शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

कल्याण-ठाणे-वसई जलवाहतूक डिसेंबरपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:02 IST

ठाणे पालिकेच्या महत्त्वांकाक्षी जलवाहतूक प्रकल्पाच्या पहिल्या टप्यातील वसई - ठाणे - कल्याण या मार्गांवर डिसेंबरपर्यंत वाहतूक

ठाणे : ठाणे पालिकेच्या महत्त्वांकाक्षी जलवाहतूक प्रकल्पाच्या पहिल्या टप्यातील वसई - ठाणे - कल्याण या मार्गांवर डिसेंबरपर्यंत वाहतूक सुरु होईल, अशी माहिती आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी दिली. ज्या ठिकाणी पाण्याला खोली असेल त्या मार्गावर बोट धावणार असल्याचे सांगून खाजगीकरणातून म्हणजेच जीसीसी तत्त्वावर या बोटी धावतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.या प्रकल्पामुळे वेळ, पैशाची होईल. वाहतूककोंडीतून सुटका होईल, असा दावा त्यांनी केला. यावेळी महाराष्टÑ मेरीटाईम बोर्डचे सीईओ विक्रमकुमार, गोवा आणि कोच्ची शिप यार्डचे अधिकारी, इतर पालिकांचे अधिकारी उपस्थित होते. पहिल्या टप्यात वसई - मीरा-भाईंदर - ठाणे कोलशेत, घोडबंदर रोड, साकेत- दिवा-भिवंडी- कल्याण हा २५ नॉटिकल मैल म्हणजेच ४५ किमी लांबीचा ७० मिनिटांचा जलवाहतूक मार्गआहे. यासाठी ६५० कोटींचा निधी केंद्राकडून मिळणार आहे. कोलशेत येथे या जलवाहतुकीचे मल्टी मॉडेल हब विकसित केले जाईल. तेथे बोटी दुरुस्त केल्या जातील. पहिल्या टप्प्यासाठी पालिका ८ ते १० प्रवासी क्षममेच्या दोन ते तीन बोट घेणार आहे.पहिल्या टप्यातील डीपीआर तयार झाला असून त्याचे सादरीकरण दोन दिवसात दिल्लीत होणार असून त्यात त्याला तत्वत: मंजुरी मिळेल.मालवाहू जलवाहतूक, प्रवासी आणि पर्यटन अशा तीन स्तरावर जलवाहतूक सुरू होणार असल्याने पालिकेला चांगला महसूल मिळेल. त्यामुळे रस्ते आणि रेल्वेवरील भार कमी होईल. पर्यटनसाठीही जलवाहतुकीचा विकास करण्यात येणार आहे. रेल्वे स्टेशन आणि मुख्य महामार्गापासून जलवाहतूक किती अंतरावर असेल याचाही अभ्यास करण्यात आला आहे. वसईला रेल्वे स्टेशनपासूनचे अंतर हे ४ किमी आणि आणि रस्त्याचे अंतर ० किमी असणार आहे. तर कल्याण जेटीचे अंतर हे रेल्वे स्टेशपासून अवघे १.७१ किमी असणार असून रस्त्यापासून ते ५० मीटरवर असणार आहे. तर ठाण्यातील कोलशेतचे हबचे अंतर हे कळवा रेल्वे स्टेशनपासून ५ किमी आणि रस्त्यापासून ७० मीटर असेल.या जलवाहतुकीच्या दुसऱ्या टप्यात ठाणे, नवी मुंबई, मुंबई याचे काम करण्यात येणार आहे. या संदर्भातील सविस्तर प्रकल्प अहवाल ठाणे महापालिकेने केला आहे. पहिल्या टप्यासाठीचा संपूर्ण निधी हा केंद्राकडून मिळणार आहे. परंतु, दुसºया टप्यासाठीचा निर्णय अद्याप झालेला नाही. असे असले तरी ठाणे महापालिका या दुसºया टप्याचे काम करणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.