शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

कल्याण-डोंबिवली परिवहनची टिटवाळा स्टेशन ते महागणेश मंदिर सेवा बंद

By अनिकेत घमंडी | Updated: November 29, 2017 18:36 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेने टिटवाळा येथून महागणपती मंदिरापर्यंत बस सेवा मोठ्या थाटात सुरु केली होती. पण अल्पावधीतच कमी प्रतिसाद मिळाल्याने ती सेवा बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आधीच बंद केलेले रुट पुन्हा सुरु करण्याचे परिवहनसमोर आव्हान असतांना नव्याने सुरु केलेली बससेवा बंद करण्यात आली

ठळक मुद्दे अल्प प्रतिसादामुळे घेतला निर्णयसभापती संजय पावशेंचे १० लाखांचे उद्दीष्ठ

डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महापालिकेने टिटवाळा येथून महागणपती मंदिरापर्यंत बस सेवा मोठ्या थाटात सुरु केली होती. पण अल्पावधीतच कमी प्रतिसाद मिळाल्याने ती सेवा बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आधीच बंद केलेले रुट पुन्हा सुरु करण्याचे परिवहनसमोर आव्हान असतांना नव्याने सुरु केलेली बससेवा बंद करण्यात आली आहे.परिवहन विभाग तोट्यात असतांनाच सेवा बंद होणे योग्य नसल्याचे सभापती संजय पावशे यांनी प्रशासन अधिका-यांना म्हंटले. जर टिटवाळा स्थानकापर्यंत बस जात असेल तर ती पुढे गणपती मंदिरापर्यंत नेण्यात यावी, जेणेकरुन ज्यांना रिक्षेने जाणे परवडत नाही त्यांना सुविधा मिळेल. नागरिकांना सुविधा द्या, जेणेकरुन उत्पन्न वाढेल असा सकारात्मक विचार करा असेही त्यांनी कर्मचा-यांना सांगितले. एकदम एखादी सेवा बंद करण्याआगोदर चर्चा करा असेही त्यांनी स्पष्ट केले.यासंदर्भात परिवहन व्यवस्थापक देवीदास टेकाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही ही सेवा बंद झाल्याचे सांगत दुसरा पर्याय असल्याचे स्पष्ट केले. टिटवाळा स्टेशन ते सांगोडा अशा मार्गावर सध्या बस जाते, ती बस गणेशमंदिर मार्गे नेता येऊ शकते, असेही ते म्हणाले. त्यासाठी संबंधित अधिका-यांशी चर्चा केली असून दोन दिवसात तो बदल करण्यात येईल असेही टेकाळे म्हणाले.सभापती संजय पावशेंचे १० लाखांचे उद्दीष्ठ!एकीकडे सभापती संजय पावशे यांचे परिवहन सेवेचे प्रतीदिन उत्पन्न १० लाख करण्याचा उद्देश आहे. सध्या केडीएमटी सुमारे ८० बस सेवेच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी सुविधा देते. एका खासगी कंपनीला ज्या १०० बस मध्ये तांत्रिक बिघाड झाले आहे त्याची तातडीने दुरुस्ती करणे, त्या बस नव्या करणे यासंदर्भात सूचित केले आहे. लवकरच त्या बसेस सेवेत येतील. सध्या उपलब्ध असणा-या सुविधांमधून सुमारे ६ लाखांच्या प्रतीदिन उलाढालीपर्यंत उद्दीष्ट गाठण्यास सफलता मिळाली आहे. जर त्या १०० बस आल्या तर मात्र उर्वरीत ४ लाखांचे उद्दीष्ठ निश्चित गाठले जाऊ शकते असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एखाद वेळेस बस उपलब्ध होतील, पण रुट बंद पडत गेले तर काय उपयोग असा सवाल प्रवाशांनी केला.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीthakurliठाकुर्लीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका