शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

उल्हासनगरात रंगला काव्योत्सव, ३५ कविंचा सहभाग

By सदानंद नाईक | Updated: February 26, 2024 20:06 IST

उल्हासनगरातील कालिका कला मंडळाने अमृत महोत्सवात पर्दापण केले असून त्यानिमित्त संस्थेने काव्योत्सव कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी संस्थेच्या सभागृहात केले.

उल्हासनगर: शहरातील श्री कालिका कला मंडळाच्या अमृत महोत्सवानिमित्त सोमवारी कविता - गझलांचा देखणा काव्योत्सव कार्यक्रम साजरा झाला. संस्थेने आयोजित केलेल्या काव्यवाचन स्पर्धेतील निमंत्रितांच्या संमेलनातील कवी कवयित्री अशा एकूण ३५ कविंनी ह्या काव्यसोहळ्यात भाग घेतला आहे.

उल्हासनगरातील कालिका कला मंडळाने अमृत महोत्सवात पर्दापण केले असून त्यानिमित्त संस्थेने काव्योत्सव कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी संस्थेच्या सभागृहात केले. ज्येष्ठ कवी गीतकार अरुण म्हात्रे, गझलकार प्रशांत वैद्य, पत्रकार माधव डोळे, डॉ. नरसिंग इंगळे, भरत भानुशाली, विजय जाधव, नंदा कोकाटे, मीनाक्षी ठाकरे आदींनी कार्यक्रमात सहभाग नोंदविला. कार्यक्रमात प्रेम कविता, देशप्रेमाच्या कविता, मराठीभाषा गौरवाच्या कविता आणि काळजाचा ठाव घेणाऱ्या गझला आदींचा भरपूर आनंद रसिकांना मिळाला. ह्या प्रसंगी बोलताना कवी अरुण म्हात्रे यांनी उल्हासनगरमधील काव्य रसिकांचे कौतुक केले आणि कवितेतून मनातील ताणेबाणे आणि समाज वास्तव यातील सुप्त खाचाखोचा याचे दर्शन घडते, असे उदगार काढले.

शहरातील कालिका कला मंडळाने आयोजित केलेल्या काव्यउत्सव स्पर्धेत नवीन एकूण २३ कवींना स्पर्धेत सहभाग घेण्याची संधी मिळाली. स्पर्धेत प्रथम क्रमांक किशोर पवार-वसई, द्वितीय क्रमांक- सौ.वैशाली भागवत- बडोदे, तृतीय क्रमांक- सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर. तर उत्तेजनार्थ म्हणून सौ. स्मिता शिंदे, सुधाकर कांबळे, आणि सौ.दीप्ती चाफेकर यांनी पारितोषिक पटकावले. परीक्षक म्हणून कवी अरूण म्हात्रे आणि पत्रकार कवी माधव डोळे यांनी काम पहिले. कविता लेखन स्पर्धेत एकुण ५७ कवींनी भाग घेतला होता. त्यातील २५ कवींच्या कवितांची निवड डॉ.ज्योतीेे कदम- नांदेड, प्रा.बाळासाहेब लबडे व गझलकार माधव डोळे यांनी केली होती.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर