शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

केडीएमसीच्या बाबू गेनु शाळेच्या विद्यार्थ्यांनी लुटली सहलीची मजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 17:08 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष संपत आले मात्र अद्याप त्यांच्या सहलीचा पत्ता नाही. पण विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी त्यांनीही मनमोकळेपणे राहण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीचे सदस्य, स्व. शिवाजी शेलार हे नेहमी खंबाळपाडा परिसरातील महापालिका शाळा क्र.७० बाबुगेनू शाळेची सहल नेत असत. त्यांचा सहलीचा वारसा आता नगरसेवक साई शेलार यांनी चालवला असून यंदाही १७ फेब्रुवारी रोजी त्यांनी डोळखांब येथिल आजा पर्वत येथे शाळेची सहल नेली होती.

ठळक मुद्दे डोळखांब येथिल आजापर्वतावर गेली होती सहल नगसेवक साई शेलार यांचा उपक्रम

डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष संपत आले मात्र अद्याप त्यांच्या सहलीचा पत्ता नाही. पण विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी त्यांनीही मनमोकळेपणे राहण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीचे सदस्य, स्व. शिवाजी शेलार हे नेहमी खंबाळपाडा परिसरातील महापालिका शाळा क्र.७० बाबुगेनू शाळेची सहल नेत असत. त्यांचा सहलीचा वारसा आता नगरसेवक साई शेलार यांनी चालवला असून यंदाही १७ फेब्रुवारी रोजी त्यांनी डोळखांब येथिल आजा पर्वत येथे शाळेची सहल नेली होती.त्या सहलीला प्राथमिक शाळेचे ५० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यांच्यासोबत परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसह माजी नगरसेविका शिल्पा शेलार या देखिल मुलांची काळजी घेण्यासाठी सहलीला गेल्या होत्या. मुलांनी तेथे दिवसभर खेळ, गप्पा, मस्ती, धम्माल केली. त्या पर्वताच्या परिसरात एक शाळा असून तेथिल ४०० विद्यार्थ्यांसह डोंबिवली खंबाळपाडा येथिल विद्यार्थ्यांनी एकत्रपणे सामुहिक भोजन केले. गोष्टी सांगितल्या. आणि पर्वताची स्वच्छता करत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला. लहानग्यांनी स्वच्छतेचे महत्व सांगत आरोग्य सांभाळणे आवश्यक असून आरोग्याची निगा कशी राखावी यासंदर्भात जनजागृती केली. सहलीला जातांना बसमध्ये गाणी, नाच यासह ऐतिहासीक गोष्टी सांगण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये या सहलीचे विशेष आकर्षण झाले होते. कौटुंबिक परिस्थिती बेताची असल्याने मुलांना सहसा बाहेरगावी नेले जात नाही, पण मग अशा माध्यमातून मुलांमध्ये पर्यटनाची आवड निर्माण करणे, सामाजिक बांधिलकी जपणे असे नानाविध उपक्रम राबवण्याचा प्रयत्न शिवाजी शेलार यांनी केला होता. तोच प्रयत्न यापुढे सुरु रहावा यासाठी साई शेलार, माजी नगसेविका शिल्पा शेलार यांनी सुरु ठेवल्याने समाधान असल्याची भावना परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली. वडीलांचा वारसा पुढे चालु ठेवणे, त्यांनी दिलेला सामाजिक बांधिलकीचा मुलमंत्र जोपासण्याची ही संधी असल्याचे मत साई शेलार यांनी यानिमित्ताने व्यक्त केले. सहलीला जाण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये असलेली उत्सूकता आणि परत आल्यावरचे समाधान यामधून समाधान मिळत असल्याची भावना भाजपाचे पूर्व मंडल सरचिटणीस राजू शेख यांनी व्यक्त केली.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाdombivaliडोंबिवलीthakurliठाकुर्ली