शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

नववर्ष पार्टी करणाऱ्यांवर करडी नजर, पोलिसांचा डिजिटल कॅमेऱ्यातून वॉच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 11:31 IST

New Year : जिल्ह्यातील सर्व रिसॉर्ट जवळपास फुल्ल असताना रात्री समुद्रकिनारा, पर्यटनस्थळांवर पोलीस दल डिजिटल कॅमेऱ्याने नजर ठेवणार असल्याने फुल टू धम्मालच्या अपेक्षेने पालघरमध्ये आलेल्या पर्यटकांचा पुरता हिरमोड होणार आहे.

पालघर : दोन वर्षांपासून कोरोनाच्या माऱ्याने घरात कोंडलेल्या नागरिकांनी या वर्षी थर्टीफर्स्ट जल्लोषात साजरा करण्याचे मनसुबे आखले होते, मात्र ओमायक्रॉनच्या वाढत्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने काढलेल्या परिपत्रकामुळे हे मनसुबे धुळीस मिळतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील सर्व रिसॉर्ट जवळपास फुल्ल असताना रात्री समुद्रकिनारा, पर्यटनस्थळांवर पोलीस दल डिजिटल कॅमेऱ्याने नजर ठेवणार असल्याने फुल टू धम्मालच्या अपेक्षेने पालघरमध्ये आलेल्या पर्यटकांचा पुरता हिरमोड होणार आहे.

मार्च २०२० पासून कोरोनाच्या प्रादुर्भावाचे पडसाद राज्यभर पसरल्याने दुसऱ्या लाटेत कोरोनाने लोकांना घराबाहेरही पडू दिले नव्हते. ऑनलाइनच्या फटकाऱ्याने अख्खे कुटुंब घरात कोंडून राहत असताना लाॅकडाऊन शिथिल झाल्याने थर्टी फर्स्ट साजरी करण्यासाठी तरुणांच्या ग्रुपसह, अनेक कुटुंबांनी थर्टी फर्स्ट साजरी करण्यासाठी हॉटेल, रिसॉर्ट बुक केली होती. अचानक ओमायक्रॉनने जिल्ह्यात शिरकाव केल्यानंतर पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयाने पर्यटकांना नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस दल सज्ज ठेवले आहे.

ओमायक्रॉनच्या वाढत्या संख्येमुळे ३१ डिसेंबर या सरत्या वर्षाला निरोप देताना १ जानेवारी या नव्या वर्षांचे स्वागतासाठी मोठी गर्दी जमू शकत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांच्या अधिपत्याखाली एक अप्पर अधीक्षक, ४ पोलीस उपअधीक्षक, ४३ पोलीस अधिकारी व ५४३ पोलीस अंमलदार यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यात ८५ ठिकाणी नाकाबंदी व फिक्स पॉईंट नेमले असून सर्व १६ पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस गस्त व हॉटेल, लॉजेस, सभागृह, पर्यटन स्थळे त्यांची तपासणी करणे तसेच अवैध दारू, अमली पदार्थ, गुटका यांच्यावर कारवाई करण्याकरता वेगवेगळे पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे रिसॉर्ट आणि हॉटेल मालकांचे धाबे दणाणले असून या परिपत्रकाच्या परिणाम होत पर्यटकांवर गुन्हे दाखल झाल्यास त्याचा मोठा परिणाम इथल्या पर्यटन व्यवसायावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

...तर होणार कारवाईजुन्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत शक्यतो घरीच साधेपणा साजरे करावे आणि राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येणे यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे घराच्या बाहेर पाचपेक्षा अधिक इसम एकत्र जमल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे पालघरच्या पोलीस अधीक्षकांनी जाहीर केले आहे.

टॅग्स :palgharपालघर