शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गणेशोत्सवासाठी केडीएमसी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 02:42 IST

गणेशोत्सवासाठी सज्ज असल्याचा दावा केडीएमसीने केला आहे. कल्याण-डोंबिवली शहरांतील गणपती विसर्जनस्थळी व गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील चौकांमध्ये सुरक्षेसाठी २३ महत्त्वाच्या ठिकाणी १०९ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

कल्याण : गणेशोत्सवासाठी सज्ज असल्याचा दावा केडीएमसीने केला आहे. कल्याण-डोंबिवली शहरांतील गणपती विसर्जनस्थळी व गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील चौकांमध्ये सुरक्षेसाठी २३ महत्त्वाच्या ठिकाणी १०९ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. तर, महापालिका क्षेत्रात ६८ विसर्जन घाटांवर एकूण ६८ जनरेटर, दोन हजार ९०० हॅलोजन व ८० लायटिंग टॉवर उभारले जाणार आहेत.कल्याणमध्ये २७ विसर्जनस्थळे आहेत. त्यापैकी पूर्वेतील गावदेवी मंदिर तिसगाव, चिंचपाडा रोड, कोळसेवाडी पोलीस ठाण्याजवळ, पश्चिमेत मुंबई विद्यापीठ उपकेंद्र अशा चार ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती केली जाणार आहे. डोंबिवली विभागात ३७ विसर्जनस्थळे आहेत. त्यात पूर्वेतील पंचायत विहीर, नेहरू मैदान, अयोध्यानगरी, शिवम हॉस्पिटल, टिळक विद्यामंदिर शाळा, प्रगती कॉलेज, कस्तुरी प्लाझा, न्यू आयरे रोड, उदंचन केंद्र, तर पश्चिम येथील आनंदनगर सम्राट चौक, भागशाळा मैदान येथे घरगुती गणेश विसर्जनाकरिता कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहेत. प्रत्येक विसर्जन घाटावर अग्निशमन स्वयंसेवक, जीवरक्षक, लाइफ जॅकेट, बोट व बोटी अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नागरिकांनी कृत्रिम तलावाचा वापर करावा, असे आवाहन महापौर विनीता राणे यांनी केले आहे. रस्त्यांची खड्डेभरणी तसेच साफसफाई व आरोग्यविषयक समस्यांचा जलदगतीने निपटारा होण्याकरिता बांधकाम विभाग, घनकचरा व्यवस्थापन व सार्वजनिक आरोग्य विभागांमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या शनिवार आणि रविवारच्या सार्वजनिक सुट्या रद्द केल्या होत्या.>प्रत्येक प्रभागांमध्ये राबवणार विशेष स्वच्छता मोहीमरस्त्याच्या बाजूचा व ठिकठिकाणी पडलेला कचरा गणेशोत्सवापूर्वी उचलून स्वच्छता राखावी, असे आदेश आयुक्त गोविंद बोडके यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिले आहेत. विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी कालबद्ध कार्यक्र म निश्चित केला आहे. ही मोहीम शनिवारपासून सर्व प्रभागांमध्ये व्यापक प्रमाणात राबवण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यात्या प्रभाग क्षेत्र कार्यालयाचे प्रभाग क्षेत्र अधिकारी हे नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहत आहेत, तर सहनियंत्रण अधिकारी म्हणून प्रभागांच्या अधीक्षकांवर जबाबदारी आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत महापालिका क्षेत्र पूर्णत: स्वच्छ असणे आवश्यक असल्याने घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने ही मोहीम राबवावी, अशा सूचना आयुक्तांनी केल्या आहेत.कमानी हटणार कधी? : गोकुळाष्टमीनिमित्त डोंबिवलीत लावलेल्या कमानी अद्याप महापालिकेने काढलेल्या नाहीत. त्यातच, आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांची तसेच त्यांनी उभारलेल्या कमानींची भर पडली आहे. गोकुळाष्टमीच्या कमानी वाहतुकीला अडथळा ठरत असताना गणेशोत्सवासाठी काही ठिकाणी रस्त्यांमध्ये उभारलेल्या मंडपांचीही त्यात भर पडली आहे. यासंदर्भात अतिक्रमणविरोधी विभागाशी संपर्क साधला असता मंडपांची उभारणी वाहतूक पोलिसांच्या नियोजनाखाली झाली आहे. सध्या तरी कोणतीही तक्रार आलेली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

टॅग्स :cctvसीसीटीव्हीGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८