IST

कल्याण: नवीन बांधकामावर पुढील कायदेशीर कारवाई न करण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी अटक असलेले केडीएमसीचे ‘क’ प्रभागक्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे आणि ...

कल्याण: नवीन बांधकामावर पुढील कायदेशीर कारवाई न करण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी अटक असलेले केडीएमसीचे ‘क’ प्रभागक्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे आणि कर्मचारी सुहास मढवी या दोघांना मंगळवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. यापूर्वीच्या लाचखोरी प्रकरणांमध्ये वरिष्ठांकडून दोषींवर कठोर कारवाई होत नसल्याने केडीएमसीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची खाबूगिरीची ‘लत’ थांबणार तरी कधी? असा सवाल आता करण्यात होत आहे.

विकास प्रकल्पांपेक्षाही येथील भ्रष्ट कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या उपद्‌व्यापामुळे केडीएमसी नेहमीच चर्चेत राहिली आहे. आधीच ३५ हून अधिक लाचखोर अधिकारी कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले असताना आणखीन दोघांना सोमवारी जेरबंद करण्यात आले. ‘कोणत्या ना कोणत्या कारणांनी’ लाच मागण्याची प्रवृत्ती काही केल्या कमी होत नसल्याची प्रचिती पुन्हा एकदा सोमवारच्या घटनेतून आली. नवीन बांधकामावर पुढील कायदेशीर कारवाई न करण्यासाठी १५ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी भांगरे आणि मढवी या दोघांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्यात त्यांनी बेकायदा बांधकामाला अभय देण्यासाठी पैसे मागितल्याचे उघड झाले आहे. मंगळवारी दोघांना कल्याण सत्र न्यायालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना पोलीस कोठडीची मागणी केली होती. परंतु,न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक चंद्रमोहन दुबे यांनी दिली.

---------------------------

‘त्या’ कारवाईचे वावडे का?

प्रभाग अधिकाऱ्यांच्या बाबतीत वारंवार घडणाऱ्या लाचखोरीच्या घटना पाहता या पदाचा कार्यभार सहाय्यक आयुक्त दर्जाच्या सक्षम अधिकाऱ्यांकडे का सोपविला जात नाही, लाचेची मागणी करून बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या उपायुक्तांवर सरकारी नियमानुसार फौजदारी कारवाई का होत नाही? अशी चर्चा आता महापालिका वर्तुळात होऊ लागली आहे. वास्तविकपणे प्रभाग अधिकारीपदावर सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करणे अपेक्षित असताना बहुतांश प्रभाग समित्यांवर दुय्यम दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक झाली आहे. त्यातूनच लाचखोरीची, खाबुगिरीची प्रकरणे घडत असल्याचे आतापर्यंतच्या घटनांमधून दिसले आहे. सातत्याने घडणाऱ्या भ्रष्टाचाराच्या घटनांनी मनपाची पुरती बदनामी होत असताना प्रशासन याबाबत गंभीर नाही? ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ३९७ नुसार अशा व्यक्तींवर आणि त्याच्यावर नियंत्रण असणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई प्रस्तावित केली आहे. परंतु, याची कठोरपणे अंमलबजावणी आजवर झालेली नाही. ती झाल्याशिवाय महापालिकेतील भ्रष्टाचाराला आळा बसणार नाही? याकडे लक्ष वेधले जात आहे. या कारवाईसंदर्भात महासभेत एकमताने ठरावदेखील पारीत झाला असून त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे.

------------------------------------------------------