शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

नैसर्गिक संकटात कांदळवन ठरते ‘जैविक भिंत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:46 IST

मीरारोड : कांदळवन होते तेथे नुकत्याच झालेल्या चक्रीवादळात अत्यंत कमी नुकसान झाले आहे. कांदळवने ही चक्रीवादळ आणि सुनामी यांसारख्या ...

मीरारोड : कांदळवन होते तेथे नुकत्याच झालेल्या चक्रीवादळात अत्यंत कमी नुकसान झाले आहे. कांदळवने ही चक्रीवादळ आणि सुनामी यांसारख्या नैसर्गिक संकटांमध्ये मानवासाठी ‘जैविक भिंत’ म्हणून काम करतात. समुद्रातील मासे अन्न, निवारा आणि प्रजननांसाठी कांदळवनात येतात. त्यामुळे मत्स्यव्यवसायाच्या दृष्टीनेही कांदळवने महत्त्वाची आहेत, असे मत मीरा राेड येथे झालेल्या कांदळवन कार्यशाळेत मान्यवरांनी व्यक्त केले.

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या कांदळवन संरक्षण संवर्धनाबाबतच्या आदेशांचे काटेकोर पालन होऊन दाखल गुन्ह्यांचा तपास व आरोपींना शिक्षा व्हावी, शासकीय विभागांचा समन्वय असावा, कांदळवनचे महत्त्व व कायदेशीर बाबी जाणून घेण्याच्या अनुषंगाने मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कांदळवन संरक्षणासाठी ही राज्यातील पहिलीच कार्यशाळा मीरारोड येथील पोलीस आयुक्तालयातील संवाद सभागृहात पार पडली. पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले.

कार्यशाळेची गरज व भविष्यात काम करताना सर्व शासकीय विभागाशी असणारा आवश्यक समन्वय याबाबत कार्यशाळेत विवेचन करण्यात आले. यावेळी आयुक्त दाते यांच्यासह अपर पोलीस आयुक्त एस. जयकुमार, कांदळवनचे विभागीय वन अधिकारी आदर्श रेड्डी, कांदळवन प्रतिष्ठानच्या प्रकल्प उपसंचालक शीतल पाचपांडे, वनशक्तीचे संचालक स्टॅलिन दयानंद, सेवानिवृत्त वनअधिकारी राजेंद्र धोंगडे व ॲड. धीरज मिरजकर यांनी कांदळवनचे महत्त्व तसेच कायदेशीर बाबींवर मार्गदर्शन केले. कांदळवन कक्षाचे आंजनेयुलू यांनी कांदळवन मॅपिंग कसे केले जाते याबाबत माहिती दिली. यावेळी सर्व पोलीस उपायुक्त, पोलीस अधिकारी, कांदळवन कक्ष, महापालिका व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कांदळवनाबाबत संविधानातील संरक्षण, सर्वोच्च व मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, विविध कायदे-नियम आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कांदळवनाचे संरक्षण ही घटनात्मक जबाबदारी

वातावरणातील कार्बन डायऑक्साइड मोठ्या प्रमाणावर शोषून घेणे, जागतिक तापमानवाढ नियंत्रित करण्यास मदत करणे, समुद्र किनाऱ्याची धूप थांबविणे, जलप्रदूषण कमी करून घातक रसायने शोषून खाडी क्षेत्रास संरक्षण देणे, पाण्याची क्षारता शोषून घेणे आदी अनेक दृष्टीने कांदळवन महत्त्वपूर्ण आहेत. कांदळवनवर विविध मासे, पक्षी, प्राणी अवलंबून असल्याने त्याचे संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची घटनात्मक जबाबदारी असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.