शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण मेट्रोची वाट बिकट, हजारो लोक विस्थापित होण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 03:26 IST

कल्याण : ठाण्याहून भिवंडीमार्गे कल्याणच्या मेट्रो रेल्वेला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असली, तरी भर गर्दीच्या ठिकाणी असलेल्या या मेट्रोची तीन स्थानकांसाठी जागा कुठून मिळणार आणि मेट्रो नेण्यासाठीही तेथे जागा कशी मिळणार असा प्रश्न तज्ज्ञांनी उपस्थित केला

कल्याण : ठाण्याहून भिवंडीमार्गे कल्याणच्या मेट्रो रेल्वेला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असली, तरी भर गर्दीच्या ठिकाणी असलेल्या या मेट्रोची तीन स्थानकांसाठी जागा कुठून मिळणार आणि मेट्रो नेण्यासाठीही तेथे जागा कशी मिळणार असा प्रश्न तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे. एमएमआरडीएने मेट्रोचा मार्ग ठरवताना या बाबींचा विचार कसा केला नाही, असा मुद्दा त्यांनी मांडला असून या मार्गासाठी जर रस्ता रूंद करायचा ठरवला, तर शहराच्या मध्यवर्ती भागातील शेकडो कुटुंबे विस्थापित होतील, अशी भीतीही व्यक्त केली आहे.दुर्गाडी, सहजानंद चौक आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ही कल्याणमधील मेट्रोची प्रमुख स्थानके आहेत. दुर्गाडी ते बाजार समितीच्या रस्त्यावर सहा फूटही जागा शिल्लक नाही. तेथील रस्ते आधीच अरुंद आहेत. तेथून मेट्रो कशी नेणार, त्याचा मार्ग कसा बांधणार, त्यांच्या स्टेशनसाठी जागा कशी निर्माण करणार असे अनेक प्रश्न माहिती अधिकाराचे कार्यकर्ते आणि सिटीझन फोरमचे प्रमुख श्रीनिवास घाणेकर यांनी उपस्थित केले आहेत. काहीही नियोजन नसताना हा प्रकल्प हाती घेतला आहे. आमचा प्रकल्पाला विरोध नाही. पण प्रकल्पासाठी जागा कशी व कुठून आणणार, असा मुद्दा त्यांनी मांडला. सध्याच्याच मार्गावरून मेट्रो रेल्वे न्यायची ठरवल्यास दुर्गाडी ते बाजार समितीदरम्यान हजारो लोक विस्थापित होण्याची दाट शक्यता त्यांनी व्यक्त केली.मेट्रोच्या स्टेशनला जागा देण्यास बाजार समितीचा, शेतक-यांचा असलेला विरोध पाहता दुर्गाडी ते बाजार समितीदरम्यान या मेट्रोमार्गासाठी सहा फूटही जागा शिल्लक नाही. सहजानंद चौकात स्टेशन कसे उभारणार, असा प्रश्न घाणेकर यांनी विचारला.दुर्गाडी ते पत्री पुलादरम्यान होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी गोविंदवाडी बायपास रस्ता तयार केला. या रस्त्याचे नियोजन व प्रयोजन फसले. त्यामुळे वाहतूक कोंडी फुटण्याचा हेतू विफल झाला आहे. दुर्गाडी ते बाजार समितीचा पट्टा आणि पुढे पत्री पुलापर्यंतच्या रस्त्यावर दुर्गाडी ते शिवाजी चौकदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा दुकाने आणि इमारती आहेत. हे रस्ते अरुंद आहेत. तेथे सतत वाहतूक कोंडी होते. त्यातच त्या रस्त्यांवर मेट्रोसाठी मार्ग टाकण्याचे काम हाती घेतल्यावर वाहतुकीचे नियोजनच कोलमडेल. याच रस्त्यात मेट्रोचे खांब उभारले तर वाहने जाण्यासाठी पुरेसा रस्ताच शिल्लक राहणार नाही. मेट्रोचा मूळचा मार्ग हा खडकपाडामार्गे होता. तो दुर्गाडी, सहजानंद चौक आणि बाजार समिती असा वळवण्यात आला.खडकपाडा मार्ग रद्द करण्यात आला. हा बदल कोणी केला, कशासाठी आणि कोणाच्या हितासाठी केला, याविषयी त्यांनी संशय व्यक्त केला. दुर्गाडी ते बाजार समितीपर्यंत मेट्रोचा प्रकल्प रेटून नेला, तर पुन्हा एकदा हजारो जणांवर विस्थापित होण्याची वेळ येईल, अशी भीती घाणेकर यांनी व्यक्त केली.>बाजार समितीतही खळबळ, शेतकरी नाराजमेट्रोच्या कारशेडसाठी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात सॅटिसमध्ये जागा तयार करण्याऐवजी राज्यातील दुसºया क्रमांकाच्या कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा घेण्याच्या हालचाली सुरू असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच गुरूवारी शेतकरी, व्यापाºयांत एकच खळबळ उडाली. भाजपा-शिवसेनेचे हे सरकार शेतकºयांच्या मूळावर उठल्याची प्रतिक्रिया शेतकºयांनी दिली. बाजार समितीच्या पदाधिकाºयांनी मात्र खूपच सावध भूमिका घेतली. ही जागा बाजार समितीसाठी आरक्षित आहे. ती शेतकरी आणि विक्रेते यांच्यासाठी आहे. यापूर्वी गोविंदवाडी बायपाससाठी १५ गुंठे जागा घेतली आहे. पुन्हा स्टेशन उभारण्यासाठी जागा घेतली जाणार असेल, तर त्याला विरोध असेल, अशी भूमिका सभापती रवींद्र घोडविंदे यांनी मांडली.शेतकरी, शेतमाल विक्रेते यांच्यासाठी असलेली जागा मेट्रो रेल्वे प्रकल्पाला देणे शक्य होणार नाही, असे त्यांनी सांगितले. मेट्रोच्या स्थानकासाठी अन्यत्र जागा घ्यावी. कल्याण रेल्वे स्थानकानजीक मेट्रोचे स्टेशन उभारण्यास बाजार समितीची हरकत नाही. पण बाजार समितीची एक इंचही जागा मेट्रो रेल्वेसाठी दिली जाणार नाही. बाजार समितीचे सर्व प्रकल्प नियोजित आहेत. त्यांचा आराखडा मंजूर आहे. फूल मार्केटचे काम महापालिकेने मंजूर केले आहे. त्याचा शुभारंभही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच केला जाणार आहे. त्यावेळी ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली जाईल. मेट्रोसारखा विकास प्रकल्प उभारण्यास आमचा विरोध नाही. पण त्या प्रकल्पासाठी आमची जागा घेऊ करु नका, अशी बाजार समितीतर्फे आमची भूमिका आहे. तिचा विचार सरकारने केला पाहिजे, असा मुद्दा घोडविंदे यांनी मांडला.

टॅग्स :kalyanकल्याणMetroमेट्रो