शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

कल्याण तीन हत्यांमुळे हादरले, २२ तासांतील घटना, क्षुल्लक कारणांमुळे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 04:48 IST

क्षुल्लक कारणांमुळे मागील २२ तासांमध्ये घडलेल्या तीन हत्यांमुळे कल्याण शहर हादरून गेले आहे. हत्या झालेल्यांमध्ये दोन तरुण आहेत. या घटनांमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.

कल्याण : क्षुल्लक कारणांमुळे मागील २२ तासांमध्ये घडलेल्या तीन हत्यांमुळे कल्याण शहर हादरून गेले आहे. हत्या झालेल्यांमध्ये दोन तरुण आहेत. या घटनांमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.पश्चिमेतील रामबाग लेन क्रमांक-४ मधील दत्तछाया इमारतीमध्ये राहणारे मनोहर गामने (वय ५४) हे त्यांच्याच परिसरातील प्रभू ब्रदर्स या दुकानात शुक्रवारी अंडी घेण्यासाठी गेले होते. दोन अंडी खरेदी केल्यानंतर दुकानदाराने त्यांच्याकडे ११ रुपये मागितले. मात्र, सर्वत्र दोन अंड्यांची किंमत १० रुपये असताना, तुम्ही एक रुपया जास्त का घेता, असा सवाल गामने यांनी दुकानदाराला विचारला. यावरून दुकानदाराने गामने यांच्याशी हुज्जत घातली. तसेच याच गोष्टीचा जाब विचारण्यासाठी गामने व त्यांचा मुलगा प्रशांत हा रात्री ११ च्या सुमारास प्रभू ब्रदर्स दुकानात गेले. या वेळी दुकानात दुकानदाराचा मुलगा सुधाकर प्रभू बसला होता. गामने पुन्हा दुकानात आल्याचा राग सुधाकरला आला. त्यातून त्याने गामने यांना शिवीगाळ करत रस्त्यावरच ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झालेल्या गामने यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी प्रशांत याने महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याआधारे पोलिसांनी सुधाकर प्रभू (रा. संतोषीमाता रोड, कल्याण) याला अटक केली आहे.दुसरी घटना अटाळी परिसरात घडली आहे. पूर्वीच्या घरगुती वादातून सोनूसिंग करतारसिंग सरदार (२२, रा. शहाड, कल्याण) याची १० जणांनी मिळून धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना रात्री ९ च्या सुमारास घडली. सोनूसिंग आणि आसवान सिंग यांच्यात पूर्ववैमनस्य होते. त्यातून आसवान सिंग, राजेंद्रकौर ऊर्फ बेबी, दीपा कौर, तुफानसिंग, सुरजसिंग, गोबूसिंग, दादूसिंग, जग्गासिंग आणि राजू सिंग (सर्व रा. आंबिवली) यांनी सोनूसिंग याच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यात गंभीर जखमी झालेल्या सोनूसिंग याला पालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या वेळी सोनूसिंगच्या समर्थकांनी रुग्णालयाच्या आवारात गर्दी केल्याने परिसरात तणावाचे वातावरण होते. सोनूसिंगच्या हत्येप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी आसवान सिंग, दीपा कौर आणि सुरजसिंग यांना अटक केली आहे. तर, उर्वरित फरारी आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.दरम्यान, डोंबिवली शहरात मे २०१७ मध्ये गोळीबाराच्या तीन घटना घडल्या होत्या. त्यात साधारण तिघांचा मृत्यू झाला होता. क्षुल्लक कारणासाठी हिंसाचार करण्याची प्रवृत्ती अलिकडेच वाढली आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील पोलिसांपुढे ती रोखण्याचे मोठे आव्हानच निर्माण झाले आहे. तणावाखाली असलेल्या लोकांना समुपदेशनाची गरज असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.क्रिकेटमधील वाद बेतला जीवावरकोळसेवाडी परिसरात तिसरी घटना घडली आहे. क्रिकेटच्या वादातून अशोक मालुसरे (३२) याच्यावर त्याच परिसरात राहणाºया तस्लीम शेख आणि लाला ऊर्फ लल्ला यांनी गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास धारदार शस्त्राने हल्ला केला.त्यात गंभीर जखमी झालेल्या अशोक याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी लाला ऊर्फ लल्ला याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.ा राहणाºया तस्लीम शेख आणि लाला ऊर्फ लल्ला यांनी गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास धारदार शस्त्राने हल्ला केला.

टॅग्स :Murderखून