शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

सरंक्षक कठडे तुटल्याने कसारा घाट धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कसारा : येथील घाटात निकृष्ट बांधकामामुळे अनेक ठिकाणी संरक्षक कठडे तुटून पडले आहेत, तर काही कठडे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कसारा : येथील घाटात निकृष्ट बांधकामामुळे अनेक ठिकाणी संरक्षक कठडे

तुटून पडले आहेत, तर काही कठडे दुचाकी, कार, ट्रकच्या धक्क्याने तुटले आहेत. दुरुस्तीच्या नावाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व त्यांनी नेमलेली ठेकेदार कंपनी अनेकदा दुरुस्तीच्या नावाखाली थातुरमातुर काम करून बिल काढण्याचे काम करत आहे. जुन्या कसारा घाटातून प्रवास करताना नागमोडी वळणाचा व कमकुवत संरक्षण कठड्याचा अंदाज नसल्याने आजपर्यंत अनेक अपघात झाले आहेत.

दोन वर्षांत संरक्षक कठडे तोडून ५ ते ७ वाहनांचा ४०० फूट खोल दरीत पडून अपघात झाला आहे.

३ जूनला जुन्या कसारा घाटात ऑईल घेऊन जाणारा ट्रक संरक्षक कठडे तोडून दरीत कोसळून एक गंभीर जखमी झाला, तर चालक ट्रकखाली दबल्याने त्याचा मृत्यू झाला. तुटलेले कठडे अपघातास कारणीभूत ठरणारे असून, नागमोडी वळणावर असलेल्या, तुटलेल्या कठड्यांमुळे रात्रीच्यावेळी अपघात होऊन वाहने दरीत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या तुटलेल्या कठड्याभोवती प्रशासनाने प्लास्टिक बॅरिकेट्स लावले असून, ते रात्री अंधारात व दाट धुक्यात वाहनचालकांना दिसत नाहीत.

सुरक्षेच्या कारणास्तव वर्षभर पाठपुरावा

राष्ट्रीय महामार्ग असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावरील कसारा घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या, प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव महामार्गावरील धोकादायक समस्यांबाबत महामार्ग पोलीस, घोटी केंद्र व कसारा पोलिसांनी संबंधित प्रशासनाकडे अनेकदा लेखी तक्रारी करून त्यावर उपाययोजना करण्याची विनंती केली. परंतु टोल कंपनी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व्यवस्थापनाकडून पोलिसांच्या पत्राला केराची टोपली दाखवली गेली आहे.

घाटातील धोकादायक ठिकाणे

जुन्या कसारा घाटातील साईबाबा खिंड, आबापॉईंट, हिवाळा ब्रिज वळण व त्यापुढील दोन किलोमीटरचा रस्ता तसेच नवीन घाटातील बिबलवाडी वळण, ब्रेक फेल पॉईंट, धबधबा पॉईंट, लतीफवाडी उतार, ओहळाची वाडी ही ठिकाणे धोकादायक आहेत. या धोक्याच्या ठिकाणी ब्लिंकर लाईट, तुटलेल्या कठड्याजवळ तात्पुरते रेडियम बॅरिकेट्स लावल्यास वाहनचालकांना सोयीचे ठरू शकेल.