शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

कातकरी उत्थान अभियानास गालबोट ; मुरबाड तालुक्यातील कातकरी कुटुंबाचे घरे तोडूनही पोलिसांसह प्रशासन बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 19:43 IST

इंदे येथील वृध्द कुटुंबाचे राहते घर बिगर आदिवासी जमीन मालकाने तोडून या परिवारावर अन्याय केल्याचा आरोप करून त्यास न्याय मिळवून देण्यासाठी श्रमीक मुक्ती संघटनेच्या वरिष्ठ नेत्या अ‍ॅड. इंडवी तुळपुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असतानाचएका आदिवासी - कातकरी वृध्द कुटुंबाचे राहते घर तोडून त्यास बेघर केलेपोलिसांनी देखील त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाहीनुकताच महसूल विभागाने आता पंचनामा केल्याचे तुळपुळे यांनी सांगितले

ठाणे : देशभर ज्या दिवशी सर्वजण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असतानाच मुरबाड तालुक्यातील इंदे गावामधील एका आदिवासी - कातकरी वृध्द कुटुंबाचे राहते घर तोडून त्यास बेघर केले.त्यांची दखल महसूल अधिकाऱ्यांसह पोलिसांनी देखील घेतली नाही, यामुळे कातकरी उत्थान अभियानास गालबोट लागून अधिका-यांची निष्काळजी उघड झाली.आदिवासी - कातकरी समाजाच्या सर्वांगिण विकासा करीता कातकरी उत्थान अभियान राबवले जात आहे. केवळ कागदावर रंगवण्यात येत असलेल्या या अभियानाचा अद्यापही भरीव लाभ कातकरी कुटुंबियाना झालेला नसल्याचे सांगितले जात आहे. त्यात इंदे येथील वृध्द कुटुंबाचे राहते घर बिगर आदिवासी जमीन मालकाने तोडून या परिवारावर अन्याय केल्याचा आरोप करून त्यास न्याय मिळवून देण्यासाठी श्रमीक मुक्ती संघटनेच्या वरिष्ठ नेत्या अ‍ॅड. इंडवी तुळपुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.याशिवाय ठाणे जिल्हाधिका-यांसह विभागीय आयुक्तांच्या निदर्शनात ही दुर्दैवी घटना आणल्याचे तुळपुळे यांनी सांगितले. जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात इंदे गावातील एका वृद्ध कातकारी जोडप्याचे झोपडे १४ एप्रिल रोजी दुपारी तोडले. त्यांना बेघर केले गेले. त्याच दिवशी संध्याकाळी स्थानिक टोकावडे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार घेऊन गेलेल्या कातकरी वृद्धेला चौकशी करू, असे फक्त आश्वासन देऊन त्याच्या तक्रारीची दखल घेतली नसल्याचा आरोप मुख्यमंत्र्याना दिलेले पत्रात करण्यात आला. गेल्या वर्षी कातक-यांच्या घरठान विषयी महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढून त्यांच्या घरांच्या नोंदींचे आदेश सर्व जिल्ह्यातील महसूल अधिका-यांना दिले आहे.या जोडप्याच्या झोपडीची नोंद शासन दरबारी आहे. असे असतानाही बिगर आदिवासी जमीन मालकाने या आदिवासिना हाकलून लावण्यासाठी त्यांचे घरच तोडून त्यांना बेघर केले आहे. पोलिसांनी देखील त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही म्हणून त्यांनी गुरूवारी १९ एप्रिल रोाजी स्थानिक श्रमिक मुक्ति संघटनेतर्फे तहसीलदाराना पत्र दिले व करवाईची मागणी केली. नुकताच महसूल विभागाने आता पंचनामा केल्याचे तुळपुळे यांनी सांगितले. जीव घेण्या उष्णतेच्या लाटेत हे जोडपे उघड्यावर पडले आहे. कोंकण विभागात गाजावाजाने सुरु असलेल्या कातकरी उत्थान अभियानाच्या कार्यक्रमास या दुर्दैवी घटनेमुळे गालबोट लागले आहे. तातडीने व गंभीरतापूर्वक लक्ष घालून कठोर करवाई तसेच या कुटुंबाच्या निवार्याची सोया करण्यासाठी प्रशासनाचे लक्ष केंद्रीत करून त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे...........

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार