शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

घातक रसायने नदीपात्रात सोडल्याने भिवंडीतील कामवारी व उल्हास नदी झाली प्रदूषित

By नितीन पंडित | Updated: August 30, 2022 16:57 IST

कामवारी नदी लगत महानगरपालिका क्षेत्रातील मलनिस्सारण प्रकल्पातील सांडपाणी देखील कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडले जाते.

भिवंडी: भिवंडी शहराच्या सीमेवरून वाहणाऱ्या कामवारी नदी पात्रात नजीकच्या शेलार ग्रामपंचायत हद्दीतील अनेक डाईंग कंपन्या केमिकलयुक्त सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडत असल्याने या नदीतील पाणी दूषित होऊन तेथील जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले असल्याची तक्रार जलनायक डॉ स्नेहल दोंदे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे.

कामवारी नदी लगत महानगरपालिका क्षेत्रातील मलनिस्सारण प्रकल्पातील सांडपाणी देखील कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडले जाते. याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जाणूनबुजून डोळेझाक करीत आहे असा आरोप डॉ दोंदे यांनी केला आहे.या पूर्वी नदीपात्रात पाणी एका नाल्यातून वाहत जात होते परंतु नदीनाका येथे पूल बनविण्याचे काम सुरू असताना त्यादरम्यान एक स्वतंत्र सामायिक नाला हे सांडपाणी वाहून नदीपात्रात सोडण्यासाठी बनविण्यात आले आहे.

गणेशोत्सव काळात या नदीपात्रात गणेशमूर्तींचे विसर्जन मोठ्या प्रमाणात होत असते.त्यामुळे नदीतील जलप्रदूषणामुळे त्याचे पावित्र्य राखले जाणार नाही त्यामुळे या नदीपात्रातील जलप्रदूषण रोखण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे .मध्यंतरी येथील जलप्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करून तेथील उत्पादन बंद करण्यात आले होते परंतु आता या कंपन्या बिनदिक्कत सुरू कशा राहतात असा सवाल उपस्थित होत आहे. 

दुसरीकडे भिवंडी तालुक्यात सरवली येथे एमआयडीसी असून येथून उल्हास नदीवाहत आहे.या उल्हास नदीत केमिकल,पेपर,कार्डबोर्ड,मिल्क व टेक्सटाईल उद्योग सर्रास पणे उल्हास नदी प्रदूषित करत असून प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबरच स्थानिक ग्रामपंचायतींचे देखील दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.  

टॅग्स :thaneठाणे