शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

केडीएमसीचे फेरीवाला धोरणच चुकीचे, आयुक्त मंत्रालयात गेल्याने बैठक झाली रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 03:23 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून फेरीवाल्यांसाठी राबवले जाणारे धोरण चुकीचे आहे. शहरातील लोकसंख्येच्या प्रमाणात म्हणजे प्रत्येक प्रभागात अडीच टक्के फेरीवाले असतील, असे हे धोरण आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून फेरीवाल्यांसाठी राबवले जाणारे धोरण चुकीचे आहे. शहरातील लोकसंख्येच्या प्रमाणात म्हणजे प्रत्येक प्रभागात अडीच टक्के फेरीवाले असतील, असे हे धोरण आहे. त्यानुसार, अडीचशे फेरीवाले प्रत्येक प्रभागात बसवले जाणार आहेत. परंतु, जेथे व्यवसाय होऊ शकत नाही, अशा ठिकाणी फेरीवाल्यांचे पुनर्वसन करणे हिताचे ठरणार नाही. पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांच्या जागी जर फेरीवाले बसवले, तर मोठा गोंधळ उडेल. त्यामुळे कुठलाही अभ्यास न करता हे धोरण ठरवल्याचे फेरीवाला संघटनेचे नेते अरविंद मोरे यांचे म्हणणे आहे.केडीएमसी हद्दीत दोनतीन वर्षांत मोठ्या प्रमाणात फेरीवाले वाढले आहेत. या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण महापालिके कडून केले जाणार आहे. मात्र, त्यासाठी भरून घेण्यात येत असलेल्या अर्जासाठी अधिकारी बक्कळ पैसे उकळत आहेत. त्यामुळे त्यात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे, असा आरोपही मोरे यांनी केला आहे.फेरीवाला धोरणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी गुरुवारी दुपारी १२ वाजता बैठक बोलावली होती. मात्र, वेलरासू यांना तातडीच्या कामासाठी मंत्रालयात जावे लागल्याने बैठक रद्द करावी लागल्याचे कारण दिले असले, तरी त्यांना फेरीवाल्यांसाठी वेळ नाही, अशा शब्दांत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, यामुळे एकंदरीतच प्रशासनाच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.फेरीवाला अतिक्रमणाचा मुद्दा कायम असताना त्यांच्या पुनर्वसनाच्या अनुषंगाने आजवर कोणतीही ठोस कृती केडीएमसीने केलेली नाही. केडीएमसीने स्थापन केलेली शहर फेरीवाला समिती ही नगरपथविके्रता समिती म्हणून पुनर्जीवित केली आहे. या समितीचे अध्यक्ष आयुक्त हे स्वत: असून यात प्रमुख अधिकारी आणि फेरीवाला संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. परंतु, वेलरासू यांनी स्वत: बोलावलेली बैठक त्यांनीच रद्द केल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले. काही जणांना दूरध्वनीवर बैठक रद्द झाल्याची माहिती देण्यात आली, तर काहींना केडीएमसीच्या मुख्यालयात आल्यावरच बैठक रद्द झाल्याचे कळले. त्यामुळे फेरीवाल्यांनी नाराजी व्यक्त केली.>पुढील बैठकीची तारीखही नाहीआयुक्त पी. वेलरासू यांना मंत्रालयात कामासाठी जावे लागल्याने गुरुवारी बैठक रद्द झाल्याचे आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, असे असलेतरी पुढील बैठकीची तारीख मात्र सांगितलेली नाही. प्रशासनाला फेरीवालाप्रश्नी कोणतेही गांभीर्य नाही. आयुक्तांना फेरीवाल्यांसाठी वेळ नाही, अशी टीका फेरीवाला संघटनांच्या प्रतिनिधींनी केली आहे.>काटेमानिवलीत फेरीवाल्यांवर कारवाईकोळसेवाडी : कल्याण पूर्वेतील केडीएमसीच्या ‘जे’ प्रभाग क्षेत्राचे अधिकारी भागाजी भांगरे यांच्या पथकाने गुरुवारी पोलीस बंदोबस्तात काटेमानिवली येथील फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली. त्यात महापालिकेच्या शाळेसमोरील १२ पक्क्या शेड आणि चार पक्क्या टपºया जमीनदोस्त केल्या. दरम्यान, प्रल्हाद शिंदे उड्डाणपूल ते कोळसेवाडी गणपती मंदिरापर्यंतच्या दोन्ही बाजूंकडील फेरीवाले व वाहनांचे पार्किंग यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. महापालिकेने येथील फेरीवल्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.