शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या  रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आईच्या पोटातच बाळाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 15:23 IST

टिटवाळा येथे राहणा-या वर्षा रवी ढगे या गरोदर महिलेला प्रसूतीच्या वेदना काल पहाटे सुरु झाल्या. तिला उपचारासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात आणले होते.

कल्याण - टिटवाळा येथे राहणा-या वर्षा रवी ढगे या गरोदर महिलेला प्रसूतीच्या वेदना काल पहाटे सुरु झाल्या. तिला उपचारासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात आणले होते. तिच्यावर तातडीने उपचार करण्याऐवजी डॉक्टर नसल्याचे कारण देत तिला ताटकळ ठेवले. तब्बल पाच तासानंतर तिची  प्रसूती झाली. मात्र तिच्या पोटातील बाळ दगावले होते. दिवाळी आधीच तिच्या पोटी जन्माला येणारा तिच्या वंशाचा दिवा विझण्याचा प्रसंग ढगे कुटुंबियांवर ओढविल्याने प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. 

पोटातील बाळ दगावल्याने वर्षा याना जबर मानसिक धक्का बसला आहे.  महापालिका रुग्णालयातून नागरीकांना योग्य व वेळीच उपचार मिळत नसल्याची बाब या घटनेतून पुन्हा एकदा उघड झाली आहे. या जीवघेण्या हलगर्जीप्रकरणी रुग्णालयाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी ढगे यांनी महात्मा फुले पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. मात्र पोलिस त्यांची तक्रार घेत नसल्याचे रवी ढगे यांनी सांगितले.रुक्मीणीबाई रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर रुची उपाध्याय यांच्याकडे वर्षा ढगे या उपचार घेत होत्या. चार महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना काल शुक्रवारी पहाटे चार वाजता प्रसूतीच्या वेदना सुरु झाल्या. त्यांना उपचारासाठी त्यांचे पती रवी यांनी 5.45 वाजता दाखल केले. दरम्यान वर्षा यांच्या पायात पाणी झाल्याने त्यांच्या प्रसूतीसाठी रुग्णालयातील उपस्थित स्टाफने नकार दिला. 

त्याना पुढील उपचारासाठी मुंबईच्या शीव रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. वर्षा यांना रक्तस्त्रव सुरु झाला होता. तरी देखील स्टाफ त्यांच्याकडे लक्ष देत नव्हता. त्यांच्या पतीला, सासूला,सास-यांना दाद देत नव्हता. पहाटे पाच वाजल्यापासून साडेबारा वाजेपर्यंत त्यांच्यावर उपचार झाले नाही. बाळाचे डोके वर्षा यांच्या मांडीला लागत असल्याचे सांगून देखील उपस्थित स्टाफने तुम्हाला जास्त कळते की आम्हाला असे सांगून वर्षा यांना गप्प केले. 

1 वाजून 8 मिनीटांनी बाळाचा जन्म झाला. ते बाळ मृत जन्माला आल्याचे सांगण्यात आले. बाळाचा मृत्यू 12 वाजून 30 मिनिटांनी झाल्याचे सांगितले. मात्र त्याची नोंद 1 वाजून आठ मिनिटे अशी केली आहे. रुग्णालयाच्या हलगर्जीपणाने बाळाचा जीव घेतला आहे. रवी ढगे यांना या आधी दोन मुली आहे. त्यांना मुलगा झाला होता. दिवाळीच्या आधीच त्यांच्या वंशाचा दिवा रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे विझला आहे. इतके सगळे घडून देखील आज  वर्षा यांना रुग्णालयात डिस्चार्ज देण्यास डॉक्टरांकडून नकार दिला जात होता. 

या प्रकरणी रवी ढगे यांनी महात्मा फुले पोलिस ठाण्यात रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी धाव घेतली. पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान यासंदर्भात रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्वीनी पाटील यांनी सांगितले की, रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता आहे. ढगे यांच्या वेळी एक डॉक्टर होते. मात्र अन्य ओपीडीत व्यस्त होते. घडल्या प्रकरणाची चौकशी करुन संबंधितांच्या विरोधात कारवाईचा अहवाल वरिष्ठांना सादर केला जाईल. हा प्रकार कळताच मनसेचे कल्याण शहराध्यक्ष कौस्तूभ देसाई व जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी या घटनेची गंभीर दखल घेत रुग्णालयाच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे.