शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

गणेशोत्सवासाठी केडीएमसी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 02:42 IST

गणेशोत्सवासाठी सज्ज असल्याचा दावा केडीएमसीने केला आहे. कल्याण-डोंबिवली शहरांतील गणपती विसर्जनस्थळी व गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील चौकांमध्ये सुरक्षेसाठी २३ महत्त्वाच्या ठिकाणी १०९ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

कल्याण : गणेशोत्सवासाठी सज्ज असल्याचा दावा केडीएमसीने केला आहे. कल्याण-डोंबिवली शहरांतील गणपती विसर्जनस्थळी व गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील चौकांमध्ये सुरक्षेसाठी २३ महत्त्वाच्या ठिकाणी १०९ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. तर, महापालिका क्षेत्रात ६८ विसर्जन घाटांवर एकूण ६८ जनरेटर, दोन हजार ९०० हॅलोजन व ८० लायटिंग टॉवर उभारले जाणार आहेत.कल्याणमध्ये २७ विसर्जनस्थळे आहेत. त्यापैकी पूर्वेतील गावदेवी मंदिर तिसगाव, चिंचपाडा रोड, कोळसेवाडी पोलीस ठाण्याजवळ, पश्चिमेत मुंबई विद्यापीठ उपकेंद्र अशा चार ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती केली जाणार आहे. डोंबिवली विभागात ३७ विसर्जनस्थळे आहेत. त्यात पूर्वेतील पंचायत विहीर, नेहरू मैदान, अयोध्यानगरी, शिवम हॉस्पिटल, टिळक विद्यामंदिर शाळा, प्रगती कॉलेज, कस्तुरी प्लाझा, न्यू आयरे रोड, उदंचन केंद्र, तर पश्चिम येथील आनंदनगर सम्राट चौक, भागशाळा मैदान येथे घरगुती गणेश विसर्जनाकरिता कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहेत. प्रत्येक विसर्जन घाटावर अग्निशमन स्वयंसेवक, जीवरक्षक, लाइफ जॅकेट, बोट व बोटी अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नागरिकांनी कृत्रिम तलावाचा वापर करावा, असे आवाहन महापौर विनीता राणे यांनी केले आहे. रस्त्यांची खड्डेभरणी तसेच साफसफाई व आरोग्यविषयक समस्यांचा जलदगतीने निपटारा होण्याकरिता बांधकाम विभाग, घनकचरा व्यवस्थापन व सार्वजनिक आरोग्य विभागांमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या शनिवार आणि रविवारच्या सार्वजनिक सुट्या रद्द केल्या होत्या.>प्रत्येक प्रभागांमध्ये राबवणार विशेष स्वच्छता मोहीमरस्त्याच्या बाजूचा व ठिकठिकाणी पडलेला कचरा गणेशोत्सवापूर्वी उचलून स्वच्छता राखावी, असे आदेश आयुक्त गोविंद बोडके यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिले आहेत. विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी कालबद्ध कार्यक्र म निश्चित केला आहे. ही मोहीम शनिवारपासून सर्व प्रभागांमध्ये व्यापक प्रमाणात राबवण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यात्या प्रभाग क्षेत्र कार्यालयाचे प्रभाग क्षेत्र अधिकारी हे नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहत आहेत, तर सहनियंत्रण अधिकारी म्हणून प्रभागांच्या अधीक्षकांवर जबाबदारी आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत महापालिका क्षेत्र पूर्णत: स्वच्छ असणे आवश्यक असल्याने घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने ही मोहीम राबवावी, अशा सूचना आयुक्तांनी केल्या आहेत.कमानी हटणार कधी? : गोकुळाष्टमीनिमित्त डोंबिवलीत लावलेल्या कमानी अद्याप महापालिकेने काढलेल्या नाहीत. त्यातच, आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांची तसेच त्यांनी उभारलेल्या कमानींची भर पडली आहे. गोकुळाष्टमीच्या कमानी वाहतुकीला अडथळा ठरत असताना गणेशोत्सवासाठी काही ठिकाणी रस्त्यांमध्ये उभारलेल्या मंडपांचीही त्यात भर पडली आहे. यासंदर्भात अतिक्रमणविरोधी विभागाशी संपर्क साधला असता मंडपांची उभारणी वाहतूक पोलिसांच्या नियोजनाखाली झाली आहे. सध्या तरी कोणतीही तक्रार आलेली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

टॅग्स :cctvसीसीटीव्हीGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८