शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
3
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
4
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
5
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
6
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
7
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
8
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
9
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
10
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
11
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
13
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
14
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
15
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
16
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
17
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
18
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
19
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
20
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले

काव्यमैफलीतून मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

By admin | Updated: July 3, 2017 06:23 IST

शेतकऱ्यांच्या व्यथांवर प्रकाश टाकणाऱ्या विविध कविता आगरायन काव्यमैफलीत सादर झाल्या. यात शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या, भूमिपुत्रांच्या

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शेतकऱ्यांच्या व्यथांवर प्रकाश टाकणाऱ्या विविध कविता आगरायन काव्यमैफलीत सादर झाल्या. यात शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या, भूमिपुत्रांच्या व्यथा मांडणाऱ्या कवितांचादेखील समावेश होता. शेतकरी आतंकवादी वाटत आहे का, असा सणसणीत सवालदेखील कवितांच्या माध्यमातून करण्यात आला. प्रकल्पग्रस्तांचे नेते, साडेबारा टक्के कायद्याचे प्रणेते दिवंगत लोकनेते दि.बा. पाटील यांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त पनवेल येथे आगरी-मराठी कवितांची मैफल ‘आगरायन’ आयोजित करण्यात आली होती. दिबांना आगळीवेगळी काव्यमय आदरांजली वाहण्यासाठी या कार्यक्र माचे आयोजन पनवेल-उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने केले होते. पनवेलच्या महात्मा जोतिबा फुले सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. मैफलीची सुरुवात गायक-वादक लोमहर्ष भगत आणि सुजित पाटील यांनी गिटारसोबत ‘मिठाला जागलेलु’ हे गीत दिबांना अर्पण करून केली. त्यानंतर, ‘ब आणि बा’ ही आई आणि बाबांचे महत्त्व सांगणारी कविता डॉ. अनिल रत्नाकर यांनी सादर केली. आजही शेतकऱ्यांचे हाल तेच आहेत, हे सांगत प्रकाश पाटील यांनी ‘भरोसा’ ही कविता सादर केली. काँग्रेसच्या काळात शेतकऱ्यांवर गोळीबार झाला होता आणि आताच बीजेपीच्या काळात कालपरवा नेवाळी येथे शेतकऱ्यांवर पॅलेटगनचा वापर करण्यात आला. सरकारला शेतकरी आतंकवादी वाटत आहे का, असा सणसणीत सवाल करत ‘नेवाळी-एक इशारा’ ही आगरी बोलीतील कविता ज्ञानेश्वर चिकणे यांनी सादर केली. दिबांनी शिक्षणाला खूप महत्त्व दिले. त्यांनी १०० हून अधिक शाळा काढल्या. याचाच दाखला देत, शिक्षणाचे महत्त्व पटवत ‘डावा डोला लवला’ ही कविता गजानन पाटील यांनी सादर केली. शेतकऱ्यांसाठी झटणारा ‘शेतकऱ्यांचा बा’ ही कविता सर्वेश तरे यांनी सादर केली. नगरसेविका रंजना केणी यांनी ‘जमीन’ ही कविता सादर करत भूमिपुत्रांच्या व्यथा मांडल्या. दि.बा. पाटलांच्या स्मृती जागवण्यासाठी खास विजय गायकर आणि सर्वेश तरेंनी त्यांच्या आठवणी सांगितल्या. प्रस्तुत कार्यक्र मास दिबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचे पुत्र आणि कन्या अतुल पाटील, अंजली भगत उपस्थित होते.