शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

घातक रसायने नदीपात्रात सोडल्याने भिवंडीतील कामवारी व उल्हास नदी झाली प्रदूषित

By नितीन पंडित | Updated: August 30, 2022 16:57 IST

कामवारी नदी लगत महानगरपालिका क्षेत्रातील मलनिस्सारण प्रकल्पातील सांडपाणी देखील कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडले जाते.

भिवंडी: भिवंडी शहराच्या सीमेवरून वाहणाऱ्या कामवारी नदी पात्रात नजीकच्या शेलार ग्रामपंचायत हद्दीतील अनेक डाईंग कंपन्या केमिकलयुक्त सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडत असल्याने या नदीतील पाणी दूषित होऊन तेथील जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले असल्याची तक्रार जलनायक डॉ स्नेहल दोंदे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे.

कामवारी नदी लगत महानगरपालिका क्षेत्रातील मलनिस्सारण प्रकल्पातील सांडपाणी देखील कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडले जाते. याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जाणूनबुजून डोळेझाक करीत आहे असा आरोप डॉ दोंदे यांनी केला आहे.या पूर्वी नदीपात्रात पाणी एका नाल्यातून वाहत जात होते परंतु नदीनाका येथे पूल बनविण्याचे काम सुरू असताना त्यादरम्यान एक स्वतंत्र सामायिक नाला हे सांडपाणी वाहून नदीपात्रात सोडण्यासाठी बनविण्यात आले आहे.

गणेशोत्सव काळात या नदीपात्रात गणेशमूर्तींचे विसर्जन मोठ्या प्रमाणात होत असते.त्यामुळे नदीतील जलप्रदूषणामुळे त्याचे पावित्र्य राखले जाणार नाही त्यामुळे या नदीपात्रातील जलप्रदूषण रोखण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे .मध्यंतरी येथील जलप्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करून तेथील उत्पादन बंद करण्यात आले होते परंतु आता या कंपन्या बिनदिक्कत सुरू कशा राहतात असा सवाल उपस्थित होत आहे. 

दुसरीकडे भिवंडी तालुक्यात सरवली येथे एमआयडीसी असून येथून उल्हास नदीवाहत आहे.या उल्हास नदीत केमिकल,पेपर,कार्डबोर्ड,मिल्क व टेक्सटाईल उद्योग सर्रास पणे उल्हास नदी प्रदूषित करत असून प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबरच स्थानिक ग्रामपंचायतींचे देखील दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.  

टॅग्स :thaneठाणे