शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसनामध्ये केडीएमसीकडून दुजाभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 00:38 IST

रस्ता रुंदीकरण असो अथवा अन्य प्रकल्पांत विस्थापित होणाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी केडीएमसीकडून दिरंगाई होते.

कल्याण : रस्ता रुंदीकरण असो अथवा अन्य प्रकल्पांत विस्थापित होणाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी केडीएमसीकडून दिरंगाई होते. मात्र, काही ठिकाणी दुजाभाव होत असल्याचा आरोप होत आहे. शिवाजी चौक ते महंमदअली चौक मार्गावर रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या व्यापाºयांचे तत्काळ पुनर्वसन केल्याने जुन्या विस्थापितांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी एका बाधिताने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करत गाळेवाटपात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे.केडीएमसीने जानेवारी २०१६ मध्ये पश्चिमेतील शिवाजी चौक ते महंमद अली चौक या प्रमुख रस्त्याचे रुंदीकरण केले होते. या कारवाईत रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडील असलेल्या दुकानांच्या वाढीव बांधकामांवर हातोडा घालण्यात आला. त्यात काही इमारतीही बाधित झाल्या. या कारवाईअंतर्गत ३१२ जणांना नोटिसा बजावल्या होत्या, परंतु या रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या काही व्यापाºयांनी सर्रासपणे दुरुस्तीच्या नावाखाली वाढीव बांधकामे केली. काही बांधकामांचे इमले दोन ते तीन मजल्यांपर्यंत उभारले गेले. ज्यांच्या बांधकामांना स्थगिती आदेश आहेत, त्यांचेही या रस्ता रुंदीकरणात चांगलेच फावले. निवासी वापरासाठी असलेल्या इमारतींना रस्ता रुंदीकरणानंतर व्यवसायिक स्वरूप आले. एकंदरीतच हे चित्र पाहता, केडीएमसी प्रशासनाची डोळेझाक भूमिका त्या वेळी संशयास्पद अशी ठरली होती. संबंधित अधिकाºयांवर कारवाई करा, असे ठरावही त्या वेळी एकमताने स्थायी आणि महासभेत मंजूर करण्यात आले होते, परंतु कालांतराने मात्र सर्वांनीच मौन पाळल्याने वाढीव बांधकामे जैसे थे राहिली. दरम्यान, या रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्यांना डोंबिवलीतील पी.पी. चेंबर्स येथे तयार गाळे देऊन त्यांचे तत्काळ पुनर्वसन केल्याकडे तक्रारदार राम बनसोडे यांनी लक्ष वेधले आहे.बनसोडे यांचा राम फुटवेअर गाळा दक्षता पोलीस चौकी ते वनश्री सृष्टी या रस्ता रुंदीकरणात तोडला. परंतु झोजवाला शॉपिंग सेंटर, सॅटीस प्रकल्प आणि बीएसयूपी योजनेमध्ये गाळा देण्याच्या आश्वासनाव्यतिरिक्त काहीही मिळालेले नाही. २००६ मध्ये गटई स्टॉलचे लायसन्स दिले होते. परंतु, पुनर्वसन समितीने गाळा देण्याऐवजी गटई स्टॉल दिला, असा चुकीचा निष्कर्ष ठेवून आम्हाला लाभापासून वंचित ठेवल्याचे बनसोडे यांचे म्हणणे आहे.>२००३ पासून गाळ्यापासून वंचित२००३ पासून पाठपुरावा सुरू असताना आम्ही अद्याप वंचित आहोत, परंतु २०१६ मधील बाधितांचे तत्काळ पुनर्वसन केले आहे. केडीएमसीचा हा दुजाभाव असून, संबंधितांकडून पैसे घेऊन त्यांना गाळ्यांचे वाटप केल्याचा बनसोडे यांचा आरोप आहे. या संदर्भात मालमत्ता विभाग व्यवस्थापक अमित पंडित यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका