शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

शहरात शांतता ठेवा, आरोपींवर योग्य कारवाई करू; मीरा भाईंदर पोलिसांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 18:25 IST

सोशल मीडियातून व्हिडिओ टाकले जातात, पण ग्राऊंडवर परिस्थिती हाताळणं कठीण जाते. त्यामुळे अनावश्यक पोस्ट व्हायरल करणे नागरिकांनी टाळावे असं पोलिसांनी सांगितले.

मीरा भाईंदर - सर्वात आधी शहरात शांतता राखणे हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. जे काही घडले त्यावर आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करू. शहरात शांतता राहावी यासाठी आमचे प्रयत्न आहे. नागरिकांनी सहकार्य करावे असं आवाहन मीरा भाईंदरचे अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी केले आहे. 

अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक म्हणाले की, याआधी कधीही मीरा भाईंदर शहरात कायदा सुव्यवस्था बिघडली नव्हती. जे कुणी या घटनेत सहभागी आहेत अशा लोकांवर आम्ही नक्कीच कारवाई करू. सध्या वातावरण शांत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जर वातावरण शांत राहिले तर आम्हाला तपासात पुढे जाता येईल. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे. नयानगर भागात एक रॅली निघाली होती. त्यातून काही वाद झाला आणि तो वाढत गेला त्यातून हा प्रकार घडला आहे असं  त्यांनी सांगितले. 

तसेच सोशल मीडियात ज्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यातील शक्य तितक्या आमच्या विभागाकडून डिलीट करण्यात येत आहे. काही व्हिडिओ मॉर्फ करून टाकले जातायेत. सोशल मीडियातून व्हिडिओ टाकले जातात, पण ग्राऊंडवर परिस्थिती हाताळणं कठीण जाते. त्यामुळे अनावश्यक पोस्ट व्हायरल करणे नागरिकांनी टाळावे. वातावरण बिघडणार नाही याची आम्ही काळजी घेतोय. वातावरण शांत झाल्यानंतर पुरावे जमा करू असं पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं. 

दरम्यान, मीरा भाईंदरमधील नयानगर भागात रात्री घडलेल्या संपूर्ण प्रकाराची कालच मी माहिती घेतली. सोमवारी पहाटे ३.३० वाजेपर्यंत मी मीरा भाईंदर पोलीस आयुक्तांच्या सातत्याने संपर्कात होतो. आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत १३ आरोपींना ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अन्य आरोपींची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था कुणी बिघडवण्याचे प्रयत्न करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही अशी माहिती फडणवीसांनी ट्विट केली होती.