शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
3
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
4
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
5
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
6
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
7
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
8
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
9
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
10
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
11
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
12
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
14
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
15
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
16
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
17
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
18
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
19
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
20
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू

कांदळवने होणार आता बफर झोन, भूमाफियांना बसणार वेसण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 04:48 IST

मुंबईसह ठाणे जिल्ह्याला सर्वाधिक लाभ : भूमाफियांना बसणार वेसण

नारायण जधव

ठाणे : मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदर आणि वसई-विरार भागांत खारफुटी अर्थात कांदळवनांवर होणारे अतिक्रमण आणि त्यांची कत्तल रोखण्याबाबत महापालिकांना येणाऱ्या अपयशाबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर जाग आलेल्या नगरविकास विभागाने महापालिकांसह नियोजन प्राधिकरणांनी आपल्या विकास आराखड्यात कांदळवनांची जागा बफर झोन म्हणून दर्शवावी, असे निर्देश दिले आहेत. या आदेशाचा लाभ ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर येथील कांदळवनांना होऊन त्यावर भराव टाकून उत्तुंग इमारती बांधणाºया भूमाफियांसह रेतीमाफियांना वेसण बसणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिका ८७/६ नुसार राज्य सरकारची कानउघाडणी करताना स्थानिक स्वराज्य संस्थांनी कांदळवनांची जागा नगररचना कायदा १९६६ च्या कलम ५४ नुसार बफर दर्शवण्यास सांगावे, असे निर्देश दिले होते. त्यानुसार, जाग आलेल्या नगरविकास विभागाने १३ जून रोजी खास अध्यादेश काढून राज्यातील कांदळवने आणि त्यापासूनच्या ५० मीटर क्षेत्राचा परिसर बफर झोन म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था, विकास प्राधिकरणे आणि नियोजन मंडळांनी आपल्या विकास आराखड्यांमध्ये दर्शवावा, असे बजावले आहे.भारतीय वनस्थिती अहवाल २०१५ नुसार राज्याचे कांदळवन क्षेत्र २२२ चौ.कि.मी. होते. ते २०१७ मध्ये वाढून ३०४ चौ.कि.मी. इतके झाले आहे. यामध्ये ८२ चौ.कि.मी.ची भरघोस वाढ नोंदवण्यात आली आहे. ती प्रामुख्याने रायगड, मुंबई उपनगरे आणि ठाणे जिल्ह्यात आहे. महाराष्ट्राला ७२० किमी लांबीचा भव्य समुद्रकिनारा लाभला आहे. या विस्तृत किनाºयाला अनेक प्रकारच्या पर्यावरणीय व्यवस्था (इको सिस्टीम) वास्तव्याला आहेत. जसे कांदळवने, कोरल्स, खडकाळ क्षेत्र, वाळूचे किनारे, दलदल. इ. किनारी आणि सागरी वातावरण फक्त विविध प्रकारची जैवविविधताच सांभाळत नाही, तर अनेक प्रकारच्या पर्यावरणीय व्यवस्थासुद्धा सांभाळते. ज्यावर समुद्रकिनारी राहणाºया अनेक लोकांची उपजीविका अवलंबून आहे. त्यामुळे किनारी आणि सागरी पर्यावरण सांभाळणे, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कांदळवनांचे महत्त्व ओळखून महाराष्ट्र शासनाने २०१२ मध्ये सर्व शासकीय कांदळवन जमिनींना राखीव वनांचा दर्जा देऊन स्वतंत्र कांदळवन कक्षाची निर्मिती केली होती.राज्यात ३० हजार हेक्टर कांदळवनेमहाराष्ट्रात मुंबई शहर, मुंबई उपनगरे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्यांत मिळून ३०४ चौ.कि.मी.ची कांदळवने (कव्हर) आहेत. परंतु, कांदळवनांचे एकूण क्षेत्र (लॅण्ड) ३० हजार हेक्टरच्या आसपास आहे. आतापर्यंत १५ हजार ८८ हेक्टर शासकीय जमिनीवर तसेच १७७५ हेक्टर खाजगी क्षेत्रावरील कांदळवनांना ‘राखीव वने’ व वने म्हणून दर्जा देण्यात आला आहे.स्थानिक संस्थांकडून होतेय कांदळवनांवर अतिक्रमणच्कोकणातील मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदर आणि वसई-विरार, पनवेल यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आपल्या विविध विकास प्रकल्पांसाठी कांदळवनांवर सतत अतिक्रमण होत होते.

टॅग्स :thaneठाणेforestजंगल