शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
7
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
8
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
9
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
10
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
11
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
12
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
13
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
14
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
15
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
16
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
17
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
18
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
19
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
20
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर

कल्याण-डोंबिवली परिवहनची टिटवाळा स्टेशन ते महागणेश मंदिर सेवा बंद

By अनिकेत घमंडी | Updated: November 29, 2017 18:36 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेने टिटवाळा येथून महागणपती मंदिरापर्यंत बस सेवा मोठ्या थाटात सुरु केली होती. पण अल्पावधीतच कमी प्रतिसाद मिळाल्याने ती सेवा बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आधीच बंद केलेले रुट पुन्हा सुरु करण्याचे परिवहनसमोर आव्हान असतांना नव्याने सुरु केलेली बससेवा बंद करण्यात आली

ठळक मुद्दे अल्प प्रतिसादामुळे घेतला निर्णयसभापती संजय पावशेंचे १० लाखांचे उद्दीष्ठ

डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महापालिकेने टिटवाळा येथून महागणपती मंदिरापर्यंत बस सेवा मोठ्या थाटात सुरु केली होती. पण अल्पावधीतच कमी प्रतिसाद मिळाल्याने ती सेवा बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आधीच बंद केलेले रुट पुन्हा सुरु करण्याचे परिवहनसमोर आव्हान असतांना नव्याने सुरु केलेली बससेवा बंद करण्यात आली आहे.परिवहन विभाग तोट्यात असतांनाच सेवा बंद होणे योग्य नसल्याचे सभापती संजय पावशे यांनी प्रशासन अधिका-यांना म्हंटले. जर टिटवाळा स्थानकापर्यंत बस जात असेल तर ती पुढे गणपती मंदिरापर्यंत नेण्यात यावी, जेणेकरुन ज्यांना रिक्षेने जाणे परवडत नाही त्यांना सुविधा मिळेल. नागरिकांना सुविधा द्या, जेणेकरुन उत्पन्न वाढेल असा सकारात्मक विचार करा असेही त्यांनी कर्मचा-यांना सांगितले. एकदम एखादी सेवा बंद करण्याआगोदर चर्चा करा असेही त्यांनी स्पष्ट केले.यासंदर्भात परिवहन व्यवस्थापक देवीदास टेकाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही ही सेवा बंद झाल्याचे सांगत दुसरा पर्याय असल्याचे स्पष्ट केले. टिटवाळा स्टेशन ते सांगोडा अशा मार्गावर सध्या बस जाते, ती बस गणेशमंदिर मार्गे नेता येऊ शकते, असेही ते म्हणाले. त्यासाठी संबंधित अधिका-यांशी चर्चा केली असून दोन दिवसात तो बदल करण्यात येईल असेही टेकाळे म्हणाले.सभापती संजय पावशेंचे १० लाखांचे उद्दीष्ठ!एकीकडे सभापती संजय पावशे यांचे परिवहन सेवेचे प्रतीदिन उत्पन्न १० लाख करण्याचा उद्देश आहे. सध्या केडीएमटी सुमारे ८० बस सेवेच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी सुविधा देते. एका खासगी कंपनीला ज्या १०० बस मध्ये तांत्रिक बिघाड झाले आहे त्याची तातडीने दुरुस्ती करणे, त्या बस नव्या करणे यासंदर्भात सूचित केले आहे. लवकरच त्या बसेस सेवेत येतील. सध्या उपलब्ध असणा-या सुविधांमधून सुमारे ६ लाखांच्या प्रतीदिन उलाढालीपर्यंत उद्दीष्ट गाठण्यास सफलता मिळाली आहे. जर त्या १०० बस आल्या तर मात्र उर्वरीत ४ लाखांचे उद्दीष्ठ निश्चित गाठले जाऊ शकते असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एखाद वेळेस बस उपलब्ध होतील, पण रुट बंद पडत गेले तर काय उपयोग असा सवाल प्रवाशांनी केला.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीthakurliठाकुर्लीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका