शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

कल्याण-डोंबिवली दरम्यानची लोकल सेवा आज 4 तास बंद; प्रवाशांच्या मदतीसाठी ‘केडीएमटी’ धावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 07:18 IST

रेल्वे ब्लॉकदरम्यान २० विशेष बस : ठाकुर्लीत आज गर्डरचे काम

कल्याण : ठाकुर्ली स्थानकात पादचारी पुलाचे गर्डर उभारण्यासाठी कल्याण-डोंबिवलीदरम्यान मार्गावर बुधवारी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ९.४५ ते दुपारी १.४५ पर्यंत चार तास वाहतूक बंद राहणार आहे. यात प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी केडीएमटी सज्ज झाली असून ब्लॉकदरम्यान २० विशेष बस सोडल्या जाणार आहेत. मदतीला केडीएमटी धावून आल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सुटीच्या दिवशी प्रवाशांची वर्दळ कमी असल्याने रेल्वे प्रशासनाने बुधवारी नाताळच्या सुटीचे औचित्य साधत चार तासांचा विशेष ब्लॉक घेतला आहे. कल्याणहून कसारा-कर्जतकडे तर डोंबिवलीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी रेल्वे वाहतूक सुरू राहणार आहे. ठाकुर्ली स्थानकात पुलाचे गर्डर उभारण्यात येणार असल्याने कल्याण-डोंबिवलीदरम्यानची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे कसारा-कर्जत तसेच छ.शि.म.ट. कडे जाणाऱ्या प्रवाशांना कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानकांचा आधार घ्यावा लागणार आहे. यात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून केडीएमटी उपक्रमाकडून जादा बस सोडल्या जाणार आहेत. २० बस कल्याण-डोंबिवली मार्गावर सोडल्या जाणार आहेत. कल्याण आणि डोंबिवली रेल्वेस्थानकातून या बस दर पंधरा मिनिटांनी प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती केडीएमटी उपक्रमाचे व्यवस्थापक मारुती खोडके यांनी दिली. रेल्वेचा ब्लॉक सकाळी ९.४५ च्या सुमारास सुरू होणार असल्याने सकाळी ९ वाजल्यापासून या बस प्रवाशांसाठी चालवल्या जातील. ब्लॉक संपेपर्यंत बस कल्याण डोंबिवली मार्गावरून धावतील, असेही खोडके यांनी सांगितले. केडीएमटीने उपलब्ध केलेल्या या सुविधेमुळे रेल्वेच्या ट्रॅफिक ब्लॉकदरम्यान प्रवाशांचे होणारे हाल काही प्रमाणात टळणार आहेत.रिक्षाचालकांनाही देणार सूचनारेल्वेचा एखादा ब्लॉक असो अथवा ठप्प पडलेली रेल्वे वाहतूक या परिस्थितीचा रिक्षाचालकांकडून गैरफायदा उठवला जातो. मनमानी भाडे आकारून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक केली जाते.कल्याण-डोंबिवली रिक्षाने प्रवास करताना प्रामुख्याने शेअर पद्धतीला अधिक पसंती आहे. सध्या प्रतिप्रवासी साधारण २५ रुपये भाडे आकारले जाते. जर शेअरने जायचे नसेल तर १०० ते १५० रुपयांपर्यंत भाडे प्रवाशाला रिक्षाचालकाला द्यावे लागत आहे.यासंदर्भात कोकण रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रवाशांना त्रास होणार नाही, यासंदर्भात रिक्षाचालकांना सूचना केल्या जातील. रिक्षाचालकांकडून जादा भाडे आकारल्यास कल्याणमधील रिक्षा संघटनेच्या कार्यालयाशी प्रवाशांनी संपर्क साधावा, असे आवाहन पेणकर यांनी केले आहे. 

टॅग्स :thaneठाणेkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाcentral railwayमध्य रेल्वे