शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

कातकरी उत्थान अभियानास गालबोट ; मुरबाड तालुक्यातील कातकरी कुटुंबाचे घरे तोडूनही पोलिसांसह प्रशासन बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 19:43 IST

इंदे येथील वृध्द कुटुंबाचे राहते घर बिगर आदिवासी जमीन मालकाने तोडून या परिवारावर अन्याय केल्याचा आरोप करून त्यास न्याय मिळवून देण्यासाठी श्रमीक मुक्ती संघटनेच्या वरिष्ठ नेत्या अ‍ॅड. इंडवी तुळपुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असतानाचएका आदिवासी - कातकरी वृध्द कुटुंबाचे राहते घर तोडून त्यास बेघर केलेपोलिसांनी देखील त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाहीनुकताच महसूल विभागाने आता पंचनामा केल्याचे तुळपुळे यांनी सांगितले

ठाणे : देशभर ज्या दिवशी सर्वजण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असतानाच मुरबाड तालुक्यातील इंदे गावामधील एका आदिवासी - कातकरी वृध्द कुटुंबाचे राहते घर तोडून त्यास बेघर केले.त्यांची दखल महसूल अधिकाऱ्यांसह पोलिसांनी देखील घेतली नाही, यामुळे कातकरी उत्थान अभियानास गालबोट लागून अधिका-यांची निष्काळजी उघड झाली.आदिवासी - कातकरी समाजाच्या सर्वांगिण विकासा करीता कातकरी उत्थान अभियान राबवले जात आहे. केवळ कागदावर रंगवण्यात येत असलेल्या या अभियानाचा अद्यापही भरीव लाभ कातकरी कुटुंबियाना झालेला नसल्याचे सांगितले जात आहे. त्यात इंदे येथील वृध्द कुटुंबाचे राहते घर बिगर आदिवासी जमीन मालकाने तोडून या परिवारावर अन्याय केल्याचा आरोप करून त्यास न्याय मिळवून देण्यासाठी श्रमीक मुक्ती संघटनेच्या वरिष्ठ नेत्या अ‍ॅड. इंडवी तुळपुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.याशिवाय ठाणे जिल्हाधिका-यांसह विभागीय आयुक्तांच्या निदर्शनात ही दुर्दैवी घटना आणल्याचे तुळपुळे यांनी सांगितले. जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात इंदे गावातील एका वृद्ध कातकारी जोडप्याचे झोपडे १४ एप्रिल रोजी दुपारी तोडले. त्यांना बेघर केले गेले. त्याच दिवशी संध्याकाळी स्थानिक टोकावडे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार घेऊन गेलेल्या कातकरी वृद्धेला चौकशी करू, असे फक्त आश्वासन देऊन त्याच्या तक्रारीची दखल घेतली नसल्याचा आरोप मुख्यमंत्र्याना दिलेले पत्रात करण्यात आला. गेल्या वर्षी कातक-यांच्या घरठान विषयी महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढून त्यांच्या घरांच्या नोंदींचे आदेश सर्व जिल्ह्यातील महसूल अधिका-यांना दिले आहे.या जोडप्याच्या झोपडीची नोंद शासन दरबारी आहे. असे असतानाही बिगर आदिवासी जमीन मालकाने या आदिवासिना हाकलून लावण्यासाठी त्यांचे घरच तोडून त्यांना बेघर केले आहे. पोलिसांनी देखील त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही म्हणून त्यांनी गुरूवारी १९ एप्रिल रोाजी स्थानिक श्रमिक मुक्ति संघटनेतर्फे तहसीलदाराना पत्र दिले व करवाईची मागणी केली. नुकताच महसूल विभागाने आता पंचनामा केल्याचे तुळपुळे यांनी सांगितले. जीव घेण्या उष्णतेच्या लाटेत हे जोडपे उघड्यावर पडले आहे. कोंकण विभागात गाजावाजाने सुरु असलेल्या कातकरी उत्थान अभियानाच्या कार्यक्रमास या दुर्दैवी घटनेमुळे गालबोट लागले आहे. तातडीने व गंभीरतापूर्वक लक्ष घालून कठोर करवाई तसेच या कुटुंबाच्या निवार्याची सोया करण्यासाठी प्रशासनाचे लक्ष केंद्रीत करून त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे...........

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार