शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
3
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
4
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
5
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
6
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
7
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
8
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
9
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
10
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
11
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
12
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
13
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
14
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
15
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
16
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
17
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
18
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
19
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
20
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला

कापूरबावडी उड्डाणपूल सोमवारी खुला

By admin | Updated: August 16, 2015 02:10 IST

मुंबईकडे जाणारी कापूरबावडी उड्डाणपुलाची ८०० मीटरची लेन अखेर सोमवारी खुली होणार आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारी कोंडी फुटणार असून थोडासा वळसा घालून का होईना परंतु

ठाणे : मुंबईकडे जाणारी कापूरबावडी उड्डाणपुलाची ८०० मीटरची लेन अखेर सोमवारी खुली होणार आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारी कोंडी फुटणार असून थोडासा वळसा घालून का होईना परंतु वाहतूककोंडीमुक्त प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे आता ७० टक्के वाहतूक ही या लेनवरून केली जाणार असल्यामुळे कापूरबावडी आणि माजिवडा जंक्शन वाहतूककोंडीमुक्त होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या लेनचा शुभारंभ सोमवारी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. दरम्यान, येथील चार लेन यापूर्वीच खुल्या करण्यात आल्या आहेत. पण मुंबईकडे जाणारी लेन मात्र सुमारे सात वर्षे रखडली होती. या लेनचे काम पूर्ण झाल्यानंतर केवळ मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, म्हणून याचा शुभारंभ रखडला असल्याचा गवगवा करण्यात आला होता. परंतु, वाहनचालकांना होणारा विलंब आणि कोंडी लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन करून ही लेन खुली करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर, काही किरकोळ कामे शिल्लक असल्याची माहिती एमएसआरडीसीने दिली. मधल्या कालावधीत या पुलाला तडे गेल्याचा मुद्दा पुढे आला. त्यामुळे पुन्हा एकदा त्याचा शुभारंभ लांबणीवर पडला. यासंदर्भात अधिक चौकशीसाठी पालकमंत्र्यांनी एकसदस्यीय समितीही नेमली होती. त्यानंतर अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ही लेन खुली करण्याचा दावा केला होता. परंतु, त्यानंतर दोन वेळा या लेनची लोड टेस्ट घेण्यात आली. त्यानंतरही केवळ समितीचा अहवाल न आल्याने ही लेन खुली करता येत नसल्याची माहिती एमएसआरडीसीने दिली. परंतु, आता तिचे १०० टक्के काम पूर्ण झाले असून सगळ्या अडथळ्यांच्या शर्यती पार करून ती सोमवारी वाहतुकीसाठी खुली केली जाणार आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना आता घोडबंदर, बाळकुम येथून येणाऱ्या वाहनांना थेट मुंबईकडे जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सध्या येथील मार्गावरून २५ ते ३० हजार वाहने रोज मुंबईच्या दिशेने जात आहेत. परंतु, ही लेन खुली न झाल्याने त्याचा ताण कापूरबावडी आणि माजिवडा जंक्शनवर पडत होता. मात्र, आता ही लेन खुली होत असल्याने ७० टक्के वाहने तिचा वापर करणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी तर सुटलेच तसेच मुंबईतही लवकर पोहोचता येणार आहे. (प्रतिनिधी)