शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
4
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
5
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
8
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
9
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
10
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
11
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
12
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
13
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
14
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
15
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
16
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
17
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
18
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
19
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
20
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?

कल्याण-ठाणे-वसई जलवाहतूक डिसेंबरपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:02 IST

ठाणे पालिकेच्या महत्त्वांकाक्षी जलवाहतूक प्रकल्पाच्या पहिल्या टप्यातील वसई - ठाणे - कल्याण या मार्गांवर डिसेंबरपर्यंत वाहतूक

ठाणे : ठाणे पालिकेच्या महत्त्वांकाक्षी जलवाहतूक प्रकल्पाच्या पहिल्या टप्यातील वसई - ठाणे - कल्याण या मार्गांवर डिसेंबरपर्यंत वाहतूक सुरु होईल, अशी माहिती आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी दिली. ज्या ठिकाणी पाण्याला खोली असेल त्या मार्गावर बोट धावणार असल्याचे सांगून खाजगीकरणातून म्हणजेच जीसीसी तत्त्वावर या बोटी धावतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.या प्रकल्पामुळे वेळ, पैशाची होईल. वाहतूककोंडीतून सुटका होईल, असा दावा त्यांनी केला. यावेळी महाराष्टÑ मेरीटाईम बोर्डचे सीईओ विक्रमकुमार, गोवा आणि कोच्ची शिप यार्डचे अधिकारी, इतर पालिकांचे अधिकारी उपस्थित होते. पहिल्या टप्यात वसई - मीरा-भाईंदर - ठाणे कोलशेत, घोडबंदर रोड, साकेत- दिवा-भिवंडी- कल्याण हा २५ नॉटिकल मैल म्हणजेच ४५ किमी लांबीचा ७० मिनिटांचा जलवाहतूक मार्गआहे. यासाठी ६५० कोटींचा निधी केंद्राकडून मिळणार आहे. कोलशेत येथे या जलवाहतुकीचे मल्टी मॉडेल हब विकसित केले जाईल. तेथे बोटी दुरुस्त केल्या जातील. पहिल्या टप्प्यासाठी पालिका ८ ते १० प्रवासी क्षममेच्या दोन ते तीन बोट घेणार आहे.पहिल्या टप्यातील डीपीआर तयार झाला असून त्याचे सादरीकरण दोन दिवसात दिल्लीत होणार असून त्यात त्याला तत्वत: मंजुरी मिळेल.मालवाहू जलवाहतूक, प्रवासी आणि पर्यटन अशा तीन स्तरावर जलवाहतूक सुरू होणार असल्याने पालिकेला चांगला महसूल मिळेल. त्यामुळे रस्ते आणि रेल्वेवरील भार कमी होईल. पर्यटनसाठीही जलवाहतुकीचा विकास करण्यात येणार आहे. रेल्वे स्टेशन आणि मुख्य महामार्गापासून जलवाहतूक किती अंतरावर असेल याचाही अभ्यास करण्यात आला आहे. वसईला रेल्वे स्टेशनपासूनचे अंतर हे ४ किमी आणि आणि रस्त्याचे अंतर ० किमी असणार आहे. तर कल्याण जेटीचे अंतर हे रेल्वे स्टेशपासून अवघे १.७१ किमी असणार असून रस्त्यापासून ते ५० मीटरवर असणार आहे. तर ठाण्यातील कोलशेतचे हबचे अंतर हे कळवा रेल्वे स्टेशनपासून ५ किमी आणि रस्त्यापासून ७० मीटर असेल.या जलवाहतुकीच्या दुसऱ्या टप्यात ठाणे, नवी मुंबई, मुंबई याचे काम करण्यात येणार आहे. या संदर्भातील सविस्तर प्रकल्प अहवाल ठाणे महापालिकेने केला आहे. पहिल्या टप्यासाठीचा संपूर्ण निधी हा केंद्राकडून मिळणार आहे. परंतु, दुसºया टप्यासाठीचा निर्णय अद्याप झालेला नाही. असे असले तरी ठाणे महापालिका या दुसºया टप्याचे काम करणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.