शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारमधील ३३ आदिम कुटुंबांची वर्षानुवर्षे फरफट, कातकरी कुटुंबांना शासकीय ओळख कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 09:51 IST

जव्हारपासून १६ किमी अंतरावर असलेल्या झाप ग्रामपंचायतीमधील आदिवासीबहुल लोकवस्ती असलेल्या धोंडपाड्यात १५० घरांची लोकवस्ती आहे.

- रवींद्र साळवेमोखाडा : एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा होत असताना दुसरीकडे जव्हार तालुक्यातील आदिम ३३ कातकरी कुटुंबांकडे शासकीय ओळखच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.जव्हारपासून १६ किमी अंतरावर असलेल्या झाप ग्रामपंचायतीमधील आदिवासीबहुल लोकवस्ती असलेल्या धोंडपाड्यात १५० घरांची लोकवस्ती आहे. या पाड्यावरील लोकसंख्या ६३७ आहे. तर कातकरी समाजाची ५५ घरे असून, २३० लोकसंख्या आहे. दशरथ तुळशीराम जाधव (वय २६) यांच्या कुटुंबात आई, पत्नी, एक बहीण आणि तीन मुली असा परिवार आहे. पण, या कुटुंबाकडे स्वतःची शेती नाही. आठ महिने स्थलांतरित होऊनच हे कुटुंब उदरनिर्वाह करतात. एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना दुसरीकडे या कुटुंबीयांकडे मतदान कार्ड, रेशन कार्ड, जॉब कार्ड, जातीचा दाखलाच काय तर कोणतीच शासकीय कागदपत्रे नाहीत. यामुळे कोणत्याच योजना या कुटुंबापर्यंत पोहोचत नाहीत. हे एकच कुटुंब असे आहे असे नाही, तर अशी ३३ कुटुंबे तिथे आहेत, ज्यांच्याकडे अद्यापही कोणतीच शासकीय कागदपत्रे नाहीत. त्यामुळे हे लोक बेघर आहेत. यामुळे ही कुटुंबे स्थलांतरित होण्याच्या अगोदरच येथे कॅम्प आयोजित करून या कुटुंबांना शासकीय कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची मागणी बविआचे तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांनी केली आहे.इतर समाजापेक्षा अगदी वेगळी जीवनशैली जगणारा कातकरी बांधव कायमच गावकुसाबाहेर राहिला आहे. त्यांच्याकडे मालकीची जमीन नाही. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावर अनेक प्रयत्न झाले, विविध योजना सुरू झाल्या. मात्र, त्यांची अंमलबजावणी नीट झाली नाही. शासनाच्या उदासीन धोरणामुळे हा समाज दुर्लक्षित राहिला आहे. रोजगारासाठी दिवाळी संपताच वीटभट्टी, बांधकामाच्या ठिकाणी  स्थलांतरित व्हावे लागते.

ढोरमेहनत अन् तुटपुंजी कमाई 

    वीटभट्टीवर कामासाठी भल्या पहाटेच उठावे लागते.     नोव्हेंबर ते जानेवारी या काळात कडाक्याची थंडी असतानाही अंगावर काम घेतल्याने चिखल करणे, विटा थापणे, भट्टी रचणे आदी कामे दिवसभर उभे राहूनच करावी लागतात. या बदल्यात वीटभट्टी मालकांकडून आधीच उचल घेतल्यामुळे आठवड्याला घरातील साहित्य घेण्यापुरते पैसे मिळतात.    व्यसनाधीनतेची जोड असल्याने ढोरमेहनत अन् कमाई तुटपुंजी अशी स्थिती आहे.

टॅग्स :palgharपालघर