शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

केडीएमसीचे फेरीवाला धोरणच चुकीचे, आयुक्त मंत्रालयात गेल्याने बैठक झाली रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 03:23 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून फेरीवाल्यांसाठी राबवले जाणारे धोरण चुकीचे आहे. शहरातील लोकसंख्येच्या प्रमाणात म्हणजे प्रत्येक प्रभागात अडीच टक्के फेरीवाले असतील, असे हे धोरण आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून फेरीवाल्यांसाठी राबवले जाणारे धोरण चुकीचे आहे. शहरातील लोकसंख्येच्या प्रमाणात म्हणजे प्रत्येक प्रभागात अडीच टक्के फेरीवाले असतील, असे हे धोरण आहे. त्यानुसार, अडीचशे फेरीवाले प्रत्येक प्रभागात बसवले जाणार आहेत. परंतु, जेथे व्यवसाय होऊ शकत नाही, अशा ठिकाणी फेरीवाल्यांचे पुनर्वसन करणे हिताचे ठरणार नाही. पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांच्या जागी जर फेरीवाले बसवले, तर मोठा गोंधळ उडेल. त्यामुळे कुठलाही अभ्यास न करता हे धोरण ठरवल्याचे फेरीवाला संघटनेचे नेते अरविंद मोरे यांचे म्हणणे आहे.केडीएमसी हद्दीत दोनतीन वर्षांत मोठ्या प्रमाणात फेरीवाले वाढले आहेत. या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण महापालिके कडून केले जाणार आहे. मात्र, त्यासाठी भरून घेण्यात येत असलेल्या अर्जासाठी अधिकारी बक्कळ पैसे उकळत आहेत. त्यामुळे त्यात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे, असा आरोपही मोरे यांनी केला आहे.फेरीवाला धोरणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी गुरुवारी दुपारी १२ वाजता बैठक बोलावली होती. मात्र, वेलरासू यांना तातडीच्या कामासाठी मंत्रालयात जावे लागल्याने बैठक रद्द करावी लागल्याचे कारण दिले असले, तरी त्यांना फेरीवाल्यांसाठी वेळ नाही, अशा शब्दांत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, यामुळे एकंदरीतच प्रशासनाच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.फेरीवाला अतिक्रमणाचा मुद्दा कायम असताना त्यांच्या पुनर्वसनाच्या अनुषंगाने आजवर कोणतीही ठोस कृती केडीएमसीने केलेली नाही. केडीएमसीने स्थापन केलेली शहर फेरीवाला समिती ही नगरपथविके्रता समिती म्हणून पुनर्जीवित केली आहे. या समितीचे अध्यक्ष आयुक्त हे स्वत: असून यात प्रमुख अधिकारी आणि फेरीवाला संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. परंतु, वेलरासू यांनी स्वत: बोलावलेली बैठक त्यांनीच रद्द केल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले. काही जणांना दूरध्वनीवर बैठक रद्द झाल्याची माहिती देण्यात आली, तर काहींना केडीएमसीच्या मुख्यालयात आल्यावरच बैठक रद्द झाल्याचे कळले. त्यामुळे फेरीवाल्यांनी नाराजी व्यक्त केली.>पुढील बैठकीची तारीखही नाहीआयुक्त पी. वेलरासू यांना मंत्रालयात कामासाठी जावे लागल्याने गुरुवारी बैठक रद्द झाल्याचे आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, असे असलेतरी पुढील बैठकीची तारीख मात्र सांगितलेली नाही. प्रशासनाला फेरीवालाप्रश्नी कोणतेही गांभीर्य नाही. आयुक्तांना फेरीवाल्यांसाठी वेळ नाही, अशी टीका फेरीवाला संघटनांच्या प्रतिनिधींनी केली आहे.>काटेमानिवलीत फेरीवाल्यांवर कारवाईकोळसेवाडी : कल्याण पूर्वेतील केडीएमसीच्या ‘जे’ प्रभाग क्षेत्राचे अधिकारी भागाजी भांगरे यांच्या पथकाने गुरुवारी पोलीस बंदोबस्तात काटेमानिवली येथील फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली. त्यात महापालिकेच्या शाळेसमोरील १२ पक्क्या शेड आणि चार पक्क्या टपºया जमीनदोस्त केल्या. दरम्यान, प्रल्हाद शिंदे उड्डाणपूल ते कोळसेवाडी गणपती मंदिरापर्यंतच्या दोन्ही बाजूंकडील फेरीवाले व वाहनांचे पार्किंग यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. महापालिकेने येथील फेरीवल्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.