शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

कल्याण-डोंबिवली परिवहनची टिटवाळा स्टेशन ते महागणेश मंदिर सेवा बंद

By अनिकेत घमंडी | Updated: November 29, 2017 18:36 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेने टिटवाळा येथून महागणपती मंदिरापर्यंत बस सेवा मोठ्या थाटात सुरु केली होती. पण अल्पावधीतच कमी प्रतिसाद मिळाल्याने ती सेवा बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आधीच बंद केलेले रुट पुन्हा सुरु करण्याचे परिवहनसमोर आव्हान असतांना नव्याने सुरु केलेली बससेवा बंद करण्यात आली

ठळक मुद्दे अल्प प्रतिसादामुळे घेतला निर्णयसभापती संजय पावशेंचे १० लाखांचे उद्दीष्ठ

डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महापालिकेने टिटवाळा येथून महागणपती मंदिरापर्यंत बस सेवा मोठ्या थाटात सुरु केली होती. पण अल्पावधीतच कमी प्रतिसाद मिळाल्याने ती सेवा बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आधीच बंद केलेले रुट पुन्हा सुरु करण्याचे परिवहनसमोर आव्हान असतांना नव्याने सुरु केलेली बससेवा बंद करण्यात आली आहे.परिवहन विभाग तोट्यात असतांनाच सेवा बंद होणे योग्य नसल्याचे सभापती संजय पावशे यांनी प्रशासन अधिका-यांना म्हंटले. जर टिटवाळा स्थानकापर्यंत बस जात असेल तर ती पुढे गणपती मंदिरापर्यंत नेण्यात यावी, जेणेकरुन ज्यांना रिक्षेने जाणे परवडत नाही त्यांना सुविधा मिळेल. नागरिकांना सुविधा द्या, जेणेकरुन उत्पन्न वाढेल असा सकारात्मक विचार करा असेही त्यांनी कर्मचा-यांना सांगितले. एकदम एखादी सेवा बंद करण्याआगोदर चर्चा करा असेही त्यांनी स्पष्ट केले.यासंदर्भात परिवहन व्यवस्थापक देवीदास टेकाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही ही सेवा बंद झाल्याचे सांगत दुसरा पर्याय असल्याचे स्पष्ट केले. टिटवाळा स्टेशन ते सांगोडा अशा मार्गावर सध्या बस जाते, ती बस गणेशमंदिर मार्गे नेता येऊ शकते, असेही ते म्हणाले. त्यासाठी संबंधित अधिका-यांशी चर्चा केली असून दोन दिवसात तो बदल करण्यात येईल असेही टेकाळे म्हणाले.सभापती संजय पावशेंचे १० लाखांचे उद्दीष्ठ!एकीकडे सभापती संजय पावशे यांचे परिवहन सेवेचे प्रतीदिन उत्पन्न १० लाख करण्याचा उद्देश आहे. सध्या केडीएमटी सुमारे ८० बस सेवेच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी सुविधा देते. एका खासगी कंपनीला ज्या १०० बस मध्ये तांत्रिक बिघाड झाले आहे त्याची तातडीने दुरुस्ती करणे, त्या बस नव्या करणे यासंदर्भात सूचित केले आहे. लवकरच त्या बसेस सेवेत येतील. सध्या उपलब्ध असणा-या सुविधांमधून सुमारे ६ लाखांच्या प्रतीदिन उलाढालीपर्यंत उद्दीष्ट गाठण्यास सफलता मिळाली आहे. जर त्या १०० बस आल्या तर मात्र उर्वरीत ४ लाखांचे उद्दीष्ठ निश्चित गाठले जाऊ शकते असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एखाद वेळेस बस उपलब्ध होतील, पण रुट बंद पडत गेले तर काय उपयोग असा सवाल प्रवाशांनी केला.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीthakurliठाकुर्लीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका