शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

नैसर्गिक संकटात कांदळवन ठरते ‘जैविक भिंत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:46 IST

मीरारोड : कांदळवन होते तेथे नुकत्याच झालेल्या चक्रीवादळात अत्यंत कमी नुकसान झाले आहे. कांदळवने ही चक्रीवादळ आणि सुनामी यांसारख्या ...

मीरारोड : कांदळवन होते तेथे नुकत्याच झालेल्या चक्रीवादळात अत्यंत कमी नुकसान झाले आहे. कांदळवने ही चक्रीवादळ आणि सुनामी यांसारख्या नैसर्गिक संकटांमध्ये मानवासाठी ‘जैविक भिंत’ म्हणून काम करतात. समुद्रातील मासे अन्न, निवारा आणि प्रजननांसाठी कांदळवनात येतात. त्यामुळे मत्स्यव्यवसायाच्या दृष्टीनेही कांदळवने महत्त्वाची आहेत, असे मत मीरा राेड येथे झालेल्या कांदळवन कार्यशाळेत मान्यवरांनी व्यक्त केले.

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या कांदळवन संरक्षण संवर्धनाबाबतच्या आदेशांचे काटेकोर पालन होऊन दाखल गुन्ह्यांचा तपास व आरोपींना शिक्षा व्हावी, शासकीय विभागांचा समन्वय असावा, कांदळवनचे महत्त्व व कायदेशीर बाबी जाणून घेण्याच्या अनुषंगाने मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कांदळवन संरक्षणासाठी ही राज्यातील पहिलीच कार्यशाळा मीरारोड येथील पोलीस आयुक्तालयातील संवाद सभागृहात पार पडली. पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले.

कार्यशाळेची गरज व भविष्यात काम करताना सर्व शासकीय विभागाशी असणारा आवश्यक समन्वय याबाबत कार्यशाळेत विवेचन करण्यात आले. यावेळी आयुक्त दाते यांच्यासह अपर पोलीस आयुक्त एस. जयकुमार, कांदळवनचे विभागीय वन अधिकारी आदर्श रेड्डी, कांदळवन प्रतिष्ठानच्या प्रकल्प उपसंचालक शीतल पाचपांडे, वनशक्तीचे संचालक स्टॅलिन दयानंद, सेवानिवृत्त वनअधिकारी राजेंद्र धोंगडे व ॲड. धीरज मिरजकर यांनी कांदळवनचे महत्त्व तसेच कायदेशीर बाबींवर मार्गदर्शन केले. कांदळवन कक्षाचे आंजनेयुलू यांनी कांदळवन मॅपिंग कसे केले जाते याबाबत माहिती दिली. यावेळी सर्व पोलीस उपायुक्त, पोलीस अधिकारी, कांदळवन कक्ष, महापालिका व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कांदळवनाबाबत संविधानातील संरक्षण, सर्वोच्च व मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, विविध कायदे-नियम आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कांदळवनाचे संरक्षण ही घटनात्मक जबाबदारी

वातावरणातील कार्बन डायऑक्साइड मोठ्या प्रमाणावर शोषून घेणे, जागतिक तापमानवाढ नियंत्रित करण्यास मदत करणे, समुद्र किनाऱ्याची धूप थांबविणे, जलप्रदूषण कमी करून घातक रसायने शोषून खाडी क्षेत्रास संरक्षण देणे, पाण्याची क्षारता शोषून घेणे आदी अनेक दृष्टीने कांदळवन महत्त्वपूर्ण आहेत. कांदळवनवर विविध मासे, पक्षी, प्राणी अवलंबून असल्याने त्याचे संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची घटनात्मक जबाबदारी असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.