शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

कल्याण आरटीओ कर्मचाऱ्यांचे ‘लेखणीबंद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 23:54 IST

राज्य सरकारचा केला निषेध; पदोन्नती, विविध मागण्यांकडे आंदोलनाद्वारे वेधले लक्ष

डोंबिवली : पदोन्नती व अन्य प्रलंबित विविध मागण्यांची पूर्तता होत नसल्याच्या निषेधार्थ कल्याण उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयातील ३० कर्मचारी आणि अधिकाºयांनी शुक्रवारी लेखणीबंद आंदोलन करून सरकारचा निषेध नोंदवला.यासंदर्भात कर्मचारी संघटनेचे सचिव मनोज सूर्यवंशी म्हणाले, वर्षानुवर्षे आम्ही एकाच पदावर कार्यरत आहोत. आमची पदोन्नती का होत नाही, याची माहिती आम्हाला मिळत नाही. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये नाराजी आहे. अनेकदा कर्मचाºयांमध्येच काम न करण्याची मानसिकता तयार होते. त्याचा परिणाम व्यवस्थेवर होतो. जनताभिमुख काम करताना येणाºया तांत्रिक अडचणी कोणीही समजून घेत नाही. त्यामुळे आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला. आरटीओ कार्यालयातील सगळ्यांनीच लेखणीबंद करून राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करण्याचा निर्णय घेतला.कल्याण आरटीओ कार्यालयात ५३ पदे मंजूर असताना सध्या २७ कर्मचारी काम करत आहेत. त्यातच, वाहनांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाल्यामुळे सर्व व्यवस्थेवर ताण येत आहे. नियोजन रोजच्यारोज फोल ठरत आहे. त्यातच, कोणालाही पदोन्नती नाही. त्यामुळेही नाराजी आहे. १९९७ मध्ये जेवढी कर्मचारी संख्या अपेक्षित होती, त्याची पूर्तता अद्यापपर्यंत केलेली नाही. २०१७ पर्यंतही कर्मचारी वाढलेले नाहीत. २०१२-१३ पासून कर्मचाºयांची भरतीही केलेली नसल्याने अनेक समस्या वाढत आहेत. कोणालाही रजा मिळत नाही, असे सूर्यवंशी यांनी सांगितले.कल्याण आरटीओ कार्यालयामध्ये वाहननोंदणी, करभरणा, लायसन आदी कामांसाठी दररोज शेकडो नागरिक येतात. अपुºया मनुष्यबळामुळे त्यांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्याबद्दल कोणीही काहीही बोलत नाही. अधिकारीही वरिष्ठांकडे समस्या मांडतात की नाही, याबाबत काही स्पष्टता नाही, असे सूर्यवंशी म्हणाले.आरटीओ कार्यालयातील आंदोलनकर्त्यांनी वरिष्ठांना निवेदन दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुनील लाड, अनिता ठाकरे, प्रशांत मोहिले, गणेश आंग्रे, विशाल गोडबोले, सुषमा पाटील, सुचिता गडेकर, अरुण येवले आदी कर्मचारी उपस्थित होते.कामकाज ठप्प, उत्पन्नावर झाला परिणामलेखणीबंद आंदोलनामुळे शंभरहून अधिक दुचाकींची नोंदणी होऊ शकली नाही. तसेच लायसन, वाहनांचा करभरणा व अन्य कामांसाठी आलेल्या वाहनचालकांचे हाल झाले. दिवसभरात कोणतेही काम न झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. आॅनलाइनद्वारे नोंदणी केलेल्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले. दिवसभरातील १८ ते २० लाखांच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी मान्य केले.

टॅग्स :StrikeसंपRto officeआरटीओ ऑफीसdombivaliडोंबिवली