शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

शहरात शांतता ठेवा, आरोपींवर योग्य कारवाई करू; मीरा भाईंदर पोलिसांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 18:25 IST

सोशल मीडियातून व्हिडिओ टाकले जातात, पण ग्राऊंडवर परिस्थिती हाताळणं कठीण जाते. त्यामुळे अनावश्यक पोस्ट व्हायरल करणे नागरिकांनी टाळावे असं पोलिसांनी सांगितले.

मीरा भाईंदर - सर्वात आधी शहरात शांतता राखणे हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. जे काही घडले त्यावर आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करू. शहरात शांतता राहावी यासाठी आमचे प्रयत्न आहे. नागरिकांनी सहकार्य करावे असं आवाहन मीरा भाईंदरचे अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी केले आहे. 

अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक म्हणाले की, याआधी कधीही मीरा भाईंदर शहरात कायदा सुव्यवस्था बिघडली नव्हती. जे कुणी या घटनेत सहभागी आहेत अशा लोकांवर आम्ही नक्कीच कारवाई करू. सध्या वातावरण शांत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जर वातावरण शांत राहिले तर आम्हाला तपासात पुढे जाता येईल. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे. नयानगर भागात एक रॅली निघाली होती. त्यातून काही वाद झाला आणि तो वाढत गेला त्यातून हा प्रकार घडला आहे असं  त्यांनी सांगितले. 

तसेच सोशल मीडियात ज्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यातील शक्य तितक्या आमच्या विभागाकडून डिलीट करण्यात येत आहे. काही व्हिडिओ मॉर्फ करून टाकले जातायेत. सोशल मीडियातून व्हिडिओ टाकले जातात, पण ग्राऊंडवर परिस्थिती हाताळणं कठीण जाते. त्यामुळे अनावश्यक पोस्ट व्हायरल करणे नागरिकांनी टाळावे. वातावरण बिघडणार नाही याची आम्ही काळजी घेतोय. वातावरण शांत झाल्यानंतर पुरावे जमा करू असं पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं. 

दरम्यान, मीरा भाईंदरमधील नयानगर भागात रात्री घडलेल्या संपूर्ण प्रकाराची कालच मी माहिती घेतली. सोमवारी पहाटे ३.३० वाजेपर्यंत मी मीरा भाईंदर पोलीस आयुक्तांच्या सातत्याने संपर्कात होतो. आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत १३ आरोपींना ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अन्य आरोपींची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था कुणी बिघडवण्याचे प्रयत्न करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही अशी माहिती फडणवीसांनी ट्विट केली होती.