शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

केडीएमसीत वाहते ‘भ्रष्टाचारा’ची गंगोत्री!, तकलादू कायद्यांमुळे अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 03:57 IST

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका विकासकामांऐवजी भ्रष्ट कर्मचारी आणि अधिका-यांच्या उपदव्यापामुळे चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे.

प्रशांत माने कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका विकासकामांऐवजी भ्रष्ट कर्मचारी आणि अधिका-यांच्या उपदव्यापामुळे चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे. आधीच २० हून अधिक लाचखोर अधिकारी कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ््यात अडकले असताना आणखी दोघांना सोमवारी जेरबंद करण्यात आले. मागील सहा महिन्यांत विविध लाच प्रकरणांमध्ये चार जण अडकल्याने केडीएमसी एकप्रकारे ‘भ्रष्टाचारा’ची गंगोत्री असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.क्षुल्लक कारणांसाठी कर्मचाºयांची लाच मागण्याची प्रवृत्ती काही केल्या कमी होत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी असे २३ जण लाचखोरीच्या प्रकरणात अडकले आहेत. त्यानंतरही कर्मचाºयांची खाबुगिरी कमी झालेली नाही. स्वाती गरूड या महिला अधिकाºयाला जुलैमध्ये झालेल्या अटकेमुळे या प्रकरणात महिलाही मागे नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्याला काही महिने उलटत नाही तोच महापालिकेच्या ‘अ’ प्रभागातील कर विभागातील लिपिक श्रीधर रोकडे याला लाचखोरीच्या प्रकरणात नुकतीच अटक झाली. त्याच पुन्हा प्रभागातीलच आरोग्य निरीक्षक सदाशिव ठाकरे व कामगार विजय गायकवाड याला लाच प्रकरणात बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. यात अन्य आरोग्य निरीक्षक संजय धात्रक याचाही समावेश आहे. नालेसफाईच्या कंत्राटाची बिले देताना दोघा निरीक्षकांनी कंत्राटदाराकडे ६० हजारांची लाच मागितली. परंतु, तडजोडीअंती ४० हजार ठरले. त्यौपकी दोघांनी प्रत्येकी २० हजारांची मागणी केली होती. ही रक्कम घेताना ठाकरे याला अटक झाली. या प्रकारामुळे केडीएमसीतील कंत्राटदारांना वेठीस धरले जात असल्याचे सिद्ध झाले.मागील सहा महिन्यांत तिघेजण अडकल्याने पुन्हा पालिकेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. अधिकारी आणि कर्मचारी लाचखोरीच्या जाळ््यात अडकल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर याआधी घडल्या आहेत. दोन नगरसेवकही यात अटक झाले आहेत. लाचखोरांना कडक शिक्षा करण्याऐवजी त्यांना पाठिशी घालण्याचे काम लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या संगनमताने होत असल्याची उदाहरणे याआधीही दिसली आहेत. या अभय देण्याच्या प्रवृत्तीमुळेच लाचखोरीच्या प्रकरणातील बहुतांश अधिकारी आणि कर्मचारी सेवेत कार्यकारी पदावर कार्यरत आहेत. याला लाचखोरीसंदर्भातील कायदेही एकप्रकारे तकलादू ठरत असल्याने अशा अधिकाºयांचे चांगलेच फावते. सेवेतील त्यांचा प्रवेश पुन्हा सुकर होत असल्याने ‘जाऊ तिथे खाऊ’ ही प्रवृत्ती कायम राहत आहे. वारंवार बदलणारे सरकारी निर्णय हे लाचखोरांच्या हिताचे असले तरी जिथे भ्रष्टाचाराला वाव आहे, अशा कार्यकारी पदांपासून लाचखोरांना दूर ठेवण्याच्या राज्य सरकारच्या २०११ च्या निर्देशाकडेही हेतुपुरस्सर कानाडोळा केला गेल्याचे केडीएमसीत पहावयास मिळत आहे.>अबतक पच्चीससोमवारची घटना पाहता आतापर्यंत महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी असे एकूण २५ जण लाचखोरीच्या जाळ््यात अडकले गेले आहे. यात सुरेश पवार, सुनील जोशी, गणेश बोराडे, सुहास गुप्ते, दत्तात्रय मस्तुद, स्वाती गरूड या बड्या अधिकारी व कर्मचाºयांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाचेच्या प्रकरणात अडकले गेल्यानंतरही लाचसत्र सुरूच आहे.न्यायालयातआज हजर करणारलाचखोर आरोग्य निरीक्षक सदाशिव ठाकरे आणि कामगार विजय गायकवाड या दोघांना मंगळवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक रमेश चव्हाण यांनी दिली. दोघांवर खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अन्य एक आरोपी आरोग्य निरिक्षक संजय धात्रक यालाही लवकरच अटक करू, असे चव्हाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका