शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कल्याण-ठाणे-वसई जलवाहतूक डिसेंबरपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:02 IST

ठाणे पालिकेच्या महत्त्वांकाक्षी जलवाहतूक प्रकल्पाच्या पहिल्या टप्यातील वसई - ठाणे - कल्याण या मार्गांवर डिसेंबरपर्यंत वाहतूक

ठाणे : ठाणे पालिकेच्या महत्त्वांकाक्षी जलवाहतूक प्रकल्पाच्या पहिल्या टप्यातील वसई - ठाणे - कल्याण या मार्गांवर डिसेंबरपर्यंत वाहतूक सुरु होईल, अशी माहिती आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी दिली. ज्या ठिकाणी पाण्याला खोली असेल त्या मार्गावर बोट धावणार असल्याचे सांगून खाजगीकरणातून म्हणजेच जीसीसी तत्त्वावर या बोटी धावतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.या प्रकल्पामुळे वेळ, पैशाची होईल. वाहतूककोंडीतून सुटका होईल, असा दावा त्यांनी केला. यावेळी महाराष्टÑ मेरीटाईम बोर्डचे सीईओ विक्रमकुमार, गोवा आणि कोच्ची शिप यार्डचे अधिकारी, इतर पालिकांचे अधिकारी उपस्थित होते. पहिल्या टप्यात वसई - मीरा-भाईंदर - ठाणे कोलशेत, घोडबंदर रोड, साकेत- दिवा-भिवंडी- कल्याण हा २५ नॉटिकल मैल म्हणजेच ४५ किमी लांबीचा ७० मिनिटांचा जलवाहतूक मार्गआहे. यासाठी ६५० कोटींचा निधी केंद्राकडून मिळणार आहे. कोलशेत येथे या जलवाहतुकीचे मल्टी मॉडेल हब विकसित केले जाईल. तेथे बोटी दुरुस्त केल्या जातील. पहिल्या टप्प्यासाठी पालिका ८ ते १० प्रवासी क्षममेच्या दोन ते तीन बोट घेणार आहे.पहिल्या टप्यातील डीपीआर तयार झाला असून त्याचे सादरीकरण दोन दिवसात दिल्लीत होणार असून त्यात त्याला तत्वत: मंजुरी मिळेल.मालवाहू जलवाहतूक, प्रवासी आणि पर्यटन अशा तीन स्तरावर जलवाहतूक सुरू होणार असल्याने पालिकेला चांगला महसूल मिळेल. त्यामुळे रस्ते आणि रेल्वेवरील भार कमी होईल. पर्यटनसाठीही जलवाहतुकीचा विकास करण्यात येणार आहे. रेल्वे स्टेशन आणि मुख्य महामार्गापासून जलवाहतूक किती अंतरावर असेल याचाही अभ्यास करण्यात आला आहे. वसईला रेल्वे स्टेशनपासूनचे अंतर हे ४ किमी आणि आणि रस्त्याचे अंतर ० किमी असणार आहे. तर कल्याण जेटीचे अंतर हे रेल्वे स्टेशपासून अवघे १.७१ किमी असणार असून रस्त्यापासून ते ५० मीटरवर असणार आहे. तर ठाण्यातील कोलशेतचे हबचे अंतर हे कळवा रेल्वे स्टेशनपासून ५ किमी आणि रस्त्यापासून ७० मीटर असेल.या जलवाहतुकीच्या दुसऱ्या टप्यात ठाणे, नवी मुंबई, मुंबई याचे काम करण्यात येणार आहे. या संदर्भातील सविस्तर प्रकल्प अहवाल ठाणे महापालिकेने केला आहे. पहिल्या टप्यासाठीचा संपूर्ण निधी हा केंद्राकडून मिळणार आहे. परंतु, दुसºया टप्यासाठीचा निर्णय अद्याप झालेला नाही. असे असले तरी ठाणे महापालिका या दुसºया टप्याचे काम करणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.