शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

काव्यमैफलीतून मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

By admin | Updated: July 3, 2017 06:23 IST

शेतकऱ्यांच्या व्यथांवर प्रकाश टाकणाऱ्या विविध कविता आगरायन काव्यमैफलीत सादर झाल्या. यात शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या, भूमिपुत्रांच्या

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शेतकऱ्यांच्या व्यथांवर प्रकाश टाकणाऱ्या विविध कविता आगरायन काव्यमैफलीत सादर झाल्या. यात शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या, भूमिपुत्रांच्या व्यथा मांडणाऱ्या कवितांचादेखील समावेश होता. शेतकरी आतंकवादी वाटत आहे का, असा सणसणीत सवालदेखील कवितांच्या माध्यमातून करण्यात आला. प्रकल्पग्रस्तांचे नेते, साडेबारा टक्के कायद्याचे प्रणेते दिवंगत लोकनेते दि.बा. पाटील यांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त पनवेल येथे आगरी-मराठी कवितांची मैफल ‘आगरायन’ आयोजित करण्यात आली होती. दिबांना आगळीवेगळी काव्यमय आदरांजली वाहण्यासाठी या कार्यक्र माचे आयोजन पनवेल-उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने केले होते. पनवेलच्या महात्मा जोतिबा फुले सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. मैफलीची सुरुवात गायक-वादक लोमहर्ष भगत आणि सुजित पाटील यांनी गिटारसोबत ‘मिठाला जागलेलु’ हे गीत दिबांना अर्पण करून केली. त्यानंतर, ‘ब आणि बा’ ही आई आणि बाबांचे महत्त्व सांगणारी कविता डॉ. अनिल रत्नाकर यांनी सादर केली. आजही शेतकऱ्यांचे हाल तेच आहेत, हे सांगत प्रकाश पाटील यांनी ‘भरोसा’ ही कविता सादर केली. काँग्रेसच्या काळात शेतकऱ्यांवर गोळीबार झाला होता आणि आताच बीजेपीच्या काळात कालपरवा नेवाळी येथे शेतकऱ्यांवर पॅलेटगनचा वापर करण्यात आला. सरकारला शेतकरी आतंकवादी वाटत आहे का, असा सणसणीत सवाल करत ‘नेवाळी-एक इशारा’ ही आगरी बोलीतील कविता ज्ञानेश्वर चिकणे यांनी सादर केली. दिबांनी शिक्षणाला खूप महत्त्व दिले. त्यांनी १०० हून अधिक शाळा काढल्या. याचाच दाखला देत, शिक्षणाचे महत्त्व पटवत ‘डावा डोला लवला’ ही कविता गजानन पाटील यांनी सादर केली. शेतकऱ्यांसाठी झटणारा ‘शेतकऱ्यांचा बा’ ही कविता सर्वेश तरे यांनी सादर केली. नगरसेविका रंजना केणी यांनी ‘जमीन’ ही कविता सादर करत भूमिपुत्रांच्या व्यथा मांडल्या. दि.बा. पाटलांच्या स्मृती जागवण्यासाठी खास विजय गायकर आणि सर्वेश तरेंनी त्यांच्या आठवणी सांगितल्या. प्रस्तुत कार्यक्र मास दिबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचे पुत्र आणि कन्या अतुल पाटील, अंजली भगत उपस्थित होते.