शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

कल्याण एसटी डेपोलाही फटका, १५ लाख रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 01:29 IST

पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाचा फटका कल्याण एसटी डेपोला बसला आहे. दर दिवशी ६० पेक्षा जास्त फेऱ्या रद्द झाल्याने तीन लाख याप्रमाणे एकूण १५ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.

- मुरलीधर भवारकल्याण - पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाचा फटका कल्याण एसटी डेपोला बसला आहे. दर दिवशी ६० पेक्षा जास्त फेऱ्या रद्द झाल्याने तीन लाख याप्रमाणे एकूण १५ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.कल्याण बस डेपोतून दिवसाला होणाºया ४४० फे-यांमधून सरसरी सात लाखांचे उत्पन्न मिळते. या डेपोतून नगर, नाशिक, पुणे, पालघर, विरार, बोईसर, मोखाडा, वाडा, जव्हार, मुरबाड, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, यवतमाळ, वर्धा, बीड, चिपळूण, रत्नागिरी, सिंधूदुर्ग येथे बस जातात. मागील पाच दिवसांत पावसामुळे रेल्वे अनेकदा विस्कळीत झाली. त्यामुळे त्याचा रस्ते वाहतुकीवर आला.कल्याण-पनवेल मागार्वरील कोंडीमुळे येजा करण्यासाठी एका बसला तब्बल पाच तास लागत आहेत. कल्याण-भिवंडी मार्गही जाम होत आहे. परिणामी फेºया घटल्या. मंगळवारी कोन गावानजीक रिक्षावर ट्रक पडला. त्यामुळे कोंडीत भरच पडली. भिवंडी-कल्याणची वाहतूक पडघामार्गे वळवण्यात आली. तेथेही एसटी बसचालकांना कोंडीचा सामना करावा लागला.कल्याण-नगर मार्गावर दर १५ मिनिटांनी बस सुटते. परंतु, पावसामुळे रायता पूल अनेकदा पाण्याखाली गेला. त्यामुळे कल्याण-नगरदरम्यान बस फेºया होऊ शकल्या नाहीत. कल्याण- स्वारगेट-पुणे बसच्या सकाळी दोन आणि रात्री दोन गाड्या सोडल्या जातात. परंतु, पावसामुळे त्या रद्द कराव्या लागल्या. सोमवारी दिवसभरात ६६ बस फेºया रद्द झाल्या.रस्त्यांची चाळणपावसामुळे कल्याण-शीळ रस्त्यावर खड्डे पडले आहेत. सूचकनाका येथील खड्ड्यात टाकलेले पेव्हर ब्लॉकही रस्त्यावर पसरले आहेत. पत्रीपुलावरही खड्डे आहेत. तेथील एक खड्डा दोनच दिवसांपूर्वी भर पावसात ट्रॅफिक वार्डनने बुजविला होता. त्याकडे रस्ते विकास महामंडळाने अद्याप लक्ष दिलेले नाही. हा खड्डा पावसामुळे मोठा झाला आहे. शिवाजी चौकतही मोठे खड्डे आहेत. कल्याण-खंबाळपाडा रोडवर चौधरी कंपाउंडजवळ पाणी साचल्याने रस्ता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. रेल्वेच्या रडकथेमुळे रस्ते वाहतुकीवर ताण आला होता.रिक्षा प्रवाशांची लूटकल्याण स्थानकातून भिवंडी, अंबरनाथ, डोंबिवलीकडे जाण्यासाठी रिक्षा मिळत नव्हता. कल्याण-डोंबिवली शेअर भाडे २२ रुपये असताना २५ रुपये घेतले जात होते. कल्याण-शीळ रस्त्यावर कोंडी झाल्याने पत्रीपूल परिसरात कोंडीचा ताण होता. कल्याण-डोंबिवली या सहा किलोमीटरच्या अंतरासाठी रिक्षेला एक तासापेक्षा जास्त वेळ लागत होता.कच-याची दुर्गंधीकल्याण-शीळ रस्त्यालगत मानपाडा पालीस ठाणे ते टाटा नाक्यापर्यंत रस्त्याच्या कडेचा कचरा उचलण्यात आलेला नव्हता. तो कुजून दुर्गंधी सुटली आहे. मिलापनगर येथे मुख्य रस्त्यावर कल्व्हर्टचे काम झाले आहे. मात्र, तेथे रस्त्यावर टाकलेली खडी इतरत्र पसरली आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळkalyanकल्याण