शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

सरंक्षक कठडे तुटल्याने कसारा घाट धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कसारा : येथील घाटात निकृष्ट बांधकामामुळे अनेक ठिकाणी संरक्षक कठडे तुटून पडले आहेत, तर काही कठडे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कसारा : येथील घाटात निकृष्ट बांधकामामुळे अनेक ठिकाणी संरक्षक कठडे

तुटून पडले आहेत, तर काही कठडे दुचाकी, कार, ट्रकच्या धक्क्याने तुटले आहेत. दुरुस्तीच्या नावाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व त्यांनी नेमलेली ठेकेदार कंपनी अनेकदा दुरुस्तीच्या नावाखाली थातुरमातुर काम करून बिल काढण्याचे काम करत आहे. जुन्या कसारा घाटातून प्रवास करताना नागमोडी वळणाचा व कमकुवत संरक्षण कठड्याचा अंदाज नसल्याने आजपर्यंत अनेक अपघात झाले आहेत.

दोन वर्षांत संरक्षक कठडे तोडून ५ ते ७ वाहनांचा ४०० फूट खोल दरीत पडून अपघात झाला आहे.

३ जूनला जुन्या कसारा घाटात ऑईल घेऊन जाणारा ट्रक संरक्षक कठडे तोडून दरीत कोसळून एक गंभीर जखमी झाला, तर चालक ट्रकखाली दबल्याने त्याचा मृत्यू झाला. तुटलेले कठडे अपघातास कारणीभूत ठरणारे असून, नागमोडी वळणावर असलेल्या, तुटलेल्या कठड्यांमुळे रात्रीच्यावेळी अपघात होऊन वाहने दरीत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या तुटलेल्या कठड्याभोवती प्रशासनाने प्लास्टिक बॅरिकेट्स लावले असून, ते रात्री अंधारात व दाट धुक्यात वाहनचालकांना दिसत नाहीत.

सुरक्षेच्या कारणास्तव वर्षभर पाठपुरावा

राष्ट्रीय महामार्ग असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावरील कसारा घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या, प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव महामार्गावरील धोकादायक समस्यांबाबत महामार्ग पोलीस, घोटी केंद्र व कसारा पोलिसांनी संबंधित प्रशासनाकडे अनेकदा लेखी तक्रारी करून त्यावर उपाययोजना करण्याची विनंती केली. परंतु टोल कंपनी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व्यवस्थापनाकडून पोलिसांच्या पत्राला केराची टोपली दाखवली गेली आहे.

घाटातील धोकादायक ठिकाणे

जुन्या कसारा घाटातील साईबाबा खिंड, आबापॉईंट, हिवाळा ब्रिज वळण व त्यापुढील दोन किलोमीटरचा रस्ता तसेच नवीन घाटातील बिबलवाडी वळण, ब्रेक फेल पॉईंट, धबधबा पॉईंट, लतीफवाडी उतार, ओहळाची वाडी ही ठिकाणे धोकादायक आहेत. या धोक्याच्या ठिकाणी ब्लिंकर लाईट, तुटलेल्या कठड्याजवळ तात्पुरते रेडियम बॅरिकेट्स लावल्यास वाहनचालकांना सोयीचे ठरू शकेल.