शहरं
Join us  
Trending Stories
1
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
2
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
3
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
5
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
6
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
7
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
8
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
9
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
10
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
11
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
12
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
13
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
14
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
15
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
16
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
17
डोईवर विठुमाऊली अन् वारकऱ्यांसह फुगडी; पंढरीच्या वारीतून मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
18
"रावणाच्या तारखा माझ्यापेक्षा जास्त...", जयदीप अहलावतने दिला 'रामायण'ला नकार
19
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
20
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना

कल्याणचा फुलबाजार कोमेजला!

By admin | Updated: September 12, 2016 03:14 IST

कल्याणचा फुलबाजार सध्या पालिका आणि एपीएमसीच्या वादाच्या गर्तेत सापडला आहे. वापराविना पडून असलेल्या, मोडकळीस आलेल्या शेडमुळे विक्रेत्यांना बसण्यास धड जागा नाही.

कल्याणचा फुलबाजार सध्या पालिका आणि एपीएमसीच्या वादाच्या गर्तेत सापडला आहे. वापराविना पडून असलेल्या, मोडकळीस आलेल्या शेडमुळे विक्रेत्यांना बसण्यास धड जागा नाही. माल साठवण्याची सुविधा नाही. कोल्ड स्टोअरेज नाही. त्यातच करवसुली करूनही साध्या-साध्या सुविधा देण्यात खळखळ सुरू असल्याने या बाजाराला दिवसेंदिवस अवकळा येते आहे. मुंबईनंतरचा मोठा फुलबाजार म्हणून तो विकसित होण्याऐवजी कोमेजू लागला आहे, तो नियोजनाच्या अभावामुळे. मात्र त्याबाबत ना पालिकेला खेद, ना एपीएमसीला खंत. कल्याणमध्ये पूर्वी फूल व भाजीपाला बाजार हा लक्ष्मीमार्केटमध्ये भरत होता. १९९७ पासून फुलबाजार हा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात एक एकर जागेवर भरु लागला. बाजार समितीने कल्याण डोंबिवली महापालिकेला फूल बाजारासाठी एक एकर जागा हस्तांतरीत केली. दादरपाठोपाठ सगळ््यात मोठा फूल बाजार अशी कल्याणच्या फुलबाजाराची ख्याती आहे. महापालिका बाजार फी व बाजार समिती उपकर (सेस) वसूल करते. पण तेथे फूल विक्रेते आणि खरेदीदारांसाठी कोणत्याही प्रकारच्या सुविधा पुरविल्या जात नाहीत. महापालिकेने फूल मार्केटसाठी उभारलेल्या शेडही मोडकळीस आल्या असून बाजाराची दुरवस्था झाली आहे. याच ठिकाणी एक मजली व दुमजली इमारत बांधून फूल विक्रेत्यांना सुविधा देण्याचा घाट बाजार समितीने घातला आहे. त्यासाठी ९ कोटी ५० लाख रुपये खर्चाला मंजुरीही देण्यात आली आहे. त्याकरिता महापालिकेकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्रही घेतले आहे. प्रत्यक्षात बाजार समितीच्या ४० एकर आवारात अनेक वास्तू विकसित करण्यात आलेल्या आहेत. मात्र त्या वापरात नाही. त्याठिकाणी गर्दुल्यांचा वावर असतो. त्यामुळे या वास्तू विकसित करुनही त्याचा उद्देश सफल झालेला नाही. तसेच त्या व्यापारी व विक्रेत्यांनाही मिळालेल्या नाहीत. फूल बाजाराची इमारत विकसित करुन पुन्हा हाच कित्ता गिरवला जाणार असेल, तर त्यातून इमारत विकासाचा उद्देश साध्य होणार नाही. लोकप्रतिनिधींना विकास कामातून केवळ टक्केवारी लाटता येईल आणि विकासाच्या खऱ्या हेतूला हरताळ फासला जाण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.भाजीबाजारही माघारी : कृषी उत्पन्न बाजार समितीने १९९५ मध्ये महापालिकेस ४० एकर जागेपैकी तीन हजार ८२५ चौरस मीटरचा भूखंड भाजीपाला विक्रेत्यांना स्थलांतरीत करण्यास दिला होता. १९९६ मध्ये महापालिकेने एक एकर जागेवर शेड उभारली. त्याठिकाणी भाजीपाला विक्रेते स्थलांतरीत झाले. मात्र त्यांचा व्यवसाय होत नसल्यामुळे पुन्हा त्यांनी मूळ लक्ष्मी बाजाराकडेच धाव घेतली. फूल विक्रेत्यांना चांगली जागा मिळाल्याने त्यांनी पुन्हा लक्ष्मीबाजारात येणे पसंत केले नाही. १९९७ पासून त्याठिकाणी फूलबाजार भरत आहे. मात्र या फुलबाजाराची दुरवस्था झाली आहे. तेथे सोयी सुविधांची वानवा आहे.