शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
5
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
6
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
7
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
8
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
9
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
10
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
11
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
12
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
13
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
14
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
15
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
16
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
17
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
18
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
19
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
20
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?

कळवा रुग्णालयात अनागोंदी कारभार

By admin | Updated: November 10, 2016 03:10 IST

कळव्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयात आधीच रुग्णांना दर्जेदार उपचार मिळत नसल्याची ओरड होत आहे. त्यातच, मंगळवारी एका शिकाऊ डॉक्टरचा डेंग्यूने मृत्यू झाला

ठाणे : कळव्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयात आधीच रुग्णांना दर्जेदार उपचार मिळत नसल्याची ओरड होत आहे. त्यातच, मंगळवारी एका शिकाऊ डॉक्टरचा डेंग्यूने मृत्यू झाला. त्यामुळे आता परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे स्पष्ट झाले आहे. येथे येणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहेत. गंभीर रुग्णांवर वरिष्ठ डॉक्टरऐवजी शिकाऊ डॉक्टरच उपचार करत असल्याची बाब पुढे आली आहे.छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉ. दिलीप कणसे यांचा मंगळवारी डेंग्यूने मृत्यू झाला. ते राहत असलेल्या रुग्णालयाच्या वसतिगृहात एका बादलीत डेंग्यूच्या अळ्या आढळल्याची माहिती आता समोर आली आहे. २३ आॅक्टोबरला महापालिकेच्या आरोग्य विभागाला माहिती झाल्यानंतर त्यांचे एक पथक तेथे गेले होते. त्यानंतर, त्यांनी येथील डेंग्यूच्या अळ्या नष्ट केल्या होत्या. परंतु, त्याआधीच कणसे यांना डेंग्यूची लागण झाली, असा दावा आरोग्य विभागाने केला आहे. त्यामुळे त्यांना २४ आॅक्टोबरला कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तेथे योग्य उपचाराची सुविधा नसल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. या प्रकारामुळे आता तेथे चांगल्या प्रतीचे उपचार मिळत नसल्याची बाब प्रकर्षाने समोर आली आहे. येथे जिल्ह्याच्या विविध भागांतून येणाऱ्या रुग्णांना चांगले उपचार मिळत नसताना आता एका डॉक्टरवरही तीच वेळ ओढवल्याचीही बाब यानिमित्ताने समोर आली आहे. रुग्णालयात बुधवारी सकाळी ११च्या सुमारास आलेल्या अनेक रुग्णांना वॉर्डबॉयच जागेवर नसल्याचा अनुभव आला. यावेळी दोन तासांहून अधिक काळ रु ग्णांना ताटकळावे लागले. त्यात गंभीर रुग्णही होते. अशा रुग्णाला वॉर्डमध्ये नेण्यासाठी स्ट्रेचरच उपलब्ध नव्हते. तसेच रुग्ण अत्यवस्थ असल्याने त्याला आयसीयूशिवाय पर्याय नसल्याचा दावा करून त्यांना दाखल करून घेण्यास सुरुवातीच्या काळात टाळाटाळ झाली. अखेर, रुग्णाच्या नातेवाइकांनी विनंती केल्यानंतर त्यांच्याकडून लेखी घेतल्यानंतर रुग्णाला दाखल करून घेण्यात आले. त्यानंतर, त्याच्यावर वरिष्ठ डॉक्टर उपलब्ध असतानाही शिकाऊ डॉक्टरांनी उपचार सुरू केले. वरिष्ठ डॉक्टरांबाबत चौकशी केल्यानंतर ते उपलब्ध नसल्याची माहिती येथील कर्मचारी देत होते. कळवा रु ग्णालयात रोज ठाणे शहर, कळवा, मुंब्रा, दिवा आदी भागांसह जिल्ह्याच्या विविध भागांतून बाह्यरुग्ण विभागात ५०० च्या आसपास रुग्ण येतात. परंतु, केसपेपर काढण्यापासून ते डॉक्टरांकडे क्रमांक लागेपर्यंत एकेका रु ग्णाला चार ते पाच तास लागतात. त्यातही अनेकदा डॉक्टरही नसतात. त्यामुळे त्यांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. आजही सकाळच्या वेळेत हाच अनुभव रु ग्णांना आला. परंतु, आपले कोणीही वाकडे करू शकत नाही, अशा मानसिकतेत असलेल्या कर्मचारी अथवा डॉक्टरांवर कारवाईचा बडगा कोण उगारणार, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.