शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

केडीएमटी ‘जीसीसी’ तत्त्वावर चालविणार; महासभेचा हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 00:14 IST

५0 कोटींच्या निधीला मंजुरी, आता प्रतीक्षा प्रस्तावाच्या अंमलबजावणीची

कल्याण : खर्च आणि उत्पन्नातील वाढती तफावत पाहता केडीएमटी उपक्रम चालवायचा कसा, असा प्रश्न व्यवस्थापनाला पडला असताना नुकत्याच झालेल्या महासभेत केडीएमसीच्या अर्थसंकल्पात उपक्रमासाठी महसुली खर्चासाठी तरतूद केलेल्या ५० कोटींच्या निधीला मंजुरी मिळाल्याने केडीएमटीचा उपक्रम ग्रॉस कॉस्ट कॉण्ट्रॅक्ट (जीसीसी) तत्त्वावर चालविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेले वर्षभर प्रलंबित असलेला जीसीसीचा प्रस्ताव पुरेसा निधी उपलब्ध झाल्याने आता तरी तातडीने अमलात येईल का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

डबघाईला आलेल्या केडीएमटी उपक्रमाचे खाजगीकरण करण्याचा निर्णय सत्ताधारी व विरोधी पक्षांनी दोन वर्षांपूर्वी घेतला होता. याबाबतचा प्रस्ताव केडीएमसी प्रशासनाकडे पाठविला होता. परिवहन सेवा खाजगी व्यक्ती अथवा संस्थेने चालवावी. त्याबदल्यात ठरावीक रक्कम परिवहनला रॉयल्टी स्वरूपात द्यायची, असेही प्रस्तावात नमूद केले होते. परंतु, हा प्रस्ताव बासनात गुंडाळला. केडीएमटीची सेवा खाजगी बस प्रवर्तन सहभाग (जीसीसी) तत्त्वावर चालविण्याचा निर्णय सरकारने घेतला. याबाबतचे पत्र मागील वर्षी ३० आॅगस्टला तत्कालीन आयुक्त गोविंद बोडके यांना पाठविले होते.

सध्या ठाणे, मीरा-भार्इंदर, वसई-विरार, नवी मुंबई या महापालिकांमधील परिवहन उपक्रमांमध्ये जीसीसीची अंमलबजावणी सुरू आहे. त्याप्रमाणे केडीएमसीतही होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे निर्णय घेता आला नाही. निवडणुकीनंतर ठोस कृती होईल, असे बोडके यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, नुकत्याच झालेल्या महासभेत महसुली खर्चासाठी ५० कोटींचा निधी मंजूर केल्याने उपक्रमाला जीसीसी तत्त्वावर पुन्हा उभारी मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

पुरेसा निधी उपलब्ध झाल्याने कर्मचाऱ्यांचे पगार, इंधनखरेदी, याचबरोबर बस जीसीसी तत्त्वावर चालविणे शक्य होईल, असा विश्वास उपक्रमाने व्यक्त केला आहे. यासंदर्भात परिवहनचे व्यवस्थापक मिलिंद धाट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जीसीसीसाठी पुरेसा निधी मंजूर झाल्याने लवकरच यासंदर्भातील निविदा काढली जाणार असल्याचे सांगितले.

जीसीसीचे फायदे काय?

जीसीसीमध्ये कंत्राटदाराला केडीएमटी उपक्रमाच्या बस कंत्राट पद्धतीने काही अटींवर चालवायला दिल्या जातात. दर किलोमीटरमागे ठरावीक रक्कम कंत्राटदाराला द्यायची असते. उपक्रमाला लागणारा चालक कंत्राटदाराचा असतो. बस संचालन व परिचालन कंत्राटदाराकडून होणार असल्याने संचालनामध्ये सुधारणा होऊन प्रवासी सेवा वेळेवर उपलब्ध होऊन नागरिकांना चांगली सेवा मिळणार आहे. खाजगी सहभागामुळे मार्गनिश्चिती, आगार, कार्यशाळा इत्यादी पायाभूत सुविधाउभारणी यांचे नियोजन करणे शक्य होणार आहे.

टॅग्स :thaneठाणेkalyanकल्याण