शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

कल्याण मेट्रोची वाट बिकट, हजारो लोक विस्थापित होण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 03:26 IST

कल्याण : ठाण्याहून भिवंडीमार्गे कल्याणच्या मेट्रो रेल्वेला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असली, तरी भर गर्दीच्या ठिकाणी असलेल्या या मेट्रोची तीन स्थानकांसाठी जागा कुठून मिळणार आणि मेट्रो नेण्यासाठीही तेथे जागा कशी मिळणार असा प्रश्न तज्ज्ञांनी उपस्थित केला

कल्याण : ठाण्याहून भिवंडीमार्गे कल्याणच्या मेट्रो रेल्वेला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असली, तरी भर गर्दीच्या ठिकाणी असलेल्या या मेट्रोची तीन स्थानकांसाठी जागा कुठून मिळणार आणि मेट्रो नेण्यासाठीही तेथे जागा कशी मिळणार असा प्रश्न तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे. एमएमआरडीएने मेट्रोचा मार्ग ठरवताना या बाबींचा विचार कसा केला नाही, असा मुद्दा त्यांनी मांडला असून या मार्गासाठी जर रस्ता रूंद करायचा ठरवला, तर शहराच्या मध्यवर्ती भागातील शेकडो कुटुंबे विस्थापित होतील, अशी भीतीही व्यक्त केली आहे.दुर्गाडी, सहजानंद चौक आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ही कल्याणमधील मेट्रोची प्रमुख स्थानके आहेत. दुर्गाडी ते बाजार समितीच्या रस्त्यावर सहा फूटही जागा शिल्लक नाही. तेथील रस्ते आधीच अरुंद आहेत. तेथून मेट्रो कशी नेणार, त्याचा मार्ग कसा बांधणार, त्यांच्या स्टेशनसाठी जागा कशी निर्माण करणार असे अनेक प्रश्न माहिती अधिकाराचे कार्यकर्ते आणि सिटीझन फोरमचे प्रमुख श्रीनिवास घाणेकर यांनी उपस्थित केले आहेत. काहीही नियोजन नसताना हा प्रकल्प हाती घेतला आहे. आमचा प्रकल्पाला विरोध नाही. पण प्रकल्पासाठी जागा कशी व कुठून आणणार, असा मुद्दा त्यांनी मांडला. सध्याच्याच मार्गावरून मेट्रो रेल्वे न्यायची ठरवल्यास दुर्गाडी ते बाजार समितीदरम्यान हजारो लोक विस्थापित होण्याची दाट शक्यता त्यांनी व्यक्त केली.मेट्रोच्या स्टेशनला जागा देण्यास बाजार समितीचा, शेतक-यांचा असलेला विरोध पाहता दुर्गाडी ते बाजार समितीदरम्यान या मेट्रोमार्गासाठी सहा फूटही जागा शिल्लक नाही. सहजानंद चौकात स्टेशन कसे उभारणार, असा प्रश्न घाणेकर यांनी विचारला.दुर्गाडी ते पत्री पुलादरम्यान होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी गोविंदवाडी बायपास रस्ता तयार केला. या रस्त्याचे नियोजन व प्रयोजन फसले. त्यामुळे वाहतूक कोंडी फुटण्याचा हेतू विफल झाला आहे. दुर्गाडी ते बाजार समितीचा पट्टा आणि पुढे पत्री पुलापर्यंतच्या रस्त्यावर दुर्गाडी ते शिवाजी चौकदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा दुकाने आणि इमारती आहेत. हे रस्ते अरुंद आहेत. तेथे सतत वाहतूक कोंडी होते. त्यातच त्या रस्त्यांवर मेट्रोसाठी मार्ग टाकण्याचे काम हाती घेतल्यावर वाहतुकीचे नियोजनच कोलमडेल. याच रस्त्यात मेट्रोचे खांब उभारले तर वाहने जाण्यासाठी पुरेसा रस्ताच शिल्लक राहणार नाही. मेट्रोचा मूळचा मार्ग हा खडकपाडामार्गे होता. तो दुर्गाडी, सहजानंद चौक आणि बाजार समिती असा वळवण्यात आला.खडकपाडा मार्ग रद्द करण्यात आला. हा बदल कोणी केला, कशासाठी आणि कोणाच्या हितासाठी केला, याविषयी त्यांनी संशय व्यक्त केला. दुर्गाडी ते बाजार समितीपर्यंत मेट्रोचा प्रकल्प रेटून नेला, तर पुन्हा एकदा हजारो जणांवर विस्थापित होण्याची वेळ येईल, अशी भीती घाणेकर यांनी व्यक्त केली.>बाजार समितीतही खळबळ, शेतकरी नाराजमेट्रोच्या कारशेडसाठी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात सॅटिसमध्ये जागा तयार करण्याऐवजी राज्यातील दुसºया क्रमांकाच्या कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा घेण्याच्या हालचाली सुरू असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच गुरूवारी शेतकरी, व्यापाºयांत एकच खळबळ उडाली. भाजपा-शिवसेनेचे हे सरकार शेतकºयांच्या मूळावर उठल्याची प्रतिक्रिया शेतकºयांनी दिली. बाजार समितीच्या पदाधिकाºयांनी मात्र खूपच सावध भूमिका घेतली. ही जागा बाजार समितीसाठी आरक्षित आहे. ती शेतकरी आणि विक्रेते यांच्यासाठी आहे. यापूर्वी गोविंदवाडी बायपाससाठी १५ गुंठे जागा घेतली आहे. पुन्हा स्टेशन उभारण्यासाठी जागा घेतली जाणार असेल, तर त्याला विरोध असेल, अशी भूमिका सभापती रवींद्र घोडविंदे यांनी मांडली.शेतकरी, शेतमाल विक्रेते यांच्यासाठी असलेली जागा मेट्रो रेल्वे प्रकल्पाला देणे शक्य होणार नाही, असे त्यांनी सांगितले. मेट्रोच्या स्थानकासाठी अन्यत्र जागा घ्यावी. कल्याण रेल्वे स्थानकानजीक मेट्रोचे स्टेशन उभारण्यास बाजार समितीची हरकत नाही. पण बाजार समितीची एक इंचही जागा मेट्रो रेल्वेसाठी दिली जाणार नाही. बाजार समितीचे सर्व प्रकल्प नियोजित आहेत. त्यांचा आराखडा मंजूर आहे. फूल मार्केटचे काम महापालिकेने मंजूर केले आहे. त्याचा शुभारंभही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच केला जाणार आहे. त्यावेळी ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली जाईल. मेट्रोसारखा विकास प्रकल्प उभारण्यास आमचा विरोध नाही. पण त्या प्रकल्पासाठी आमची जागा घेऊ करु नका, अशी बाजार समितीतर्फे आमची भूमिका आहे. तिचा विचार सरकारने केला पाहिजे, असा मुद्दा घोडविंदे यांनी मांडला.

टॅग्स :kalyanकल्याणMetroमेट्रो