शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

उल्हासनगरात रंगला काव्योत्सव, ३५ कविंचा सहभाग

By सदानंद नाईक | Updated: February 26, 2024 20:06 IST

उल्हासनगरातील कालिका कला मंडळाने अमृत महोत्सवात पर्दापण केले असून त्यानिमित्त संस्थेने काव्योत्सव कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी संस्थेच्या सभागृहात केले.

उल्हासनगर: शहरातील श्री कालिका कला मंडळाच्या अमृत महोत्सवानिमित्त सोमवारी कविता - गझलांचा देखणा काव्योत्सव कार्यक्रम साजरा झाला. संस्थेने आयोजित केलेल्या काव्यवाचन स्पर्धेतील निमंत्रितांच्या संमेलनातील कवी कवयित्री अशा एकूण ३५ कविंनी ह्या काव्यसोहळ्यात भाग घेतला आहे.

उल्हासनगरातील कालिका कला मंडळाने अमृत महोत्सवात पर्दापण केले असून त्यानिमित्त संस्थेने काव्योत्सव कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी संस्थेच्या सभागृहात केले. ज्येष्ठ कवी गीतकार अरुण म्हात्रे, गझलकार प्रशांत वैद्य, पत्रकार माधव डोळे, डॉ. नरसिंग इंगळे, भरत भानुशाली, विजय जाधव, नंदा कोकाटे, मीनाक्षी ठाकरे आदींनी कार्यक्रमात सहभाग नोंदविला. कार्यक्रमात प्रेम कविता, देशप्रेमाच्या कविता, मराठीभाषा गौरवाच्या कविता आणि काळजाचा ठाव घेणाऱ्या गझला आदींचा भरपूर आनंद रसिकांना मिळाला. ह्या प्रसंगी बोलताना कवी अरुण म्हात्रे यांनी उल्हासनगरमधील काव्य रसिकांचे कौतुक केले आणि कवितेतून मनातील ताणेबाणे आणि समाज वास्तव यातील सुप्त खाचाखोचा याचे दर्शन घडते, असे उदगार काढले.

शहरातील कालिका कला मंडळाने आयोजित केलेल्या काव्यउत्सव स्पर्धेत नवीन एकूण २३ कवींना स्पर्धेत सहभाग घेण्याची संधी मिळाली. स्पर्धेत प्रथम क्रमांक किशोर पवार-वसई, द्वितीय क्रमांक- सौ.वैशाली भागवत- बडोदे, तृतीय क्रमांक- सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर. तर उत्तेजनार्थ म्हणून सौ. स्मिता शिंदे, सुधाकर कांबळे, आणि सौ.दीप्ती चाफेकर यांनी पारितोषिक पटकावले. परीक्षक म्हणून कवी अरूण म्हात्रे आणि पत्रकार कवी माधव डोळे यांनी काम पहिले. कविता लेखन स्पर्धेत एकुण ५७ कवींनी भाग घेतला होता. त्यातील २५ कवींच्या कवितांची निवड डॉ.ज्योतीेे कदम- नांदेड, प्रा.बाळासाहेब लबडे व गझलकार माधव डोळे यांनी केली होती.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर