शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

घातक रसायने नदीपात्रात सोडल्याने भिवंडीतील कामवारी व उल्हास नदी झाली प्रदूषित

By नितीन पंडित | Updated: August 30, 2022 16:57 IST

कामवारी नदी लगत महानगरपालिका क्षेत्रातील मलनिस्सारण प्रकल्पातील सांडपाणी देखील कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडले जाते.

भिवंडी: भिवंडी शहराच्या सीमेवरून वाहणाऱ्या कामवारी नदी पात्रात नजीकच्या शेलार ग्रामपंचायत हद्दीतील अनेक डाईंग कंपन्या केमिकलयुक्त सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडत असल्याने या नदीतील पाणी दूषित होऊन तेथील जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले असल्याची तक्रार जलनायक डॉ स्नेहल दोंदे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे.

कामवारी नदी लगत महानगरपालिका क्षेत्रातील मलनिस्सारण प्रकल्पातील सांडपाणी देखील कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडले जाते. याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जाणूनबुजून डोळेझाक करीत आहे असा आरोप डॉ दोंदे यांनी केला आहे.या पूर्वी नदीपात्रात पाणी एका नाल्यातून वाहत जात होते परंतु नदीनाका येथे पूल बनविण्याचे काम सुरू असताना त्यादरम्यान एक स्वतंत्र सामायिक नाला हे सांडपाणी वाहून नदीपात्रात सोडण्यासाठी बनविण्यात आले आहे.

गणेशोत्सव काळात या नदीपात्रात गणेशमूर्तींचे विसर्जन मोठ्या प्रमाणात होत असते.त्यामुळे नदीतील जलप्रदूषणामुळे त्याचे पावित्र्य राखले जाणार नाही त्यामुळे या नदीपात्रातील जलप्रदूषण रोखण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे .मध्यंतरी येथील जलप्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करून तेथील उत्पादन बंद करण्यात आले होते परंतु आता या कंपन्या बिनदिक्कत सुरू कशा राहतात असा सवाल उपस्थित होत आहे. 

दुसरीकडे भिवंडी तालुक्यात सरवली येथे एमआयडीसी असून येथून उल्हास नदीवाहत आहे.या उल्हास नदीत केमिकल,पेपर,कार्डबोर्ड,मिल्क व टेक्सटाईल उद्योग सर्रास पणे उल्हास नदी प्रदूषित करत असून प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबरच स्थानिक ग्रामपंचायतींचे देखील दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.  

टॅग्स :thaneठाणे