शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण एसटी डेपोलाही फटका, १५ लाख रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 01:29 IST

पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाचा फटका कल्याण एसटी डेपोला बसला आहे. दर दिवशी ६० पेक्षा जास्त फेऱ्या रद्द झाल्याने तीन लाख याप्रमाणे एकूण १५ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.

- मुरलीधर भवारकल्याण - पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाचा फटका कल्याण एसटी डेपोला बसला आहे. दर दिवशी ६० पेक्षा जास्त फेऱ्या रद्द झाल्याने तीन लाख याप्रमाणे एकूण १५ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.कल्याण बस डेपोतून दिवसाला होणाºया ४४० फे-यांमधून सरसरी सात लाखांचे उत्पन्न मिळते. या डेपोतून नगर, नाशिक, पुणे, पालघर, विरार, बोईसर, मोखाडा, वाडा, जव्हार, मुरबाड, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, यवतमाळ, वर्धा, बीड, चिपळूण, रत्नागिरी, सिंधूदुर्ग येथे बस जातात. मागील पाच दिवसांत पावसामुळे रेल्वे अनेकदा विस्कळीत झाली. त्यामुळे त्याचा रस्ते वाहतुकीवर आला.कल्याण-पनवेल मागार्वरील कोंडीमुळे येजा करण्यासाठी एका बसला तब्बल पाच तास लागत आहेत. कल्याण-भिवंडी मार्गही जाम होत आहे. परिणामी फेºया घटल्या. मंगळवारी कोन गावानजीक रिक्षावर ट्रक पडला. त्यामुळे कोंडीत भरच पडली. भिवंडी-कल्याणची वाहतूक पडघामार्गे वळवण्यात आली. तेथेही एसटी बसचालकांना कोंडीचा सामना करावा लागला.कल्याण-नगर मार्गावर दर १५ मिनिटांनी बस सुटते. परंतु, पावसामुळे रायता पूल अनेकदा पाण्याखाली गेला. त्यामुळे कल्याण-नगरदरम्यान बस फेºया होऊ शकल्या नाहीत. कल्याण- स्वारगेट-पुणे बसच्या सकाळी दोन आणि रात्री दोन गाड्या सोडल्या जातात. परंतु, पावसामुळे त्या रद्द कराव्या लागल्या. सोमवारी दिवसभरात ६६ बस फेºया रद्द झाल्या.रस्त्यांची चाळणपावसामुळे कल्याण-शीळ रस्त्यावर खड्डे पडले आहेत. सूचकनाका येथील खड्ड्यात टाकलेले पेव्हर ब्लॉकही रस्त्यावर पसरले आहेत. पत्रीपुलावरही खड्डे आहेत. तेथील एक खड्डा दोनच दिवसांपूर्वी भर पावसात ट्रॅफिक वार्डनने बुजविला होता. त्याकडे रस्ते विकास महामंडळाने अद्याप लक्ष दिलेले नाही. हा खड्डा पावसामुळे मोठा झाला आहे. शिवाजी चौकतही मोठे खड्डे आहेत. कल्याण-खंबाळपाडा रोडवर चौधरी कंपाउंडजवळ पाणी साचल्याने रस्ता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. रेल्वेच्या रडकथेमुळे रस्ते वाहतुकीवर ताण आला होता.रिक्षा प्रवाशांची लूटकल्याण स्थानकातून भिवंडी, अंबरनाथ, डोंबिवलीकडे जाण्यासाठी रिक्षा मिळत नव्हता. कल्याण-डोंबिवली शेअर भाडे २२ रुपये असताना २५ रुपये घेतले जात होते. कल्याण-शीळ रस्त्यावर कोंडी झाल्याने पत्रीपूल परिसरात कोंडीचा ताण होता. कल्याण-डोंबिवली या सहा किलोमीटरच्या अंतरासाठी रिक्षेला एक तासापेक्षा जास्त वेळ लागत होता.कच-याची दुर्गंधीकल्याण-शीळ रस्त्यालगत मानपाडा पालीस ठाणे ते टाटा नाक्यापर्यंत रस्त्याच्या कडेचा कचरा उचलण्यात आलेला नव्हता. तो कुजून दुर्गंधी सुटली आहे. मिलापनगर येथे मुख्य रस्त्यावर कल्व्हर्टचे काम झाले आहे. मात्र, तेथे रस्त्यावर टाकलेली खडी इतरत्र पसरली आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळkalyanकल्याण