शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कल्याण-डोंबिवली परिवहनची टिटवाळा स्टेशन ते महागणेश मंदिर सेवा बंद

By अनिकेत घमंडी | Updated: November 29, 2017 18:36 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेने टिटवाळा येथून महागणपती मंदिरापर्यंत बस सेवा मोठ्या थाटात सुरु केली होती. पण अल्पावधीतच कमी प्रतिसाद मिळाल्याने ती सेवा बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आधीच बंद केलेले रुट पुन्हा सुरु करण्याचे परिवहनसमोर आव्हान असतांना नव्याने सुरु केलेली बससेवा बंद करण्यात आली

ठळक मुद्दे अल्प प्रतिसादामुळे घेतला निर्णयसभापती संजय पावशेंचे १० लाखांचे उद्दीष्ठ

डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महापालिकेने टिटवाळा येथून महागणपती मंदिरापर्यंत बस सेवा मोठ्या थाटात सुरु केली होती. पण अल्पावधीतच कमी प्रतिसाद मिळाल्याने ती सेवा बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आधीच बंद केलेले रुट पुन्हा सुरु करण्याचे परिवहनसमोर आव्हान असतांना नव्याने सुरु केलेली बससेवा बंद करण्यात आली आहे.परिवहन विभाग तोट्यात असतांनाच सेवा बंद होणे योग्य नसल्याचे सभापती संजय पावशे यांनी प्रशासन अधिका-यांना म्हंटले. जर टिटवाळा स्थानकापर्यंत बस जात असेल तर ती पुढे गणपती मंदिरापर्यंत नेण्यात यावी, जेणेकरुन ज्यांना रिक्षेने जाणे परवडत नाही त्यांना सुविधा मिळेल. नागरिकांना सुविधा द्या, जेणेकरुन उत्पन्न वाढेल असा सकारात्मक विचार करा असेही त्यांनी कर्मचा-यांना सांगितले. एकदम एखादी सेवा बंद करण्याआगोदर चर्चा करा असेही त्यांनी स्पष्ट केले.यासंदर्भात परिवहन व्यवस्थापक देवीदास टेकाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही ही सेवा बंद झाल्याचे सांगत दुसरा पर्याय असल्याचे स्पष्ट केले. टिटवाळा स्टेशन ते सांगोडा अशा मार्गावर सध्या बस जाते, ती बस गणेशमंदिर मार्गे नेता येऊ शकते, असेही ते म्हणाले. त्यासाठी संबंधित अधिका-यांशी चर्चा केली असून दोन दिवसात तो बदल करण्यात येईल असेही टेकाळे म्हणाले.सभापती संजय पावशेंचे १० लाखांचे उद्दीष्ठ!एकीकडे सभापती संजय पावशे यांचे परिवहन सेवेचे प्रतीदिन उत्पन्न १० लाख करण्याचा उद्देश आहे. सध्या केडीएमटी सुमारे ८० बस सेवेच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी सुविधा देते. एका खासगी कंपनीला ज्या १०० बस मध्ये तांत्रिक बिघाड झाले आहे त्याची तातडीने दुरुस्ती करणे, त्या बस नव्या करणे यासंदर्भात सूचित केले आहे. लवकरच त्या बसेस सेवेत येतील. सध्या उपलब्ध असणा-या सुविधांमधून सुमारे ६ लाखांच्या प्रतीदिन उलाढालीपर्यंत उद्दीष्ट गाठण्यास सफलता मिळाली आहे. जर त्या १०० बस आल्या तर मात्र उर्वरीत ४ लाखांचे उद्दीष्ठ निश्चित गाठले जाऊ शकते असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एखाद वेळेस बस उपलब्ध होतील, पण रुट बंद पडत गेले तर काय उपयोग असा सवाल प्रवाशांनी केला.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीthakurliठाकुर्लीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका