शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

माणकोली पुलासह कल्याण रिंगरोडचे साडेपाचशे कोटी पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 23:39 IST

केडीएमसीची अनास्था : मंत्रालयात लवकरच बैठक

सुरेश लोखंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मोठागाव-माणकोली खाडीपूल, कल्याण रिंगरोड तब्बल साडेपाचशे कोटी रुपये खर्च करून तयार होणार आहे. रिंगरोडच्या कामाची जबाबदारी कल्याण-डोंबिवली महापालिकेने झटकून एमएमआरडीएवर ढकलल्याचा आरोप आमदार रवींद्र चव्हाण यांनी नुकताच डीपीसीत केला. यामुळे हा निधी पडून असून खाडीपुलासह कल्याण रिंगरोड, शीळफाटा रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालयात लवकरच बैठक लावण्याच्या तयारीत आहेत.

मोठागाव-माणकोली खाडीपूल, कल्याण रिंगरोडसाठी साडेपाचशे कोटींचा निधी पडून आहे. केडीएमसी, एमएमआरडीए या कामांकडे लक्ष देत नसल्यामुळे कामास विलंब होत असल्याचा आरोप करून त्यांनी केडीएमसीला धारेवर धरले. या कामासाठी पालिका टीडीआर देत नसल्याची खंतही व्यक्त केली.तबेल्यांच्या जागा संपादनात अडचणीमोठागाव परिसरात या रस्त्यासाठी90%जमिनीचे संपादन झाले आहे. मात्र, माणकोलीच्या बाजूकडून जमिनीच्या संपादनास तीव्र विरोध होत असल्याचे भिवंडी प्रांतांकडून सांगितले जात आहे.या रस्त्यासाठी माणकोलीकडून १०० लोकांच्या जागा संपादन करायच्या आहेत. यात सर्वाधिक तबेल्यांच्या जागा आहेत. तबेल्यांच्या जागा बळकावलेल्या आहेत. यामुळे त्यांना भरपाई देता येत नसल्यामुळे या लोकांकडून जागेच्या संपादनाला तीव्र विरोध होत आहे.यामुळे या कल्याण रिंगरोडसह शीळफाटा रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री लवकरच मंत्रालयात बैठक घेऊन केडीएमसी व एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याच्या तयारीत आहे.टीडीआरमुळे विलंबया रिंगरोडसाठी सुमारे ६० टक्के जागा संपादित झाल्याचे उघडकीस आले. काही ठिकाणच्या जागांचे टायटल क्लीअर नसल्यामुळे टीडीआर देणे शक्य नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.या रस्त्याचे काम महापालिकेने एमएमआरडीएवर ढकलल्यामुळे या कामास विलंब होत असल्याचे चव्हाण यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिले.लोकहिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाºया या रिंगरोडच्या मोठागाव-माणकोली-खाडीपूलही प्रशासनाच्या दिरंगाईमुळे रखडला आहे. या कामाचे अ‍ॅलॉटमेंट दोन वेळा बदलल्याची माहिती त्यांनी दिली.कल्याण परिसरातीलवाहतूककोंडी दूर होणारमोठागाव-माणकोली खाडीपुलावरून हा कल्याण रिंगरोड पुढे मुंबई-नाशिक महामार्गास जोडला जाणार आहे. यामुळे कल्याण परिसरात होणारी वाहतूककोंडी संपणार असून काही मिनिटांतच चालकांना नाशिक महामार्गावर जाता येणार आहे.