शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
3
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
4
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
5
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
6
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
7
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
8
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
9
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
10
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
11
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
12
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
13
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
14
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
15
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
16
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
17
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
18
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
19
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
20
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कळवा रुग्णालयात अनागोंदी कारभार

By admin | Updated: November 10, 2016 03:10 IST

कळव्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयात आधीच रुग्णांना दर्जेदार उपचार मिळत नसल्याची ओरड होत आहे. त्यातच, मंगळवारी एका शिकाऊ डॉक्टरचा डेंग्यूने मृत्यू झाला

ठाणे : कळव्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयात आधीच रुग्णांना दर्जेदार उपचार मिळत नसल्याची ओरड होत आहे. त्यातच, मंगळवारी एका शिकाऊ डॉक्टरचा डेंग्यूने मृत्यू झाला. त्यामुळे आता परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे स्पष्ट झाले आहे. येथे येणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहेत. गंभीर रुग्णांवर वरिष्ठ डॉक्टरऐवजी शिकाऊ डॉक्टरच उपचार करत असल्याची बाब पुढे आली आहे.छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉ. दिलीप कणसे यांचा मंगळवारी डेंग्यूने मृत्यू झाला. ते राहत असलेल्या रुग्णालयाच्या वसतिगृहात एका बादलीत डेंग्यूच्या अळ्या आढळल्याची माहिती आता समोर आली आहे. २३ आॅक्टोबरला महापालिकेच्या आरोग्य विभागाला माहिती झाल्यानंतर त्यांचे एक पथक तेथे गेले होते. त्यानंतर, त्यांनी येथील डेंग्यूच्या अळ्या नष्ट केल्या होत्या. परंतु, त्याआधीच कणसे यांना डेंग्यूची लागण झाली, असा दावा आरोग्य विभागाने केला आहे. त्यामुळे त्यांना २४ आॅक्टोबरला कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तेथे योग्य उपचाराची सुविधा नसल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. या प्रकारामुळे आता तेथे चांगल्या प्रतीचे उपचार मिळत नसल्याची बाब प्रकर्षाने समोर आली आहे. येथे जिल्ह्याच्या विविध भागांतून येणाऱ्या रुग्णांना चांगले उपचार मिळत नसताना आता एका डॉक्टरवरही तीच वेळ ओढवल्याचीही बाब यानिमित्ताने समोर आली आहे. रुग्णालयात बुधवारी सकाळी ११च्या सुमारास आलेल्या अनेक रुग्णांना वॉर्डबॉयच जागेवर नसल्याचा अनुभव आला. यावेळी दोन तासांहून अधिक काळ रु ग्णांना ताटकळावे लागले. त्यात गंभीर रुग्णही होते. अशा रुग्णाला वॉर्डमध्ये नेण्यासाठी स्ट्रेचरच उपलब्ध नव्हते. तसेच रुग्ण अत्यवस्थ असल्याने त्याला आयसीयूशिवाय पर्याय नसल्याचा दावा करून त्यांना दाखल करून घेण्यास सुरुवातीच्या काळात टाळाटाळ झाली. अखेर, रुग्णाच्या नातेवाइकांनी विनंती केल्यानंतर त्यांच्याकडून लेखी घेतल्यानंतर रुग्णाला दाखल करून घेण्यात आले. त्यानंतर, त्याच्यावर वरिष्ठ डॉक्टर उपलब्ध असतानाही शिकाऊ डॉक्टरांनी उपचार सुरू केले. वरिष्ठ डॉक्टरांबाबत चौकशी केल्यानंतर ते उपलब्ध नसल्याची माहिती येथील कर्मचारी देत होते. कळवा रु ग्णालयात रोज ठाणे शहर, कळवा, मुंब्रा, दिवा आदी भागांसह जिल्ह्याच्या विविध भागांतून बाह्यरुग्ण विभागात ५०० च्या आसपास रुग्ण येतात. परंतु, केसपेपर काढण्यापासून ते डॉक्टरांकडे क्रमांक लागेपर्यंत एकेका रु ग्णाला चार ते पाच तास लागतात. त्यातही अनेकदा डॉक्टरही नसतात. त्यामुळे त्यांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. आजही सकाळच्या वेळेत हाच अनुभव रु ग्णांना आला. परंतु, आपले कोणीही वाकडे करू शकत नाही, अशा मानसिकतेत असलेल्या कर्मचारी अथवा डॉक्टरांवर कारवाईचा बडगा कोण उगारणार, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.