शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

काश्मिरी मुलींच्या नृत्याने भरले रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 04:52 IST

नववर्ष स्वागतयात्रेच्या पूर्वसंध्येला कार्यक्रम : ढोलताशे, लेझीम, तलवारबाजीची प्रात्यक्षिके सादर

डोंबिवली : नववर्ष स्वागतयात्रेच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी शहरात विविध ठिकाणी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. ढोलताशांचे वादन, विद्यार्थ्यांचे लेझीम, नृत्य आणि तलवारबाजीने डोळ्यांचे पारणे फेडले. विशेष म्हणजे, भागशाळा मैदानात सादर झालेल्या ‘काश्मिरी रंगा’मुळे पूर्वसंध्या आणखीनच रंगीत ठरली.

काश्मीरहून आलेल्या २३ मुलांनी काश्मीरमधील लोकगीतावर नृत्य सादर केले. त्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. काश्मीरच्या लेह-लडाख खोऱ्यातील गावांतून ही मुले खास गुढीपाडव्यानिमित्त डोंबिवलीत आली आहेत. ‘हम’ या संस्थेचे अध्यक्ष सुनील देशपांडे यांनी या मुलांना डोंबिवलीत आणले आहे. तसेच त्यांना मुंबईदर्शन घडवण्यात येणार आहे. काश्मिरी मुलगी रुची शर्मा हिने सांगितले की, मला हे सगळे नवीन आहे. नववर्ष स्वागतयात्रा मला पाहायची आहे. गुढी काय असते, हे जाणून घ्यायचे आहे. त्याविषयी प्रचंड उत्सुकता आहे. हिताका देवी हिने सांगितले की, देशाची संस्कृती अत्यंत महान आहे. नववर्ष स्वागतयात्रा व गुढीपाडव्याचा आम्ही उद्या एक भाग होणार आहोत.निवृत्त मेजर अच्युत देव यांनी आपल्या देशात शत्रूंचा शिरकाव होणार नाही, असे वातावरण तयार केले पाहिजे, असे आवाहन यावेळी केले.वरदविनायक झांज पथकाने चौगुला, बांबू डान्स आणि पलटा नृत्य प्रकार सादर केला. वक्रतुंड ढोलताशा पथकाने त्यांचे वादन सादर केले.पूर्वेतील राजाजी पथ येथे ढोलताशावादन करण्यात आले. स्वामी विवेकानंद शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर करून लेझीमचा ताल धरला.त्याचबरोबर पूर्वेतील चंद्रकांत पाटकर शाळेच्या पटांगणावर ढोलताशावादन झाले. यावेळी डोंबिवलीतील बालगायकांनी गाणी सादर केली. तर, पश्चिमेतील आनंदनगर येथेही ढोलताशावादन आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. त्यालाही नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.६० चित्ररथांचा सहभागगुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागतयात्रा काढण्याची परंपरा सर्वात पहिल्यांदा डोंबिवलीत सुरू झाली. शनिवारी निघणाऱ्या या यात्रेत ६० चित्ररथ, १५० सायकलस्वार सहभागी होणार आहे. त्याचबरोबर दोन लाख नागरिक सहभागी होतील, असा अंदाज श्री गणेश मंदिर संस्था आणि नववर्ष स्वागतयात्रा संयोजन समितीतर्फ वर्तवण्यात आला.

‘दक्ष सैनिक, नागरिक’ रांगोळी सर्वांचे आकर्षणडोंबिवली :‘दक्ष सैनिक देशाचा, दक्ष नागरिक शहराचा’... असा संदेश देत श्री गणेश मंदिर संस्थान, नववर्ष स्वागतयात्रा संयोजन समिती आणि संस्कार भारतीने भव्य महारांगोळी साकारली आहे. ही रांगोळी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.गुढीपाडव्याच्या नववर्ष स्वागतयात्रेच्या निमित्ताने संस्कार भारती १५ वर्षांपासून शहरात रांगोळी काढत आहे. संस्था रांगोळीच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांना हात घालत जनजागृती करत आहे. यंदाची रांगोळी ४५ बाय १२ फुटांची आहे. त्यासाठी १५० किलो रंग आणि ८० किलो रांगोळी लागली आहे. ही रांगोळी काढण्यासाठी ३५ ते ४० कलाकारांना आठ तास लागले.देशाचा सैनिक हा सीमेवर आपले कर्तव्य चोख बजावत आहे. आपण नागरिक म्हणून आपली जबाबदारी योग्यरीत्या बजावण्याची गरज आहे, या संकल्पनेवर ही रांगोळी साकारली आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर जपून करावा, भ्रष्टाचार टाळावा, स्वच्छतेतून परिवर्तन घडवून आणले पाहिजे. माध्यमांचा वापर योग्यरीतीने केला पाहिजे, नियमांचे पालन केले पाहिजे, या गोष्टींची जनजागृती रांगोळीतून केली आहे. रांगोळीत भारतीय सैन्यदल, सैनिक, ध्वज, भारताची प्रतिमा दाखवण्यात आली आहे. त्याचबरोबर शनिवारी स्वागतयात्रेच्या दिवशी फडके रोड आणि डोंबिवली पश्चिमेतील चौकाचौकांत रांगोळी साकारण्यात येणार आहे, अशी माहिती संस्कार भारतीचे उमेश पांचाळ यांनी दिली. 

टॅग्स :rangoliरांगोळीdombivaliडोंबिवली