शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कल्याण-उल्हासनगरात शिवथाळी, शिवभोजन केंद्रांची संख्या झाली १०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 00:23 IST

नागरिकांचा प्रतिसाद : शिवभोजन केंद्रांची संख्या झाली १०

पंकज रोडेकर

ठाणे : जिल्ह्यातील कल्याण आणि उल्हासनगर या दोन महापालिकांमधील नागरिकांनाही येत्या काही दिवसांत १० रुपयांमधील शिवथाळीचा आस्वाद चाखता येणार आहे. या दोन्ही महापालिकांतर्गत प्रत्येकी एक केंद्र सुरू करण्यासाठी संबंधित विभागाने हिरवा कंदील दाखवला आहे. या दोन महापालिकांसह नवी मुंबई महापालिकेतील एका केंद्राला मंजुरी मिळाल्याने जिल्ह्यातील केंद्रांची संख्याही दहावर पोहोचली आहे. तसेच नव्याने सुरू होणारी केंदे्र संगणकाला जोडल्यानंतर त्या केंद्रांवर येत्या २० फेब्रुवारीपासून थाळीवाटप कार्यक्रम सुरू होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

राज्यात शिवभोजन योजनेंतर्गत प्रजासत्ताकदिनी १० रुपयांमध्ये शिवथाळीचा आस्वाद चाखण्यास सुरुवात झाली. ही थाळी प्रायोगिक तत्त्वावर महापालिका कार्यक्षेत्रात चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यात एक हजार ३५० थाळ्यांपैकी ६७५ थाळ्यांसाठी कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर या महापालिका सोडल्या, तर ठाणे, भिवंडी, मीरा-भार्इंदर आणि नवी मुंबई या महापालिकांतर्गत एक ूण सात केंद्रे सुरू झाली. यामध्ये ठामपांतर्गत तीन, मीरा-भार्इंदर आणि नवी मुंबई येथे प्रत्येकी एक आणि भिवंडीत दोन असा केंद्रांचा समावेश आहे. या योजनेला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याने शिधावाटप विभागाने ठाणे जिल्ह्यातील काही केंद्रांवरील थाळ्यांची संख्या वाढवून दिली आहे.या केंद्रांनी अटी केल्या पूर्णउर्वरित ६७५ थाळ्या सुरू करण्यासाठी तितक्या केंद्रांची गरज असल्याची बाब डोळ्यांसमोर ठेवून शिधावाटप विभागाने शासनाच्या अटी आणि शर्तीनुसार केंद्र शोधण्यास सुरू केले होते. त्यानुसार, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली तसेच उल्हासनगर येथे प्रत्येकी एक कें द्र त्या अटीशर्ती पूर्ण करू शकले आहे. यामुळे संख्या १० वर गेली आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणshiv bhojnalayaशिवभोजनालय