शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कांदळवने होणार आता बफर झोन, भूमाफियांना बसणार वेसण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 04:48 IST

मुंबईसह ठाणे जिल्ह्याला सर्वाधिक लाभ : भूमाफियांना बसणार वेसण

नारायण जधव

ठाणे : मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदर आणि वसई-विरार भागांत खारफुटी अर्थात कांदळवनांवर होणारे अतिक्रमण आणि त्यांची कत्तल रोखण्याबाबत महापालिकांना येणाऱ्या अपयशाबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर जाग आलेल्या नगरविकास विभागाने महापालिकांसह नियोजन प्राधिकरणांनी आपल्या विकास आराखड्यात कांदळवनांची जागा बफर झोन म्हणून दर्शवावी, असे निर्देश दिले आहेत. या आदेशाचा लाभ ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर येथील कांदळवनांना होऊन त्यावर भराव टाकून उत्तुंग इमारती बांधणाºया भूमाफियांसह रेतीमाफियांना वेसण बसणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिका ८७/६ नुसार राज्य सरकारची कानउघाडणी करताना स्थानिक स्वराज्य संस्थांनी कांदळवनांची जागा नगररचना कायदा १९६६ च्या कलम ५४ नुसार बफर दर्शवण्यास सांगावे, असे निर्देश दिले होते. त्यानुसार, जाग आलेल्या नगरविकास विभागाने १३ जून रोजी खास अध्यादेश काढून राज्यातील कांदळवने आणि त्यापासूनच्या ५० मीटर क्षेत्राचा परिसर बफर झोन म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था, विकास प्राधिकरणे आणि नियोजन मंडळांनी आपल्या विकास आराखड्यांमध्ये दर्शवावा, असे बजावले आहे.भारतीय वनस्थिती अहवाल २०१५ नुसार राज्याचे कांदळवन क्षेत्र २२२ चौ.कि.मी. होते. ते २०१७ मध्ये वाढून ३०४ चौ.कि.मी. इतके झाले आहे. यामध्ये ८२ चौ.कि.मी.ची भरघोस वाढ नोंदवण्यात आली आहे. ती प्रामुख्याने रायगड, मुंबई उपनगरे आणि ठाणे जिल्ह्यात आहे. महाराष्ट्राला ७२० किमी लांबीचा भव्य समुद्रकिनारा लाभला आहे. या विस्तृत किनाºयाला अनेक प्रकारच्या पर्यावरणीय व्यवस्था (इको सिस्टीम) वास्तव्याला आहेत. जसे कांदळवने, कोरल्स, खडकाळ क्षेत्र, वाळूचे किनारे, दलदल. इ. किनारी आणि सागरी वातावरण फक्त विविध प्रकारची जैवविविधताच सांभाळत नाही, तर अनेक प्रकारच्या पर्यावरणीय व्यवस्थासुद्धा सांभाळते. ज्यावर समुद्रकिनारी राहणाºया अनेक लोकांची उपजीविका अवलंबून आहे. त्यामुळे किनारी आणि सागरी पर्यावरण सांभाळणे, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कांदळवनांचे महत्त्व ओळखून महाराष्ट्र शासनाने २०१२ मध्ये सर्व शासकीय कांदळवन जमिनींना राखीव वनांचा दर्जा देऊन स्वतंत्र कांदळवन कक्षाची निर्मिती केली होती.राज्यात ३० हजार हेक्टर कांदळवनेमहाराष्ट्रात मुंबई शहर, मुंबई उपनगरे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्यांत मिळून ३०४ चौ.कि.मी.ची कांदळवने (कव्हर) आहेत. परंतु, कांदळवनांचे एकूण क्षेत्र (लॅण्ड) ३० हजार हेक्टरच्या आसपास आहे. आतापर्यंत १५ हजार ८८ हेक्टर शासकीय जमिनीवर तसेच १७७५ हेक्टर खाजगी क्षेत्रावरील कांदळवनांना ‘राखीव वने’ व वने म्हणून दर्जा देण्यात आला आहे.स्थानिक संस्थांकडून होतेय कांदळवनांवर अतिक्रमणच्कोकणातील मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदर आणि वसई-विरार, पनवेल यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आपल्या विविध विकास प्रकल्पांसाठी कांदळवनांवर सतत अतिक्रमण होत होते.

टॅग्स :thaneठाणेforestजंगल