शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कळवा, मुंब्य्रात वीज खासगीकरणास राष्ट्रवादी काँग्रेसचा तीव्र विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 23:51 IST

कळवा, मुंब्रा, दिवा या भागांत वीज वितरणासाठी फ्रेन्चाइजी (खाजगीकरण) नेमण्याच्या महावितरणच्या निर्णयास राष्ट्रवादीने विरोध केला आहे.

ठाणे : कळवा, मुंब्रा, दिवा या भागांत वीज वितरणासाठी फ्रेन्चाइजी (खासगीकरण) नेमण्याच्या महावितरणच्या निर्णयास राष्ट्रवादीने विरोध केला आहे. महावितरणने आपला निर्णय बदलला नाही, तर खाजगी ठेकेदारांना कळवा, मुंब्य्रासह इतर भागांत पाऊल ठेवू देणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला. सुरुवातीला खाजगीकरणाची मागणी आम्हीच केली होती. परंतु, सध्या ज्या पद्धतीने वाढीव बिले ग्राहकांना पाठवली जात आहेत, त्यामुळेच राष्ट्रवादीने खासगीकरणाचा निर्णय बदलल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.महावितरणने मागील आठवड्यात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये भिवंडीच्या धर्तीवर कळवा, मुंब्रा आणि दिव्यातही विजेचे खाजगीकरण केले जाईल, असे स्पष्ट केले होते. परंतु, त्यांचा हा निर्णय चुकीचा असून राज्य सरकारने यात लक्ष घालून येथील नागरिकांची आधी मते जाणून घेणे गरजेचे असल्याचे मत आव्हाड यांनी व्यक्त केले.भिवंडीत आणि मुंबईत खाजगीकरणाचा हा प्रयोग फसला असल्याचे सांगून ठाण्यातील या भागांमध्येसुद्धा तीच परिस्थिती निर्माण होणार आहे. भिवंडीकरांना आजही वाढीव बिले येत आहेत. मुंबईत तर राज्य शासनाने या खाजगीकरणात लक्ष घातले आहे. त्यामुळेच या खाजगीकरणाला विरोध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मागील काही महिने व्यवस्थित वीजबिल ग्राहकांना येत होते. परंतु, आता अचानक त्यात ३० ते ४० टक्कयांची वाढ कशी झाली, असा सवालही त्यांनी केला. यामध्ये केवळ आपल्या चुकांवर पांघरूण घालून ग्राहकांवर हा बोजा टाकण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. सध्या लावण्यात आलेले वीजमीटर हे फास्ट असून त्यातून केवळ जास्तीचे बिले वसूल करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.>१५ दिवसांत तोडगा काढण्याची मागणीकेवळ कळवा, मुंब्य्रातच नाही तर संपूर्ण ठाण्यातील महावितरणच्या ग्राहकांना वाढीव बिले येत आहेत. अचानक वाढलेल्या या बिलांविरोधात राष्टÑवादी आता आक्रमक भूमिका घेणार आहे. यावर तोडगा काढण्यासाठी येत्या १५ दिवसांत बैठक घ्यावी, अशी मागणी केली आहे. परंतु, तोडगा काढला गेला नाही, तर मात्र वागळे इस्टेट भागातील महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकले जाईल, असा इशाराही आव्हाड यांनी दिला.