शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

केडीएमसीचे फेरीवाला धोरणच चुकीचे, आयुक्त मंत्रालयात गेल्याने बैठक झाली रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 03:23 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून फेरीवाल्यांसाठी राबवले जाणारे धोरण चुकीचे आहे. शहरातील लोकसंख्येच्या प्रमाणात म्हणजे प्रत्येक प्रभागात अडीच टक्के फेरीवाले असतील, असे हे धोरण आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून फेरीवाल्यांसाठी राबवले जाणारे धोरण चुकीचे आहे. शहरातील लोकसंख्येच्या प्रमाणात म्हणजे प्रत्येक प्रभागात अडीच टक्के फेरीवाले असतील, असे हे धोरण आहे. त्यानुसार, अडीचशे फेरीवाले प्रत्येक प्रभागात बसवले जाणार आहेत. परंतु, जेथे व्यवसाय होऊ शकत नाही, अशा ठिकाणी फेरीवाल्यांचे पुनर्वसन करणे हिताचे ठरणार नाही. पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांच्या जागी जर फेरीवाले बसवले, तर मोठा गोंधळ उडेल. त्यामुळे कुठलाही अभ्यास न करता हे धोरण ठरवल्याचे फेरीवाला संघटनेचे नेते अरविंद मोरे यांचे म्हणणे आहे.केडीएमसी हद्दीत दोनतीन वर्षांत मोठ्या प्रमाणात फेरीवाले वाढले आहेत. या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण महापालिके कडून केले जाणार आहे. मात्र, त्यासाठी भरून घेण्यात येत असलेल्या अर्जासाठी अधिकारी बक्कळ पैसे उकळत आहेत. त्यामुळे त्यात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे, असा आरोपही मोरे यांनी केला आहे.फेरीवाला धोरणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी गुरुवारी दुपारी १२ वाजता बैठक बोलावली होती. मात्र, वेलरासू यांना तातडीच्या कामासाठी मंत्रालयात जावे लागल्याने बैठक रद्द करावी लागल्याचे कारण दिले असले, तरी त्यांना फेरीवाल्यांसाठी वेळ नाही, अशा शब्दांत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, यामुळे एकंदरीतच प्रशासनाच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.फेरीवाला अतिक्रमणाचा मुद्दा कायम असताना त्यांच्या पुनर्वसनाच्या अनुषंगाने आजवर कोणतीही ठोस कृती केडीएमसीने केलेली नाही. केडीएमसीने स्थापन केलेली शहर फेरीवाला समिती ही नगरपथविके्रता समिती म्हणून पुनर्जीवित केली आहे. या समितीचे अध्यक्ष आयुक्त हे स्वत: असून यात प्रमुख अधिकारी आणि फेरीवाला संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. परंतु, वेलरासू यांनी स्वत: बोलावलेली बैठक त्यांनीच रद्द केल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले. काही जणांना दूरध्वनीवर बैठक रद्द झाल्याची माहिती देण्यात आली, तर काहींना केडीएमसीच्या मुख्यालयात आल्यावरच बैठक रद्द झाल्याचे कळले. त्यामुळे फेरीवाल्यांनी नाराजी व्यक्त केली.>पुढील बैठकीची तारीखही नाहीआयुक्त पी. वेलरासू यांना मंत्रालयात कामासाठी जावे लागल्याने गुरुवारी बैठक रद्द झाल्याचे आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, असे असलेतरी पुढील बैठकीची तारीख मात्र सांगितलेली नाही. प्रशासनाला फेरीवालाप्रश्नी कोणतेही गांभीर्य नाही. आयुक्तांना फेरीवाल्यांसाठी वेळ नाही, अशी टीका फेरीवाला संघटनांच्या प्रतिनिधींनी केली आहे.>काटेमानिवलीत फेरीवाल्यांवर कारवाईकोळसेवाडी : कल्याण पूर्वेतील केडीएमसीच्या ‘जे’ प्रभाग क्षेत्राचे अधिकारी भागाजी भांगरे यांच्या पथकाने गुरुवारी पोलीस बंदोबस्तात काटेमानिवली येथील फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली. त्यात महापालिकेच्या शाळेसमोरील १२ पक्क्या शेड आणि चार पक्क्या टपºया जमीनदोस्त केल्या. दरम्यान, प्रल्हाद शिंदे उड्डाणपूल ते कोळसेवाडी गणपती मंदिरापर्यंतच्या दोन्ही बाजूंकडील फेरीवाले व वाहनांचे पार्किंग यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. महापालिकेने येथील फेरीवल्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.