शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

माणकोली पुलासह कल्याण रिंगरोडचे साडेपाचशे कोटी पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 23:39 IST

केडीएमसीची अनास्था : मंत्रालयात लवकरच बैठक

सुरेश लोखंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मोठागाव-माणकोली खाडीपूल, कल्याण रिंगरोड तब्बल साडेपाचशे कोटी रुपये खर्च करून तयार होणार आहे. रिंगरोडच्या कामाची जबाबदारी कल्याण-डोंबिवली महापालिकेने झटकून एमएमआरडीएवर ढकलल्याचा आरोप आमदार रवींद्र चव्हाण यांनी नुकताच डीपीसीत केला. यामुळे हा निधी पडून असून खाडीपुलासह कल्याण रिंगरोड, शीळफाटा रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालयात लवकरच बैठक लावण्याच्या तयारीत आहेत.

मोठागाव-माणकोली खाडीपूल, कल्याण रिंगरोडसाठी साडेपाचशे कोटींचा निधी पडून आहे. केडीएमसी, एमएमआरडीए या कामांकडे लक्ष देत नसल्यामुळे कामास विलंब होत असल्याचा आरोप करून त्यांनी केडीएमसीला धारेवर धरले. या कामासाठी पालिका टीडीआर देत नसल्याची खंतही व्यक्त केली.तबेल्यांच्या जागा संपादनात अडचणीमोठागाव परिसरात या रस्त्यासाठी90%जमिनीचे संपादन झाले आहे. मात्र, माणकोलीच्या बाजूकडून जमिनीच्या संपादनास तीव्र विरोध होत असल्याचे भिवंडी प्रांतांकडून सांगितले जात आहे.या रस्त्यासाठी माणकोलीकडून १०० लोकांच्या जागा संपादन करायच्या आहेत. यात सर्वाधिक तबेल्यांच्या जागा आहेत. तबेल्यांच्या जागा बळकावलेल्या आहेत. यामुळे त्यांना भरपाई देता येत नसल्यामुळे या लोकांकडून जागेच्या संपादनाला तीव्र विरोध होत आहे.यामुळे या कल्याण रिंगरोडसह शीळफाटा रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री लवकरच मंत्रालयात बैठक घेऊन केडीएमसी व एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याच्या तयारीत आहे.टीडीआरमुळे विलंबया रिंगरोडसाठी सुमारे ६० टक्के जागा संपादित झाल्याचे उघडकीस आले. काही ठिकाणच्या जागांचे टायटल क्लीअर नसल्यामुळे टीडीआर देणे शक्य नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.या रस्त्याचे काम महापालिकेने एमएमआरडीएवर ढकलल्यामुळे या कामास विलंब होत असल्याचे चव्हाण यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिले.लोकहिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाºया या रिंगरोडच्या मोठागाव-माणकोली-खाडीपूलही प्रशासनाच्या दिरंगाईमुळे रखडला आहे. या कामाचे अ‍ॅलॉटमेंट दोन वेळा बदलल्याची माहिती त्यांनी दिली.कल्याण परिसरातीलवाहतूककोंडी दूर होणारमोठागाव-माणकोली खाडीपुलावरून हा कल्याण रिंगरोड पुढे मुंबई-नाशिक महामार्गास जोडला जाणार आहे. यामुळे कल्याण परिसरात होणारी वाहतूककोंडी संपणार असून काही मिनिटांतच चालकांना नाशिक महामार्गावर जाता येणार आहे.