शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

करमुसे मारहाण प्रकरण: सरकार बदलताच जितेंद्र आव्हाड यांना मानवी हक्क आयोगाची नोटीस

By जितेंद्र कालेकर | Updated: August 11, 2022 21:34 IST

Jitendra Awad: माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अनंत करमुसे मारहाणी प्रकरणी मानवी हक्क आयोगाने नोटीस बजावली आहे. या नोटिशीनुसार येत्या ९ सप्टेंबरपर्यंत आव्हाड यांना त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे.

- जितेंद्र कालेकर ठाणे - माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अनंत करमुसे मारहाणी प्रकरणी मानवी हक्क आयोगाने नोटीस बजावली आहे. या नोटिशीनुसार येत्या ९ सप्टेंबरपर्यंत आव्हाड यांना त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे.

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या करमुसे या स्थापत्य अभियंत्यास मारहाण केल्याप्रकरणी आव्हाड यांना ऑक्टोबर २०२१ मध्ये ठाण्याच्या वर्तकनगर पोलिसांनी अटक केली होती. अटकेबाबत पोलिसांनी गोपनीयता बाळगली होती. मात्र, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट करून ही घटना उघडकीस आणली. त्यांची या प्रकरणामध्ये दहा हजारांच्या जामिनावर सुटका केली होती. करमुसे यांना वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आव्हाड यांच्या बंगल्यावर नेले. आपणास १० ते १५ जणांनी लाठीने बेदम मारहाण केल्याचा आरोप करमुसे यांनी केला होता. हा प्रकार आव्हाडांच्या उपस्थितीत घडल्याचा आरोप करमुसे यांनी केला होता. याप्रकरणी मुंबई सुरक्षा दलातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह १० ते १२ आरोपींना अटक झाली होती. आता याच मारहाण प्रकरणात राज्य मानवी हक्क आयोगाने आव्हाड यांच्यासह मारहाण केल्याचा आरोप असलेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना अलीकडेच नोटीस बजावली. कलम १६ नुसार आपले म्हणणे मांडण्याची संधी आयोगाने दिली असून ९ सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्यास बजावले आहे. या संदर्भात आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणे