शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

कल्याण एसटी डेपोलाही फटका, १५ लाख रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 01:29 IST

पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाचा फटका कल्याण एसटी डेपोला बसला आहे. दर दिवशी ६० पेक्षा जास्त फेऱ्या रद्द झाल्याने तीन लाख याप्रमाणे एकूण १५ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.

- मुरलीधर भवारकल्याण - पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाचा फटका कल्याण एसटी डेपोला बसला आहे. दर दिवशी ६० पेक्षा जास्त फेऱ्या रद्द झाल्याने तीन लाख याप्रमाणे एकूण १५ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.कल्याण बस डेपोतून दिवसाला होणाºया ४४० फे-यांमधून सरसरी सात लाखांचे उत्पन्न मिळते. या डेपोतून नगर, नाशिक, पुणे, पालघर, विरार, बोईसर, मोखाडा, वाडा, जव्हार, मुरबाड, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, यवतमाळ, वर्धा, बीड, चिपळूण, रत्नागिरी, सिंधूदुर्ग येथे बस जातात. मागील पाच दिवसांत पावसामुळे रेल्वे अनेकदा विस्कळीत झाली. त्यामुळे त्याचा रस्ते वाहतुकीवर आला.कल्याण-पनवेल मागार्वरील कोंडीमुळे येजा करण्यासाठी एका बसला तब्बल पाच तास लागत आहेत. कल्याण-भिवंडी मार्गही जाम होत आहे. परिणामी फेºया घटल्या. मंगळवारी कोन गावानजीक रिक्षावर ट्रक पडला. त्यामुळे कोंडीत भरच पडली. भिवंडी-कल्याणची वाहतूक पडघामार्गे वळवण्यात आली. तेथेही एसटी बसचालकांना कोंडीचा सामना करावा लागला.कल्याण-नगर मार्गावर दर १५ मिनिटांनी बस सुटते. परंतु, पावसामुळे रायता पूल अनेकदा पाण्याखाली गेला. त्यामुळे कल्याण-नगरदरम्यान बस फेºया होऊ शकल्या नाहीत. कल्याण- स्वारगेट-पुणे बसच्या सकाळी दोन आणि रात्री दोन गाड्या सोडल्या जातात. परंतु, पावसामुळे त्या रद्द कराव्या लागल्या. सोमवारी दिवसभरात ६६ बस फेºया रद्द झाल्या.रस्त्यांची चाळणपावसामुळे कल्याण-शीळ रस्त्यावर खड्डे पडले आहेत. सूचकनाका येथील खड्ड्यात टाकलेले पेव्हर ब्लॉकही रस्त्यावर पसरले आहेत. पत्रीपुलावरही खड्डे आहेत. तेथील एक खड्डा दोनच दिवसांपूर्वी भर पावसात ट्रॅफिक वार्डनने बुजविला होता. त्याकडे रस्ते विकास महामंडळाने अद्याप लक्ष दिलेले नाही. हा खड्डा पावसामुळे मोठा झाला आहे. शिवाजी चौकतही मोठे खड्डे आहेत. कल्याण-खंबाळपाडा रोडवर चौधरी कंपाउंडजवळ पाणी साचल्याने रस्ता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. रेल्वेच्या रडकथेमुळे रस्ते वाहतुकीवर ताण आला होता.रिक्षा प्रवाशांची लूटकल्याण स्थानकातून भिवंडी, अंबरनाथ, डोंबिवलीकडे जाण्यासाठी रिक्षा मिळत नव्हता. कल्याण-डोंबिवली शेअर भाडे २२ रुपये असताना २५ रुपये घेतले जात होते. कल्याण-शीळ रस्त्यावर कोंडी झाल्याने पत्रीपूल परिसरात कोंडीचा ताण होता. कल्याण-डोंबिवली या सहा किलोमीटरच्या अंतरासाठी रिक्षेला एक तासापेक्षा जास्त वेळ लागत होता.कच-याची दुर्गंधीकल्याण-शीळ रस्त्यालगत मानपाडा पालीस ठाणे ते टाटा नाक्यापर्यंत रस्त्याच्या कडेचा कचरा उचलण्यात आलेला नव्हता. तो कुजून दुर्गंधी सुटली आहे. मिलापनगर येथे मुख्य रस्त्यावर कल्व्हर्टचे काम झाले आहे. मात्र, तेथे रस्त्यावर टाकलेली खडी इतरत्र पसरली आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळkalyanकल्याण