शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
3
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
4
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
5
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
6
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
7
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
8
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
9
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
10
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
11
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
12
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
13
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
14
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
16
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?
17
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
18
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
19
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
20
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश

ठाण्यात कुत्रा पाळणे महागले

By admin | Updated: January 7, 2016 00:42 IST

ठाणे महापालिकेने अनिवासी आस्थापनांवर घनकचरा सेवा शुल्क लावले असतानाच आता आरोग्य विभागानेदेखील पाळीव कुत्र्यांच्या परवाना शुल्कात

ठाणे : ठाणे महापालिकेने अनिवासी आस्थापनांवर घनकचरा सेवा शुल्क लावले असतानाच आता आरोग्य विभागानेदेखील पाळीव कुत्र्यांच्या परवाना शुल्कात पाचपट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यास मंगळवारी झालेल्या बैठकीत स्थायी समितीने मंजुरी दिली. या नव्या प्रस्तावानुसार पाळीव कुत्र्यांच्या परवान्यासाठी १०० रुपयांऐवजी ५०० रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे आता पाळीव कुत्रे सांभाळण्याचा खर्चही वाढल्याने श्वानप्रेमींचे कंबरडे मोडणार आहे. याची अंमलबजावणी येत्या १ एप्रिलपासून होणार आहे. ठाण्यात एकीकडे भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत असताना त्यात काही वेळेस पाळीव कुत्रेही अशा प्रकारे माणसाचा चावा घेतल्याच्या घटना समोर आल्यानंतर ठाणे महापालिकेने भटकी आणि पाळीव कुत्र्यांची वर्गवारी सुरू केली. त्यानुसार, पाळीव कुत्रे घ्यायचे झाल्यास त्याचा परवाना काढणे बंधनकारक करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला होता. त्यानुसार, मागील चार ते पाच वर्षांपासून अशा प्रकारे पाळीव कुत्र्यांसाठी परवाना दिले जात आहेत. तसेच त्यांच्या नैसर्गिक विधीच्या साफसफाईचा अतिरिक्त भार महापालिका कर्मचाऱ्यांवर पडत असल्याचा दावा पालिकेने केला आहे. त्यानुसार, महापालिकेने मुंबई प्रांतिक अधिनियमाच्या आधारे पाळीव कुत्र्यांसाठी नियम लागू केले आहेत. पाळीव प्राणी परवाना बंधनकारक केला असून त्यासाठी एका कुत्र्यासाठी १०० रुपयांचे परवाना शुल्क सुरुवातीला आकारण्यात येत होते. दरम्यान, आता नव्या प्रस्तावानुसार यात तब्बल पाचपट वाढ करून ते ५०० रु पये केले आहे. तसेच बिल्ला, परवाना पुस्तकाचे शुल्क १०० रु पये केले असून यापूर्वी ते दहा रु पये इतके होते. शिवाय, महापालिकेच्या श्वानघरामध्ये कुत्रा ठेवण्याचा खर्च ४०० रुपये केला असून जुन्या दरानुसार त्यासाठी ५० रुपये आकारले जात होते. याशिवाय, परवाना नूतनीकरण केला नाहीतर दर महिन्याला २० ऐवजी १०० रुपये जादा मोजावे लागणार आहेत. विशेष म्हणजे, पाळीव कुत्र्यांच्या परवाना सुरक्षा अनामत रक्कम शुल्कामध्येही पाचपट वाढ केल्याने नागरिकांना आता त्यासाठी २५०० रु पये भरावे लागणार आहेत. पाळीव कुत्र्यांसाठी परवाना सुरक्षा अनामत रक्कम महापालिकेत भरली आणि पुढील आर्थिक वर्षाच्या मार्चअखेर परवाना शुल्काची रक्कम भरली नाहीतर तुमची सुरक्षा अनामत रक्कम महापालिकेच्या फंडात जमा होणार असल्याची तरतूद नव्या प्रस्तावात केली आहे. तसेच परवाना घेतल्यानंतर वर्षाच्या आत श्वानाचा मृत्यू झाल्याचे किंवा श्वान दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केल्याचे श्वान नियंत्रण कक्षाला कळविले तर परवाना शुल्काची रक्कम संबंधितांना परत देण्याचीही तरतूद प्रस्तावात केली आहे.