शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

केडीएमसीकडे पाणीपुरवठ्याचे ३०७ कोटी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 23:49 IST

२७ गावांचाही समावेश : कारखान्यांसह सरकारी कार्यालयांवरही मोठ्या प्रमाणात थकबाकी

कल्याण : पाणीपुरवठ्याच्या बिलापोटी केडीएमसी आणि २७ गावांकडे एमआयडीसीची तब्बल ३०७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकी मागील अनेक वर्षांपासून ही थकबाकी असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. केडीएमसी आणि २७ गावांसह कारखाने आणि अन्य सरकारी कार्यालयांचीही थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे. एमआयडीसी परिक्षेत्रात पाणीगळतीचे प्रमाण १७.२२ टक्के असून ही गळती आणि पाणीचोरीला आळा घातल्यास पाणीकपात करण्याची गरजच भासणार नाही, याकडे डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी लक्ष वेधले आहे.

नलावडे यांनी माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीतून पाणीबिलाची बिले डोळे विस्फारणारी समोर आली आहे. या माहितीनुसार, केडीएमसीकडून एमआयडीसीला देय असलेली पाणीबिलाची रककम १५५ कोटी ७२ लाख असून २७ गावांची थकबाकी १५२ कोटी सहा लाख इतकी आहे. पूर्वीची थकबाकी, त्यात परिक्षेत्रातील काही गावठाणांना होणाऱ्या पाच एमएलडी पाणीपुरवठ्याची थकीत रक्कम आणि महापालिकेत समावेश झालेल्या २७ गावांची थकबाकी अशी एकूण ३०७ कोटी ७८ लाख रुपयांची थकबाकी केडीएमसीकडून एमआयडीसीला येणे आहे. महत्त्वाचे म्हणजे, एमआयडीसी परिक्षेत्रातील सुमारे १०० कंपन्यांनीही मोठ्या प्रमाणात पाणीबिल थकवले असून ती थकबाकीही कोट्यवधींच्या घरात आहे. प्रदूषणामुळे काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत हिरवा पाऊस पडला होता. त्याला कारणीभूत ठरलेल्या ओमकार इंजिनीअर्स कंपनीचाही या थकबाकीदारांमध्ये समावेश आहे.

२१ जानेवारी २०१४ रोजी एमआयडीसी परिक्षेत्रात हिरवा पाऊस पडला होता. यात बेकायदेशीरपणे रंग बनवणाºया ओमकार इंजिनीअर्स या कंपनीला जबाबदार धरण्यात आले होते. या कंपनीला नोटीस बजावून प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईदेखील केली होती. यावर्षी या घटनेला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. या कंपनीकडे एक लाख १३ हजार रुपयांची थकबाकी आहे. त्याचबरोबर अन्य सरकारी कार्यालयांकडूनही लाखोंची रक्कम एमआयडीसीला येणे बाकी आहे. दरम्यान, केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी थकीत रकमेची सविस्तर माहिती घेतल्यानंतर याबाबत बोलणे शक्य होईल, असे सांगितले. परंतु, २७ गावांची थकबाकी ती महापालिकेत समाविष्ट होण्यापूर्वीची असेल. ही थकबाकी कदाचित एमआयडीसीवर लादली गेली असावी, असेही त्यांनी सांगितले.नवीन जलवाहिन्यांचे काम सुरू : डोंबिवली एमआयडीसी फेज-२ मध्ये नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. ते काम १९ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. कल्याण रोड व खंबाळपाडा रोडच्या बाजूने जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण करण्याची मुदत जुलै २०२० पर्यंत आहे. फेज-१ मधील कामाची निविदा मंजुरीसाठी सादर करण्यात आली असून हे काम पूर्ण करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.गळती नसल्याचा दावासद्य:स्थितीत एमआयडीसी परिक्षेत्रात सलग ३० तासांची पाणीकपात लागू आहे. त्यामुळे गुरुवार सायंकाळपासून ते शुक्रवारी रात्री १२ पर्यंत पाणीपुरवठा बंद असतो. दरम्यान, माहितीच्या अधिकारात एमआयडीसी परिक्षेत्रात पाणीगळतीचे प्रमाण १७.२२ टक्केअसल्याचे समोर आले आहे. कमीजास्त होणारा पाण्याचा दाब, यात जलवाहिनीवरील एअरव्हॉल्व्ह तसेच जोडणी नादुरुस्त होऊन गळती होत असल्याचे एमआयडीसीचे म्हणणे आहे. गळती होणाºया जलवाहिन्या तत्काळ दुरुस्त केल्या जात असून सद्य:स्थितीत कोणतीही गळती होत नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका